शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता विवाहितेचा परदेशात नेऊन पतीकडून छळ; सातारा ठाण्यात गुन्हा दाखल

By राम शिनगारे | Updated: October 6, 2022 19:15 IST

 वाहन खरेदीसाठी ७ लाख रुपयांची मागणी

औरंगाबाद : दोन वर्षांपुर्वी लग्न झालेल्या अभियंता विवाहितेचा परदेशात नेऊन पतीने छळ केला. त्यानंतर अचानकपणे मायदेशी परत आणून पासपोर्टसह इतर कागदपत्रे काढून घेतली. दसऱ्याच्या सणाला चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून ७ लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. ती पूर्ण झाली नसल्यामुळे बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन नवऱ्यासह सात जणांच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

अभियंता असलेल्या विवाहितेचा ३ ऑगस्ट २०२० रोजी अमोल नामदेव आढावे (रा. सह्याद्रीनगर, सातारा परिसर) याच्यासोबत नोदंणी पद्धतीने विवाह झाला होता. सुरुवातीचे काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्यांनी माहेरहुन घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी मागणी केली. मुलीला त्रास होऊ नये म्हणुन विवाहितेच्या वडिलांनी काही रक्कम दिली. त्यानंतरही मारहाणीसह मानसिक त्रास सुरुच राहिला. अमोल आढावे याला कंपनीमार्फत सिंगापुरला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा त्याने विवाहितेलाही नौकरीचा राजीनामा देण्यास भाग पाडून सोबत नेले. त्याठिकाणीही अताेनात छळ सुरुच ठेवला. २८ सप्टेंबर रोजी अचानकपणे मायदेशी परत आणले. तसेच दसरा सणानिमित्त चारचाकी गाडी घ्यायची असल्यामुळे पैसे आणण्यासाठी दुसऱ्याच दिवशी माहेरला पाठवुन दिले. त्यानंतर चार दिवसांनी वडील विवाहितेला घेऊन सासरी गेले.

सासरच्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाच अपमानित केले. त्यामुळे विवाहितेला सासरी सोडून वडील परत गेल्यानंतर नवरा अमोल याच्यासह सासरा नामदेव, दीर राहुल, नंदोई सिद्धार्थ जमधडे यांच्यासह सासु, जाऊ आणि नणंदेने बेदम मारहाण केली. ११२ वर मदतीसाठी संपर्क साधला असता मोबाईल काढून घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सातारा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सोडवणूक करीत ठाण्यात आणले. त्याठिकाणी मेडिकल मेमो देऊन आई-वडिलांच्या ताब्यात सोपविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक शंकर शिरसाठ करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद