शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

मराठवाड्याला पावसाचा जोरदार तडाखा; साडेतीन लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 20:29 IST

३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांचे नुकसान ; पाच जिल्ह्यांतील पिकांना पावसाचा तडाखा

औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन ४१ दिवस झाले आहेत. या ४१ दिवसांत मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील सुमारे साडेतीन लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. पेरण्यानंतर बुड धरलेली ही पिके आगामी काळातील पावसात उभी राहतील की नाही, याबाबत शंका आहे. ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात (८ ते १८ जुलै) जोरदार पावसाने साडेतीन हजारांहून अधिक गावांतील पिकांना पावसाचा फटका बसला आहे. विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जालना ५० हेक्टर, परभणी १२०० हेक्टर, हिंगोली १५ हजार ९४४, नांदेड ३ लाख ३० हजार ८७९, तर लातूर जिल्ह्यातील १५ हेक्टरचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष पंचनामे झाल्यानंतर बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

४७६ हेक्टर जमीन गेली वाहूनजालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ४७६ हेक्टर जमीन अतिपावसामुळे वाहून गेली आहे. फळपिकांचे ५८ हेक्टर, बागायत ५ हजार ४९९ हेक्टर, जिरायत ३ लाख ३२ हजार ५३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जालन्यातील ३७७, परभणीतील १५००, हिंगोलीतील १९ हजार १९७, नांदेडमधील ३ लाख ३० हजार ३५७, तर लातूरमधील १८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

१० जण गेले पुरात वाहूनमराठवाड्यात ८ जुलैपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे विभागातील काही जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले. ४१ दिवसांतील पावसाळ्यात १० जण पुरात वाहून गेले आहेत. २४ जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. भिंत पडून एकजण दगावला आहे. दुभती जनावरे, पिकांचे नुकसान व मालमत्तांच्या पडझडी झाल्या. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ७७९ कच्ची, तर तीन पक्की घरे पावसाने पडली आहे. २९८ लहान-मोठी दुधाळ जनावरे, तर १२० ओढकाम करणारी जनावरे दगावली आहेत. बीड जिल्ह्यातील एक, तर नांदेडमधील सात पुलांचे पावसामुळे नुकसान झाल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. सात कि.मी.चे रस्ते वाहून गेले आहेत.

ओल्या दुष्काळाची चाहूल : ४०५ मि.मी. पाऊसविभागात आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४०५ मि.मी. पाऊस झाला आहे. २४२ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. १६३ मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. ५९ टक्के पावसाचे प्रमाण असून, उर्वरित ७३ दिवसांच्या पावसाळ्यात ४० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला, तर ओल्या दुष्काळाचा सामना विभागाला करावा लागण्याची शक्यता आहे. आजवर झालेल्या पावसामुळे काही जिल्ह्यांत ओल्या दुष्काळाची चाहूल लागली आहे.

टॅग्स :agricultureशेतीMarathwadaमराठवाडाRainपाऊस