शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट व्हायरल; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 13:32 IST

अशा पोस्ट लाईक, शेअर करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाईल

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीदरम्यान आणि नंतरही काही द्वेष पूरक प्सोत व्हायरल दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल अअशा पोस्ट निदर्शनास

औरंगाबाद : फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून दोन भिन्न जाती-धर्मांच्या लोकांमध्ये द्वेष निर्माण करणाऱ्यांविरोधात शहरातील तीन पोलीस ठाण्यांत वेगवेगळे गुन्हे पोलिसांनी नोंदविले. शहराची शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कोणीही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये अथवा अशा पोस्ट लाईक, शेअर करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि नंतरही काही लोक सोशल मीडियावर दोन समाजांत तेढ आणि द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य करून अश्लील भाषेत बोलून दोन भिन्न समाजांतील काहींनी फेसबुकवर पोस्ट टाकल्या. या पोस्टवर उभय समाजातील लोकांनी परस्परविरोधात प्रतिक्रिया नोंदविल्या. या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. तसेच दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल, अशा प्रकारच्या व्हिडिओ क्लीप तयार करून त्या व्हायरल केल्या जात आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी उस्मानपुरा, जिन्सी आणि सिटीचौक पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे नोंदविले. 

पोलिसांची करडी नजर शहराची सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याच्या उद्देशाने दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे व्हिडिओ अथवा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर सायबर पोलिसांची करडी नजर आहे. जो कोणी आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करील, लाईक करणे, शेअर करील आणि कमेंट करील त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल.    - चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद