किराणा माल काही प्रमाणात स्वस्त
By Admin | Updated: August 26, 2015 00:30 IST2015-08-26T00:30:54+5:302015-08-26T00:30:54+5:30
शिरीष शिंदे , बीड दुष्काळामुळे भाजीपाल्याचे भाव वाढत चालले आहे तर दुसऱ्या बाजुला तीन प्रकारच्या दाळी सोडल्या तर इतर किराणा मालातील साहित्य स्वस्त झाले असल्याची बाब

किराणा माल काही प्रमाणात स्वस्त
शिरीष शिंदे , बीड
दुष्काळामुळे भाजीपाल्याचे भाव वाढत चालले आहे तर दुसऱ्या बाजुला तीन प्रकारच्या दाळी सोडल्या तर इतर किराणा मालातील साहित्य स्वस्त झाले असल्याची बाब ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार समोर आली आहे. या वृत्तामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या लोकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
दुष्काळामुळे अन्नधान्य उत्पादन केल्याने बाजारात शेंगादाणे, दाळी यांची आवक घटली असली तरी इतर साहित्य बाहेर राज्यातून येत असल्याने बाजारात माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे बाजारपेठा ठप्प पडल्या असल्याचे व्यापारी सांगत आहेत. ग्राहक दुकानात आले तरी फारशी मोठी खरेदी केली जात नाही. जेवढ लागेल तेवढच खरेदी करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. याचा फटका बाजारपेठेस बसला आहे हे सर्वेक्षणातून समोर आली आहे.
तूर, उडीद, मसूर दाळीचे भाव वाढले
जिल्ह्यात तूर, उडीद, मसूर या दाळींचे उत्पादन नसल्यामुळे व आवक घटल्यामुळे त्यांचे भाव वाढले आहेत.
तूर दाळीची आवक मोठ्या प्रमाणात व्हायची मात्र दुष्काळाचे सावट असल्याने नवीन तुर लागवड झाली नाही. पूर्वी तुर दाळीचे भाव १०० रुपये प्रतिकिलो होते मात्र हेच दर आता १३० ते १४० प्रतिकिलो रुपये झाले आहेत. भाव अनपेक्षितपणे वाढले असल्याने अनेकांना ही दाळ खरेदी करणे अवघड बनले आहे.
तीन महिन्यांपूर्वी उडीद दाळ ७० ते ९० रूपये प्रतिकिलो दरम्यान होती. परंतु आता उडीद दाळीचे भाव १२० रूपये किलो झाले आहेत. ही वाढ जवळपास ५० रूपयांची आहे. तसेच मसूरदाळची आवक हरभऱ्याप्रमाणे कमी झाली आहे. त्यामुळे मसूरदाळ ७५ रूपयांवरून ८५ ते ९० रूपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचली आहे.
साबुुदाना झाला स्वस्त
सध्या सणासुदीचे दिवस असून श्रावण महिना सुरु आहे. त्यातच साबुुदान्याच्या किंमती घटल्या आहेत. पूर्वी साबुुदाणा ६० ते ६५ रुपये प्रति किलो होता. आता त्याचा भाव ५० रुपये प्रति किलो झाला आहे. यामुळे उपवास करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तामिळनाडू राज्यातील सेलम येथे साबुुदान्याचे उत्पादन अधिक झाल्याने भाव उतरले आहेत.
हरभरा वाढला
हरभऱ्याचा प्रतिकिलोचा भाव ४० ते ५० रुपयांच्या दरम्यान होता. तो आता ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. बाजारात हरभऱ्याची आवक कमी झाल्याने हे भाव वाढले.
मूग दाळीचे भाव घसरले
मूग दाळीचे भाव अनपेक्षितरीत्या घसरले आहेत. पूर्वी मूग दाळ प्रती ११० ते १२० रुपये किलो होती. आता हे भाव ८० ते ९० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. नवीन मुगाची आवक झाल्यामुळे हे भाव उतरले असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
मटकी झाली महाग
मटकी काही दिवसांपूर्वी ८० ते ९० रूपये प्रतिकिलो विकली जात होती. परंतु आता हे भाव ११० रूपये प्रतिकिलोवर जाऊन ठेपले आहेत. यामुळे अनेकांनी मटकी खरेदीकडे दुर्लक्ष केले आहे. अनेकांना मटकी खरेदी करणे परवडणारे नाही.
साखरेत अल्पशी वाढ
सहा महिन्यांपूर्वी साखर ३२ रूपये किलो होती. त्यानंतर साखर २२ रूपयांवर गेल्या १५ दिवसांपूर्वी होती. परंतु आता साखर २४ ते २५ रूपये किलोंवर आली आहे. यात फारशी वाढ झालेली नाही.
खोबऱ्यात ४० रूपयांची घट
तीन महिन्यांपूर्वी खोबरे २०० रूपये प्रतिकिलो विकले जायचे. परंतु आता खोबऱ्याचे भाव १५० ते १६० रूपये प्रतिकिलो झाले आहेत.
शेंगदाणे महागले
तीन महिन्यांपूर्वी शेंगदाणा प्रति ६० रूपये किलो होता. आता त्याच्या किंमती ८५ रूपयांवर आल्या आहेत. यात १५ रूपयांची वाढ झाली आहे. पुढील काळात शेंगदाणाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
बासमती तांदूळ झाला स्वस्त
बासमती तांदूळ कायम ८० ते १२० रूपयांदरम्यान असतो. मात्र, यंदा तांदळाच्या किंमती घटल्या आहेत. ४० ते ५० रूपये प्रतिकिलो बासमती तांदूळ विकला जात आहे. यामुळे सर्वसामान्यांना काही काळ तरी बासमती तांदूळ खरेदी करणे बजेटमध्ये असणार आहे. पोहे ३० रूपये किलोवरून ३५ ते ४० रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. जवळपास ५ ते १० रूपयांची वाढ आहे.