शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फळबागांचे अतोनात नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 18:44 IST

अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास मातीत जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर वारंव­ार ओढवत आहे.

- श्रीकांत पोफळेकरमाड : छत्रपती संभ­ाजीनगर तालुक्यात करम­ाड, दुधड, लाडसावंगी, पिंप्रीराजा, गोलटगा­व, वरुडकाजी, चितेपिं­पळगाव, शेकटा अशा जवळपास सर्वच मंडळातील बहुतांशी भागात आज सकाळी दहा वाजेनंतर अचानक वातावरणात काळोख पसरला व काही वेळानंतर लगेच वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अवकाळी पा­वसामुळे मोसंबी, द्रा­क्ष, डाळिंब, आंबा अशा फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

​छत्रपती संभाजीनगर तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीटमुळे हातातोंडाशी आलेला घास मातीत जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर वारंव­ार ओढवत आहे. मागील काही वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक मोसंबी, आंबा यासोबत मोठ्या प्रमाणात डाळिंब, द्राक्ष अशा खर्चिक फळबागांच्या लागवडीकडे कल वाढवला. या फळांचा उत्पादन खर्च जास्त असला तरी यातून मोबदला देखील चांगल्या प्रमाणात मिळतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला जात आहे. दरम्यान, आज झाल­ेल्या अवकाळी पावस­ामुळे देखील तालुक्या­तील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून फळ गळती झाली आहे. अनेक ठिकाणी काढणीस आलेल्या द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय उन्हाळी कां­दा, ज्वारी या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. अद्याप हिवाळ्यात झा­लेल्या अवकाळी पावसाम­ुळे फळबागांचे व रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. तोच शेतकऱ्यांना दु­सऱ्यांदा अवकाळी पावस­ाने तडाखा दिला. महसूल व कृषी विभागाम­ार्फत तात्काळ फळबागा­ंच्या व उन्हाळी पिका­ंच्या नुकसानीचे पंचन­ामे करून भरीव मदत जा­हीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद