शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये मुख्याध्यापकांना शालेय पोषण आहाराच्या निधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 19:15 IST

शालेय पोषण आहारासाठी खर्च केलेले पैसे शासनाकडून कधी मिळणार, याकडे जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचे लक्ष लागलेले आहे. आॅगस्ट ते डिसेंबर या काळात जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांनी धान्यादी माल खरेदीसाठी सुमारे ८ कोटी रुपये खर्च केले आहेत. 

औरंगाबाद : शालेय पोषण आहारासाठी खर्च केलेले पैसे शासनाकडून कधी मिळणार, याकडे जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचे लक्ष लागलेले आहे. आॅगस्ट ते डिसेंबर या काळात जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांनी धान्यादी माल खरेदीसाठी सुमारे ८ कोटी रुपये खर्च केले आहेत. 

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत धान्यादी माल शाळास्तरावर पुरवठा करण्यासाठी पुरवठादाराचा शासनासोबत करार झालेला नव्हता. त्यामुळे आॅगस्ट ते डिसेंबर या काळात जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी स्वत:च्या पैशातून धान्यादी मालाची खरेदी केली होती व मुलांना मध्यान्ह भोजन दिले होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सध्या स्वयंपाकी मदतनीस मानधन, इंधन भाजीपाला व धान्यादी मालाचा १४ कोटी ८० लाख रुपये एवढा निधी प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर खर्च केलेल्या पैशाकडे मुख्याध्यापकांचे लक्ष लागले आहे. यासंबंधीची देयके पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे मुख्याध्यापकांनी सादर केलेली आहेत; परंतु ती अद्यापही जि.प. शिक्षण विभागाला प्राप्त झालेली नाहीत. देयके प्राप्त झाल्यास संबंधितांची बिले निकाली काढली जातील, असे पोषण आहार विभागाचे वरिष्ठ लेखाधिकारी राजेंद्र खाजेकर यांनी सांगितले.

मध्यान्ह भोजन दप्तरांची पडताळणी सुरूप्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी डाटा एन्ट्री आॅपरेटर नेमण्याचे आदेश होते. त्यानुसार जिल्ह्यात ९ पंचायत समित्यांमध्ये ९, जि.प. मुख्यालयात आणि मनपात प्रत्येकी १, असे एकूण ११ पदे मंजूर होती. यापैकी सध्या जि.प. मुख्यालयात एकच डाटा एन्ट्री आॅपरेटर कार्यरत आहे. केंद्र आणि राज्य शासनाने मध्यान्ह भोजन योजनेचा एकूण १४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यानुसार पोषण आहार विभागाचे अधिकारी राजेंद्र खाजेकर, कुलकर्णी हे आपल्या सहकार्‍यांसह शाळांना भेटी देऊन या योजनेसाठी प्राप्त तांदूळ, धान्यादी माल, बचत गटांच्या स्वयंपाकी (मदतनीस) आदींच्या नोंदीची तपासणी करीत आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाzpजिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळा