शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

नवरदेव बोहल्यावर चढला अन् नवरीला आई-वडिलांनीच ठेवले डांबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 17:02 IST

दोघांनीही पळून जाऊन लग्न केले आहे, नातेवाईकांनी रीतसर लग्न लावून देतो म्हणून बोलावून घेतले आणि ....

वैजापूर (औरंगाबाद ) : लग्न म्हटले की धमाल, मौजमजा, मित्रमंडळी, नातेवाइकांतील आनंदाचा क्षण. लग्नाचा दिवस हा वधू-वरांच्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव असतो. मात्र, बुधवारी शहरात आयोजित लग्न समारंभात नवरदेव व त्यांच्या नातेवाइकांना वेगळाच अनुभव आला. नवरीच्या आई-वडिलांनी चक्क मुलीला (वधूला) घरातच डांबून ठेवले. नवरदेवाला हळदीच्या अंगावर पोलीस ठाणे गाठावे लागले. रात्री उशिरापर्यंत यावर तोडगा काही निघाला नव्हता.

तालुक्यातील तिडी येथील एक युवक हा वैजापुरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्यावेळी त्याचे वर्गातील एका युवतीशी प्रेम जुळले. प्रेमाच्या आणाबाका घेत त्यांनी घरच्यांचा विरोध करून विवाह केला. दोघेही घराबाहेर पळून गेले. त्यानंतर त्यांनी रीतसर नोंदणी पद्धतीने विवाह केला. तोपर्यंत मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद वैजापूर पोलीस ठाण्यात केली. मात्र, दोघेही सज्ञान असल्याने नातेवाईक काही करू शकले नाही. मुला-मुलीने पळून जाऊन लग्न केल्याची खंत दोघांच्या आई-वडिलांना होती. समाजात व नातेवाइकांत बदनामी होईल. म्हणून त्यांनी समेट घडवून आणला. दोघांच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत रीतसर लग्न लावण्याचा निर्णय कुटुंबीयांकडून घेतला गेला. बुधवारी लग्नाची तारीख होती. दोन्ही कुटुंबीयांनी सर्व नातेवाइकांना आमंत्रण देऊन लग्नाला पाचारण केले. वैजापुरात विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले होते. सकाळपासूनच दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांची धावपळ सुरू होती. मित्र, सगेसोयरे, मामा, मावशी व मित्रमंडळी भेटवस्तूंसह लग्नाला हजर झाली. मंडप, जेवणाचीही जोरदार तयारी सुरू होती. पाहुणे मंडळी जेवणाचा आस्वाद घेत होते. नवरदेवालाही हळद लावून सजविण्यात आले होते. नवरदेवाची मिरवणूक काढून तो मंडपात आला. बोहल्यावर चढण्यासाठी तो सज्ज असतानाच भलतेच घडले. मुलीच्या आई-वडिलांनी चक्क मुलीला डांबून ठेवत लग्नास नकार दिला.

...अन् नवरदेवाने पोलीस ठाणे गाठले !नवरदेव बोहल्यावर चढला होता. काही वेळातच लग्न लागणार होते; परंतु वधूच्या आई-वडिलांनी तिला घराबाहेर पडूच दिले नाही. आम्हाला लग्न नाही करायचे, अशी भूमिका मुलीचे आई-वडील व नातेवाइकांनी घेतली. त्यामुळे हळद लावून बसलेल्या नवरदेवाच्या पायाखालची वाळू सरकली. आपण फसलो गेल्याचे नवरदेव व नातेवाइकांच्या लक्षात आले. त्यानंतर हळदीच्या अंगावरच नवरदेवाने नातेवाइकांसह पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत वऱ्हाडी मंडळींनी वैजापूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. मात्र, पोलिसांनी हात झटकले. तसेच मुलीच्या आई-वडिलांनी मुलीला घराबाहेरच पडू दिले नाही. त्यामुळे काही नातेवाइकांनी घरी काढता पाय घेतला. रात्री उशिरापर्यंत या विवाहाबाबत तोडगा निघाला नव्हता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न