शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नवरदेव बोहल्यावर चढला अन् नवरीला आई-वडिलांनीच ठेवले डांबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 17:02 IST

दोघांनीही पळून जाऊन लग्न केले आहे, नातेवाईकांनी रीतसर लग्न लावून देतो म्हणून बोलावून घेतले आणि ....

वैजापूर (औरंगाबाद ) : लग्न म्हटले की धमाल, मौजमजा, मित्रमंडळी, नातेवाइकांतील आनंदाचा क्षण. लग्नाचा दिवस हा वधू-वरांच्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव असतो. मात्र, बुधवारी शहरात आयोजित लग्न समारंभात नवरदेव व त्यांच्या नातेवाइकांना वेगळाच अनुभव आला. नवरीच्या आई-वडिलांनी चक्क मुलीला (वधूला) घरातच डांबून ठेवले. नवरदेवाला हळदीच्या अंगावर पोलीस ठाणे गाठावे लागले. रात्री उशिरापर्यंत यावर तोडगा काही निघाला नव्हता.

तालुक्यातील तिडी येथील एक युवक हा वैजापुरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्यावेळी त्याचे वर्गातील एका युवतीशी प्रेम जुळले. प्रेमाच्या आणाबाका घेत त्यांनी घरच्यांचा विरोध करून विवाह केला. दोघेही घराबाहेर पळून गेले. त्यानंतर त्यांनी रीतसर नोंदणी पद्धतीने विवाह केला. तोपर्यंत मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद वैजापूर पोलीस ठाण्यात केली. मात्र, दोघेही सज्ञान असल्याने नातेवाईक काही करू शकले नाही. मुला-मुलीने पळून जाऊन लग्न केल्याची खंत दोघांच्या आई-वडिलांना होती. समाजात व नातेवाइकांत बदनामी होईल. म्हणून त्यांनी समेट घडवून आणला. दोघांच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत रीतसर लग्न लावण्याचा निर्णय कुटुंबीयांकडून घेतला गेला. बुधवारी लग्नाची तारीख होती. दोन्ही कुटुंबीयांनी सर्व नातेवाइकांना आमंत्रण देऊन लग्नाला पाचारण केले. वैजापुरात विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले होते. सकाळपासूनच दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांची धावपळ सुरू होती. मित्र, सगेसोयरे, मामा, मावशी व मित्रमंडळी भेटवस्तूंसह लग्नाला हजर झाली. मंडप, जेवणाचीही जोरदार तयारी सुरू होती. पाहुणे मंडळी जेवणाचा आस्वाद घेत होते. नवरदेवालाही हळद लावून सजविण्यात आले होते. नवरदेवाची मिरवणूक काढून तो मंडपात आला. बोहल्यावर चढण्यासाठी तो सज्ज असतानाच भलतेच घडले. मुलीच्या आई-वडिलांनी चक्क मुलीला डांबून ठेवत लग्नास नकार दिला.

...अन् नवरदेवाने पोलीस ठाणे गाठले !नवरदेव बोहल्यावर चढला होता. काही वेळातच लग्न लागणार होते; परंतु वधूच्या आई-वडिलांनी तिला घराबाहेर पडूच दिले नाही. आम्हाला लग्न नाही करायचे, अशी भूमिका मुलीचे आई-वडील व नातेवाइकांनी घेतली. त्यामुळे हळद लावून बसलेल्या नवरदेवाच्या पायाखालची वाळू सरकली. आपण फसलो गेल्याचे नवरदेव व नातेवाइकांच्या लक्षात आले. त्यानंतर हळदीच्या अंगावरच नवरदेवाने नातेवाइकांसह पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत वऱ्हाडी मंडळींनी वैजापूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. मात्र, पोलिसांनी हात झटकले. तसेच मुलीच्या आई-वडिलांनी मुलीला घराबाहेरच पडू दिले नाही. त्यामुळे काही नातेवाइकांनी घरी काढता पाय घेतला. रात्री उशिरापर्यंत या विवाहाबाबत तोडगा निघाला नव्हता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न