शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

दिवाळीपूर्वी हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित होणार; जुन्या शहराची पाण्याची चिंता मिटणार

By मुजीब देवणीकर | Updated: August 12, 2023 19:06 IST

हर्सूल जलशुद्धीकरण केंद्राचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या केंद्रामुळे जुन्या शहराला दररोज १० एमएलडी पाणी मिळेल.

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल तलावातून दररोज १० एमएलडी पाणी घेण्याची यंत्रणा मनपाने मागील वर्षी उभी केली; मात्र जलशुद्धीकरण केंद्र छोटे पडत असल्यामुळे अतिरिक्त पाणी उचलणे शक्य होत नव्हते. त्यामुळे तातडीने जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूलाच नव्याने ७.५ द.ल.लि. क्षमतेचा फिल्टर प्लँट उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये जेरीमेशन फाउंटन, क्लॅरिफ्लॉक्युलेटर, फिल्टर हाऊस व पंप याचा समावेश असून, दिवाळीपूर्वी जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित होणार असून, जुन्या शहराला दहा एमएलडी पाणी मिळेल.

उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे हर्सूल तलावातून अतिरिक्त पाणी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मागील वर्षीच स्वतंत्र जलवाहिनी टाकून दिली. हर्सूलच्या जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी येत आहे. जलशुद्धीकरण केंद्रात ५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होऊ शकते. याच ठिकाणी दहा एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यास मंजुरी दिली. ७.५ द.ल.लि. क्षमतेच्या फिल्टर प्लँट उभारण्यासाठी ३ कोटी ४७ लाख ५७ हजार ५०० रुपये खर्च होणार आहेत. व्ही.आर.महाजन या कंत्राटदार एजन्सीमार्फत काम सुरू आहे.

पाणीपुरवठ्याची क्षमता वाढेलहर्सूलमध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या फिल्टर प्लँटअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. पाणीपुरवठ्यासाठी लागणारी यंत्रसामग्रीही मागविण्यात आली असून, या केंद्रामुळे जुन्या शहरातील १४ वॉर्डांना मुबलक प्रमाणात पाणी देता येईल. दररोज दहा एमएलडी पाणीपुरवठा या केंद्रातून करता येईल. सध्या जायकवाडी ते नक्षत्रवाडी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली जात असल्यामुळे किमान ८० एमएलडी पाणी शहरात येईल. त्यामुळे उन्हाळ्यात शहराला एक दिवसाआड पाणी देता येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका