शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

नवरदेव बोहल्यावर चढला अन् नवरीला आई-वडिलांनीच ठेवले डांबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 17:02 IST

दोघांनीही पळून जाऊन लग्न केले आहे, नातेवाईकांनी रीतसर लग्न लावून देतो म्हणून बोलावून घेतले आणि ....

वैजापूर (औरंगाबाद ) : लग्न म्हटले की धमाल, मौजमजा, मित्रमंडळी, नातेवाइकांतील आनंदाचा क्षण. लग्नाचा दिवस हा वधू-वरांच्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव असतो. मात्र, बुधवारी शहरात आयोजित लग्न समारंभात नवरदेव व त्यांच्या नातेवाइकांना वेगळाच अनुभव आला. नवरीच्या आई-वडिलांनी चक्क मुलीला (वधूला) घरातच डांबून ठेवले. नवरदेवाला हळदीच्या अंगावर पोलीस ठाणे गाठावे लागले. रात्री उशिरापर्यंत यावर तोडगा काही निघाला नव्हता.

तालुक्यातील तिडी येथील एक युवक हा वैजापुरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्यावेळी त्याचे वर्गातील एका युवतीशी प्रेम जुळले. प्रेमाच्या आणाबाका घेत त्यांनी घरच्यांचा विरोध करून विवाह केला. दोघेही घराबाहेर पळून गेले. त्यानंतर त्यांनी रीतसर नोंदणी पद्धतीने विवाह केला. तोपर्यंत मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद वैजापूर पोलीस ठाण्यात केली. मात्र, दोघेही सज्ञान असल्याने नातेवाईक काही करू शकले नाही. मुला-मुलीने पळून जाऊन लग्न केल्याची खंत दोघांच्या आई-वडिलांना होती. समाजात व नातेवाइकांत बदनामी होईल. म्हणून त्यांनी समेट घडवून आणला. दोघांच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत रीतसर लग्न लावण्याचा निर्णय कुटुंबीयांकडून घेतला गेला. बुधवारी लग्नाची तारीख होती. दोन्ही कुटुंबीयांनी सर्व नातेवाइकांना आमंत्रण देऊन लग्नाला पाचारण केले. वैजापुरात विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले होते. सकाळपासूनच दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांची धावपळ सुरू होती. मित्र, सगेसोयरे, मामा, मावशी व मित्रमंडळी भेटवस्तूंसह लग्नाला हजर झाली. मंडप, जेवणाचीही जोरदार तयारी सुरू होती. पाहुणे मंडळी जेवणाचा आस्वाद घेत होते. नवरदेवालाही हळद लावून सजविण्यात आले होते. नवरदेवाची मिरवणूक काढून तो मंडपात आला. बोहल्यावर चढण्यासाठी तो सज्ज असतानाच भलतेच घडले. मुलीच्या आई-वडिलांनी चक्क मुलीला डांबून ठेवत लग्नास नकार दिला.

...अन् नवरदेवाने पोलीस ठाणे गाठले !नवरदेव बोहल्यावर चढला होता. काही वेळातच लग्न लागणार होते; परंतु वधूच्या आई-वडिलांनी तिला घराबाहेर पडूच दिले नाही. आम्हाला लग्न नाही करायचे, अशी भूमिका मुलीचे आई-वडील व नातेवाइकांनी घेतली. त्यामुळे हळद लावून बसलेल्या नवरदेवाच्या पायाखालची वाळू सरकली. आपण फसलो गेल्याचे नवरदेव व नातेवाइकांच्या लक्षात आले. त्यानंतर हळदीच्या अंगावरच नवरदेवाने नातेवाइकांसह पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत वऱ्हाडी मंडळींनी वैजापूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. मात्र, पोलिसांनी हात झटकले. तसेच मुलीच्या आई-वडिलांनी मुलीला घराबाहेरच पडू दिले नाही. त्यामुळे काही नातेवाइकांनी घरी काढता पाय घेतला. रात्री उशिरापर्यंत या विवाहाबाबत तोडगा निघाला नव्हता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न