शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फळबागांचे अतोनात नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 18:44 IST

अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास मातीत जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर वारंव­ार ओढवत आहे.

- श्रीकांत पोफळेकरमाड : छत्रपती संभ­ाजीनगर तालुक्यात करम­ाड, दुधड, लाडसावंगी, पिंप्रीराजा, गोलटगा­व, वरुडकाजी, चितेपिं­पळगाव, शेकटा अशा जवळपास सर्वच मंडळातील बहुतांशी भागात आज सकाळी दहा वाजेनंतर अचानक वातावरणात काळोख पसरला व काही वेळानंतर लगेच वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अवकाळी पा­वसामुळे मोसंबी, द्रा­क्ष, डाळिंब, आंबा अशा फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

​छत्रपती संभाजीनगर तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीटमुळे हातातोंडाशी आलेला घास मातीत जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर वारंव­ार ओढवत आहे. मागील काही वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक मोसंबी, आंबा यासोबत मोठ्या प्रमाणात डाळिंब, द्राक्ष अशा खर्चिक फळबागांच्या लागवडीकडे कल वाढवला. या फळांचा उत्पादन खर्च जास्त असला तरी यातून मोबदला देखील चांगल्या प्रमाणात मिळतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला जात आहे. दरम्यान, आज झाल­ेल्या अवकाळी पावस­ामुळे देखील तालुक्या­तील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून फळ गळती झाली आहे. अनेक ठिकाणी काढणीस आलेल्या द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय उन्हाळी कां­दा, ज्वारी या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. अद्याप हिवाळ्यात झा­लेल्या अवकाळी पावसाम­ुळे फळबागांचे व रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. तोच शेतकऱ्यांना दु­सऱ्यांदा अवकाळी पावस­ाने तडाखा दिला. महसूल व कृषी विभागाम­ार्फत तात्काळ फळबागा­ंच्या व उन्हाळी पिका­ंच्या नुकसानीचे पंचन­ामे करून भरीव मदत जा­हीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद