शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

भूखंड माफियांचा कहर; पाझर तलावात टाकली जातेय प्लॉटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 7:49 PM

पिचिंगचे दगडही जाताहेत चोरीला

ठळक मुद्देसिंचन विभागाने लक्ष देण्याची गरज

वाळूज महानगर : वडगावच्या पाझर तलावात चक्क प्लॉटिंग पाडली जात असून, काही लोकांनी सिमेंट खांब रोवून संरक्षक भिंतीचे काम सुरूकेले आहे. याकडे जिल्हा प्रशासनासह सिंचन विभागाने लक्ष देण्याची मागणी सजग नागरिकांतून केली जात आहे.  

१९७२ मध्ये शासनाने पाझर तलावाची निर्मिती केली. यावेळी शासनाने तलावात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला दिला; परंतु तलावात गेलेली जमीन सातबाऱ्यावरून कमी झाली नाही. विशेष म्हणजे संबंधित जि.प.च्या सिंचन विभागाने तलावाची हद्दही निश्चित केलेली नाही. यासाठी यापूर्वी ग्रामपंचायतीने सिंचन विभागाला पत्रव्यवहारही केला आहे; परंतु ग्रामपंचायतीच्या या पत्राकडे सिंचन विभागाने लक्ष दिले नाही. तलावात गेलेल्या जमिनीवर काही जण सातबाऱ्याच्या आधारे मालकी हक्क सांगत असून, त्यावर प्लॉटिंग पाडली जात आहे. सध्या साजापूर रस्त्यावर तलावातच बिनधास्तपणे प्लॉटिंग टाकली जात आहे. तलावात काहींनी प्लॉटिंग करून संरक्षण भिंती बांधून घेतल्या आहेत. २०१२-१३ मध्ये ग्रामपंचायतीने ५ लाख रुपये खर्च करून तलावाची उंची वाढविली होती. तसेच पाळूला दगडाची पिचिंग केली होती; परंतु मुरूममाफिया तलावातील मुरमाबरोबरच पाळूचे दगडही घेऊन जात आहेत. भविष्यात मोठा पाऊस झाल्यास पाळू फुटून तलावातील पाणी गावात शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे तलावातील अतिक्रमण रोखण्याची गरज आहे. या विषयी सरपंच उषा एकनाथ साळे म्हणाल्या की, ग्रामपंचायतीने सिंचन विभागाकडे तलावाचे क्षेत्र मोजून देण्याची मागणी केली आहे; परंतु सिंचन विभागाकडून प्रतिसाद मिळत नाही. 

तलावाचे पाणी दूषित होण्याचा धोका तलावालगत अनेक कंपन्या झाल्या आहेत. यातील अनेक कंपन्यांचे सांडपाणी तलावात सोडले जात आहे. आता तर तलावातही प्लॉटिंग पाडली जात आहे. कंपन्या व नागरी वसाहतींचे सांडपाणी तळ्यात सोडले जाऊ शकते. त्यामुळे भविष्यात तलावाचे पाणी दूषित होण्याचा धोका आहे, असे तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा साळे यांनी सांगितले.

शासनाने लक्ष घालावे भांगसीमाता गड, साजापूर या वरच्या भागातून येणारे पाणी तलावात साचत होते. तलावामुळे गावाला पाणी मिळत होते. अतिक्रमणामुळे तलावातील जागा संपत चालली आहे. शासनाने ठोस उपाययोजना करावी, असे माजी उपसरपंच सुनील काळे यांनी सांगितले.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग