शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

भू-जल पातळी १२ मीटरने खालावली !

By admin | Updated: August 10, 2015 00:57 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील तीन वर्षेपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत आहे. परिणामी भू-जल पातळी कमालीची खालावली आहे. भूजलसर्वेक्षण विभागाच्या वतीने

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील तीन वर्षेपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत आहे. परिणामी भू-जल पातळी कमालीची खालावली आहे. भूजलसर्वेक्षण विभागाच्या वतीने आॅगस्ट महिन्यांच्या पहिल्या आठवडयात आठ तालुक्यात विविध विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार भू-जलपातळी तब्बल १२.३४ मिटरपर्यंत खोल गेली आहे. जिल्ह्यात मागील काही वर्षांत बोअरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीउपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. असे असतानाच तीन-चार वर्षांपासून पावसाचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे जलस्त्रोतांसोबतच भू-जल पातळीतही अपेक्षित प्रमाणात वाढली नाही. परिणामी ऐन पावसाळयात अनेक गावांतील सार्वजनिक जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे संबंधित गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या टँकरची संख्या १४९ वर जावून ठेपली आहे. पाऊस वेळेत न पडल्यास ही संख्या आणखी वाढणार आहे. मागील पाच वर्षांतील खालावलेलया सरासरी भूजल पातळीचा विचार केला असता जवळपास साडेतीन टक्क्यांनी अधिक खोल गेली आहे. ही बाब सर्वांसाठीच चिंतेची मानली जात आहे. त्यामुळे भू-जल पातळी उंचावण्यासाठी आता कठोर पाऊले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. भू-वैज्ञानिक कार्यालयाकडून जिल्ह्यातील विविध ११४ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असता भूम तालुक्याची भूजल पातळी तब्बल १३.२१ मिटर, कळंब ११.०४, लोहारा ११.५३, उमरगा १२.४९, उस्मानाबाद १२.१२, परंडा १२.८९, तुळजापूर १२.१४ तर वाशी तालुक्याची भूजल पातळीही सर्वाधिक १३.३४ ने खालावली आहे. आठही तालुक्यांची सरासरी विचारात घेता भूजल पातळी १२.३४५ मिटरने खोल गेली आहे. सर्वाधिक चिंताजनक स्थिती वाशी तालुक्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे भू-जल पातळी उंचाविण्यासाठी आता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)