शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

५५ वर्षांपासूनच्या अतिक्रमाणावर हातोडा; मनपाची कारवाई म्हणजे गरिबांचा छळ असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:25 IST

''आम्ही म्हणतो १०० नाही, ११० फूट रस्ता घ्या, पण गोरगरिबांना उद्ध्वस्त करू नका. रस्ता घ्या, पण रोजगार हिरावू नका.''

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी बसस्टॉप परिसरात गेल्या ५५ वर्षांपासून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांवर शुक्रवारी सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. मनपाच्या पथकाने १०० मीटरपेक्षा अधिक आत घुसून दुकाने, व्यावसायिक जागा जमीनदोस्त केल्या. या कारवाईमुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले असून, त्यांच्या पोटावर लाथ मारली आहे, अशा भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या.

या ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी एमआयडीसीची हद्द होती, तत्कालीन आमदार डॉ. कल्याण काळे आणि तत्कालीन उद्योगमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कार्यकाळात अतिक्रमणधारकांना नियमाप्रमाणे प्लॉट देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र, सत्ता परिवर्तनामुळे हा निर्णय अंमलात आला नाही. यानंतर देखील स्थानिक नागरिकांनी सिडकोकडे पैसे भरून नियमितपणे जागा मिळावी, यासाठी प्रयत्न केले. पण, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि शुक्रवारी अचानकपणे मनपाने अतिक्रमणाच्या नावाखाली ही कारवाई केली.

माजी नगरसेवक बाबासाहेब डांगे आणि भाऊसाहेब जगताप यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत मनपाची ही कारवाई म्हणजे गरिबांचा छळ असल्याचा आरोप केला. आम्ही म्हणतो १०० नाही, ११० फूट रस्ता घ्या, पण गोरगरिबांना उद्ध्वस्त करू नका. रस्ता घ्या, पण रोजगार हिरावू नका.

विशेष म्हणजे, शुक्रवारी झालेल्या कारवाईत भाजप आमदार अतुल सावे, नारायण कुचे व इतर कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला. सत्तेचा वापर करून गोरगरिबांवर अन्याय केला जात आहे. भाजप आमदारांनी मुकुंदवाडीतील स्थानिक लोकांना त्यांच्या व्यवसायातून हुसकावून लावले, असा आरोप माजी नगरसेवकांनी केला.

या अन्यायाच्या विरोधात आता व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला आहे. शनिवारी (२१ जून) मुकुंदवाडी परिसरातील व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटना यांनी अतिक्रमणविरोधी अन्यायकारक कारवाईचा निषेध करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.

अंगावर रॉकेल घेत अतिक्रमणाला विरोधअतिक्रमणविरोधी पथकाने संजयनगर गल्ली नं.१ मध्ये राजेश पवार यांचे घर पाडण्यास सुरुवात केली. तेव्हा राजेशने पथकाला अडविण्याचे खूप प्रयत्न केले; पण पथकातील कर्मचारी ऐकण्याच्या मनःस्थिती नव्हते.माझे अख्खे कुटुंब उघड्यावर आणून तुम्हाला काय साध्य करायचे आहे. नोटीस दाखवा, मगच घराला हात लावा. २० वर्षांपासून आम्ही कर भरतो. आमचे घर आताच कसे अतिक्रमणात आले, असे प्रश्न करीत शेवटी राजेशने रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

कोट्यवधींचे नुकसानशुक्रवारी २२९ अतिक्रमणे पाडण्यात आली. यातील बहुतांश दुकानांमधील सामानही व्यापाऱ्यांना काढता आले नाही. त्यामुळे किमान ८ ते १० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज या भागातील व्यापाऱ्यांनी वर्तविला. सामान काढण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी दिला असता तर एवढे नुकसान झाले नसते, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.

दुचाकी वाहने जप्तमुकुंदवाडी स्मशानभूमीला लागून एक जुन्या दुचाकी विक्रीचे दुकान होते. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी एका मोठ्या वाहनात सर्व दुचाकी भरून गरवारे स्टेडियम येथे नेल्या. त्यानंतर त्यांचे शेड जमीनदोस्त केले.

बेघर करण्याच्या आदेशाने मन हेलावलेया घरात आम्ही उद्याचे स्वप्न बघितले होते, पण आता आमच्या डोक्यावरचे छप्पर हिरावले जातेय, या शब्दांत संजयनगर गल्ली नंबर १ मधील रहिवासी आकाश गतखणे यांनी मनपाच्या कारवाईविरोधात आपल्या व्यथा मांडल्या. गतखणे कुटुंब गेल्या २५ ते ३० वर्षांपासून या परिसरात राहत असून, त्यांनी आपल्या राहत्या घरातच वॉशिंग

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर