शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीचा फंडा ! पर्यटनस्थळी नवरदेव तिकीट काढण्यास गेला, इकडे नववधू दागिने घेऊन फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 16:47 IST

मध्यस्थ दोघेही नवरदेवाकडील नातेवाईकांचे फोनघेणेही टाळत आहेत.

- सुनील घोडके

खुलताबाद: लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी दौलताबाद किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेली नववधू नवरदेवाला सोडून फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २९ मार्च रोजी झाली असून या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पूर्वी कुठलीही ओळख नसताना केवळ मध्यस्थीने झालेला विवाह औटघटकेचा ठरलाच पण दागिने आणि पैस्यांची फसवणूकही झाल्याने नवरदेवाकडील मंडळीत संताप व्यक्त होत आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील राजेश प्रकाश लाटे या मुलास बबन म्हस्के ( रा. जळगाव ) व आशाबाई भोरे (मुलीची मावशी, रा. अंजनगाव सुर्जी जि. अमरावती) यांनी लग्नासाठी जळगाव येथील मुलीचे स्थळ आणले. बोलणी झाल्यानंतर शुभांगी प्रभाकर शिंदे या मुलीसोबत राजेशचे २६ मार्च २०२२ रोजी दौलताबाद येथील दत्तमंदीरात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पडले. लग्नासांठी नवरदेवाच्या नातेवाईकांनी मुलींच्या नातेवाईकांना १ लाख ३० हजार रूपये रोख दिले. तसेच लग्नात नवरी मुलीच्या अंगावर ७० हजार रूपयांचे दागदागिणे घातले. लग्नखर्च ही मुलाकडील नातेवाईकांनी केला. त्यानंतर नवरदेव - नवरी २७ मार्च रोजी सातारा खंडोबा, खुलताबाद, वेरूळ आदी ठिकाणी देवदर्शनही करून आले. तर २९ मार्च रोजी नवरदेव - नवरी यांच्या विवाहनिमित्त सत्यनारायण महापुजा करण्यात आली. त्यानंतर दोघेही दौलताबाद येथील देवगिरी किल्ला पाहण्यासाठी गेले.

यावेळी नवरदेव राजेश किल्ला परिसरात तिकीट काढण्यासाठी गेला. तिकीट काढून परत आला असता नवरी जागेवर नव्हती. शोध घेतला असता नववधू एका बोलेरा गाडीतून फरार झाली. राजेशने मध्यस्थ आशाबाई भोरे व बबन म्हस्के यांना नववधू पळून गेल्याचे सांगितले. त्यानंतर दोघेही नवरदेवाच्या नातेवाईकांचे फोनघेणे ही टाळत आहेत. लग्नाचे खोटे नाटक करून १ लाख ३० हजार रूपये लुबाडून, ७० हजारांचे ऐवज घेवून नववधू फरार झाल्याची तक्रार दौलताबाद पोलीस ठाण्यात नवरदेवा ने दिली. या प्रकरणी पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नAurangabadऔरंगाबाद