शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

हर्सूल कारागृह : पाणावलेल्या डोळ्यांनी बंदिवानांनी घेतली लेकरा-बाळांची ‘गळाभेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:22 AM

‘मत पुछो हाल इस कैद का, आसान नहीं एक भी दिन तुम्हारे बिना इस जेल का’ असे म्हणत बंदिवानांनी अनेक महिन्यांनंतर चिमुकल्यांच्या घेतलेल्या ‘गळाभेटी’ने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे कारागृहाच्या भिंतींनाही मायेचा पाझर फुटला. निमित्त होते हर्सूल मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारे बंदी आणि त्यांच्या १६ वर्षांखालील मुलांची ‘गळाभेट’ या उपक्रमाचे.

ठळक मुद्देकठोर भिंतींनाही फुटला मायेचा पाझर

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘मत पुछो हाल इस कैद का, आसान नहीं एक भी दिन तुम्हारे बिना इस जेल का’ असे म्हणत बंदिवानांनी अनेक महिन्यांनंतर चिमुकल्यांच्या घेतलेल्या ‘गळाभेटी’ने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे कारागृहाच्या भिंतींनाही मायेचा पाझर फुटला. निमित्त होते हर्सूल मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारे बंदी आणि त्यांच्या १६ वर्षांखालील मुलांची ‘गळाभेट’ या उपक्रमाचे.हर्सूल कारागृहात मंगळवारी (दि.२७) सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १११ कैद्यांनी आपल्या मुलांसोबत दोन तास घालविले. छोट्याशा चुकीपायी, क्षणभराच्या रागामुळे भोगाव्या लागणाºया शिक्षेने बाप-लेकरांमध्ये निर्माण झालेला दुरावा कारागृह प्रशासनाने गळाभेट या उपक्रमातून दूर केला. कार्यक्रमप्रसंगी कारागृह उपमहानिरीक्षक (मध्य विभाग) राजेंद्र धामणे, कारागृह अधीक्षक बी. आर. मोरे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी. डी. काळे यांची उपस्थिती होती.शिक्षेमुळे कोणी सहा महिने, कोणी वर्ष, तर कोणी त्यापेक्षा अधिक वर्षांपासून मुलांपासून, कुटुंबापासून दूर झालेले होते. या उपक्रमाच्या निमित्ताने चिमुकल्यांना पाहून बंदिवानांतील पिता वेगळ्याच दुनियेत हरवला होता.डोळे भरून वडिलांना पाहण्यात मुलेही हरखून गेली होती. नकळत पाणावलेले, भेटीने भरून आलेले एकमेकांचे डोळे जो-तो पुसत होता. अश्रू भरल्या डोळ्यांनी मुले बºयाच वेळ पित्याच्या गळ्यातच पडून होती. सहा महिन्यांच्या आतील मुलांसोबत कु टुंबातील इतर सदस्यही सोबत आले होते. त्यामुळे मुलांबरोबर पत्नी, आई, बहीण, वडिलांचीही अनेक महिन्यांनंतर भेट झाल्याचे सुख बंदिवानांना मिळाले. एकत्र जेवणाचा आनंदही घेता आला. दोन तासांनंतर कारागृहातून परतानाही अश्रूंचा बांधच फुटला. जड पावलांनी जो-तो कारागृहाबाहेर पडला.यशस्वीतेसाठी वरिष्ठ तुरुंग अधिकारी ए. एस. गोसावी, आसद मोमीन, तुरुं ग अधिकारी आर. व्ही. उन्हाळे, बी. व्ही. मंचरे, सी. वाय. तायडे, पी. बी. रहेपाडे, विजय सोळंके, विजय मेश्राम आदींनी परिश्रम घेतले.महाराष्ट्रातील कैदी पुढे गुन्हेगार बनत नाहीतअन्य राज्यांतील कारागृहात जाणारे कैदी पुढे गुन्हेगार बनतात; परंतु महाराष्ट्रात असे नाही. गळाभेट उपक्रमामुळे कैद्यांमधील तणाव कमी होण्यास मदत होते. विशेषत: रजा न मिळणाºया कैद्यांना कुटुंबाला भेटून समाधान होते, आनंद मिळतो, असे कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे म्हणाले.