शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

निम्मा पावसाळा संपला, तरी प्रतीक्षा

By admin | Updated: August 8, 2016 00:27 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू असल्यामुळे समाधान व्यक्त होत असले तरी मराठवाड्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांची अवस्था मात्र अजूनही नाजूकच आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू असल्यामुळे समाधान व्यक्त होत असले तरी मराठवाड्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांची अवस्था मात्र अजूनही नाजूकच आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटल्यावरही विभागातील लघु प्रकल्पांमध्ये आतापर्यंत सरासरी २३ टक्के आणि मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी १७ टक्केच पाणीसाठा होऊ शकला आहे. मराठवाड्यातील सुमारे ७५ टक्के लघु आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा अजूनही जोत्याच्याच जवळपास आहे.मराठवाड्यातील पाणीसाठा यंदा पूर्णपणे संपला होता. त्यामुळे एप्रिलपासूनच मराठवाड्यातील हजारो गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विभागातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली. विभागातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात आठवडाभरात तब्बल ३८ टक्के पाणीसाठा झाला आहे; परंतु असे असले तरी आतापर्यंत झालेला पाऊस पाहता उर्वरित धरणांमध्ये पुरेसे पाणी आलेले नाही. पावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. परंतु आतापर्यंत धरणांमध्ये पन्नास टक्केही साठा झालेला नाही.मराठवाड्यात एकूण ७३२ लघु प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये आतापर्यंत सरासरी १७ टक्के इतकाच पाणीसाठा होऊ शकला आहे. वरीलपैकी तब्बल ४९६ सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. नांदेड जिल्ह्यात मात्र ८० पैकी ४९ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्पांच्या परिस्थितीतही फारशी सुधारणा झालेली नाही. मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी केवळ दहा प्रकल्पांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा होऊ शकला आहे. या दहा प्रकल्पांत नांदेड जिल्ह्यातील चार प्रकल्पांचा समावेश आहे.