शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

वाळूज महानगर औद्योगिक क्षेत्रातील कंत्राटींचे आरोग्य वार्‍यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 12:42 IST

औद्योगिक क्षेत्रातील हंगामी कामगारांना कारखान्याकडून आरोग्यसेवा दिलीच जात नाही. तात्पुरते प्रथमोपचारावरच वेळ मारून नेण्याचे प्रकार सुरू आहेत.

ठळक मुद्देकारखान्यात प्रशिक्षित कामगारांची संख्या कमीच ठेवून हंगामी कामगारांकडून कामे करून घेण्यावर सध्या भर आहे.कोणत्यातरी खाजगी दवाखान्यात आरोग्यसेवा कागदोपत्री दिली जात असल्याचा आरोप हंगामी कामगारांतून होत आहे. 

- साहेबराव हिवराळे 

वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : औद्योगिक क्षेत्रातील हंगामी कामगारांना कारखान्याकडून आरोग्यसेवा दिलीच जात नाही. तात्पुरते प्रथमोपचारावरच वेळ मारून नेण्याचे प्रकार सुरू आहेत. गंभीर आजारदेखील कागदोपत्रीच दाखविल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रात महिला कर्मचारी संख्या अधिक असून, पाळणाघराची व्यवस्था करण्यात आलेली नाही. 

कारखान्यात प्रशिक्षित कामगारांची संख्या कमीच ठेवून हंगामी कामगारांकडून कामे करून घेण्यावर सध्या भर आहे. कटकटी नको म्हणून ठेकेदारांना कामाचा बोजा विभागून दिला आहे. प्रशिक्षित कामगार मशीनवर काम करीत असेल तर त्याला साथसंगत करताना हंगामी कामगारही जॉबवर्क तयार करतो; परंतु कारखान्यात सुरक्षा साधने व आरोग्यसेवेत हंगामी (कंत्राटी) कामगार कोसोदूर राहिला आहे. कोणत्यातरी खाजगी दवाखान्यात आरोग्यसेवा कागदोपत्री दिली जात असल्याचा आरोप हंगामी कामगारांतून होत आहे. 

वाळूज औद्योगिक क्षेत्र हे जगाच्या नकाशावर नावारूपाला आले असून, देश-विदेशात येथील उत्पादने पाठविली जातात; परंतु कामगारांच्या सुरक्षा व आरोग्याविषयी मोठी अवहेलना केली जाते. कामगार कोणताही असो त्याची आरोग्य तपासणी किमान वर्षातून एकदा व्हावी, अशी महाराष्ट्र कामगार कायद्यात तरतूद आहे. त्याची उघड उघड पायमल्ली कारखान्याकडून होते आहे. 

नाममात्र कामगारांची राज्य कामगार विमा आरोग्यसेवेची नोंदणी केली जाते. भविष्य निर्वाह निधी व इतर फायद्यापासून देखील हे कामगार वंचित राहत आहेत. अनेकदा ठेकेदाराकडे हक्काचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या कामगारांना दमदाटी केली जाते. त्यामुळे अनेकांचे पैसे आणि कामही मिळत नसल्याचे प्रकार वाढले आहेत. काही अप्रिय घटना घडल्यावरच मग गहजब होतो.

कामगारांना आरोग्य सेवा हवीकामगार हंगामी असो की प्रशिक्षित, कामगारांना कामगार नियमानुसार आरोग्यसेवा देणे बंधनकारक आहे, तरीदेखील ठेकेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देत नाही, असे युनियनचे अनिल जाभाडे यांनी सांगितले.  

आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी कारखान्याचीचआरोग्यसेवा ही कामगारांना देणे गरजेचे आहे, महिलांसाठी पाळणाघराचा नियम आहे. कामगार कायद्यात ही तरतूद आहे. सुरक्षा व आरोग्यसेवेबद्दल देखील कारखानदारांनी लक्ष देण्याची जबाबदारी कारखानदाराची आहे, असे औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी स्वप्नील देशमुख यांनी सांगितले.

नियमांचे पालन व्हावेकामगाराला कामावर घेताना त्याची नोंद रीतसर ठेवलीच पाहिजे, कोणत्या पद्धतीचे काम करीत आहे. त्याचीदेखील माहिती असणे गरजेचे आहे. कामगारांना किमान वेतन आणि सेवा देण्यावर कारखानदार व कंत्राटी ठेकेदारांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे कामगार उपायुक्त पौळ म्हणाले. 

कामगार नियमांचे पदोपदी उल्लंघनकामगारांना काम करताना मार लागला तर दवाखान्यात नेऊन प्रथमोचार केले जातात. गंभीर आजाराप्रसंगी तर पदोपदी नियमांचे उल्लंघन करण्यात येते. त्याकडे आरोग्य, सुरक्षा विभागाने लक्ष द्यावे, असे अभाछावा श्रमिक संघटनेचे जगदीश हिवराळे  म्हणाले. 

अनेकांकडे आयडी कार्डच नाहीपोटाची खळगी भरण्यासाठी कारखान्यात मिळेल ते काम करणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्या कामगार व कुटुंबियाला आरोग्यसेवा मिळवून दिली पाहिजे; परंतु अनेकांकडे स्वत:चे कामगार विमा योजनेचे ओळखपत्र (आयडी) देखील नाही. त्यांना सेवा मिळतील कशा? असा प्रश्न ईएसआयधारक कामगार संघटनेचे सचिव प्रकाश जाधव यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादEmployeeकर्मचारीHealthआरोग्य