शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वनराईला लागली दृष्ट

By admin | Updated: July 12, 2014 00:57 IST

राजेंद्र बेलकर, करमाड औरंगाबाद शहरालगत वाढत जाणारी नागरी वस्ती व एम.आय.डी.सी.मुळे तालुक्यात अतिक्रमणाचा त्रास सर्वत्र वाढतो आहे.

राजेंद्र बेलकर, करमाडऔरंगाबाद शहरालगत वाढत जाणारी नागरी वस्ती व एम.आय.डी.सी.मुळे तालुक्यात अतिक्रमणाचा त्रास सर्वत्र वाढतो आहे. आता या अतिक्रमणाचा प्रवास वृक्षवेलीकडेही होऊ लागल्याने पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड वाढल्याने करमाड, पिंप्रीराजा, वरझडी, वडखा, जसपूर, लाडसावंगी, आडगाव (सरक) व दुधड परिसरातील वनराई नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.करमाड व परिसरातील डोंगरमाथे बोडखे झाले आहेत. वृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन व संरक्षण करण्यासाठी सामाजिक वनीकरण, वनविभाग, वन्यजीव विभाग व कृषी विभाग प्रयत्नशील असतो; परंतु या चारही विभागांच्या नाकर्तेपणामुळे व एकदा वृक्षारोपण करून आपले कर्तव्य संपले या प्रवृत्तीमुळे चोरट्या मार्गाने व दिवसाढवळ्या वृक्षाची तोड चालू आहे.करमाड परिसरात वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करमाड, गाढेजळगाव, मंगरूळ, एकलहेरा, दुधड, बनगाव, जयपूर, नागोणीची वाडी, सटाणा, वडखा व वरझडी या गावच्या डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर वृक्षाची लागवड झाली. येथील वृक्ष चांगले वाढले. रॉकेल व गॅसच्या टंचाईमुळे पर्यायी व्यवस्था म्हणून पर्यायी जळतन म्हणून या लावलेल्या वृक्षाकडे परिसरातील लोकांनी आपला मोर्चा वळविला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षाची कत्तल सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी तालुक्यातील निसर्गप्रेमींकडून होत आहे. हप्तेखोरीकडे लक्ष...जबाबदारीकडे दुर्लक्षसंबंधित अधिकारी व कर्मचारी हप्तेगिरीत बांधले गेल्यामुळे त्यांचे आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होत आहे. याचा फायदा घेत या क्षेत्रातील मंडळी गब्बर होत आहे. लाकडांचे भाव चारशे रुपये प्रति क्विंटल झाल्याने सर्वसामान्य व्यक्तींना हा भाव परवडत नसल्याने रस्त्यावरील व डोंगरावरील दिसेल ते झाड तोडण्याचा सपाटा वाढला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या वृक्षांच्या कत्तलीमुळे परिसरातील वनराई नष्ट होण्याच्या मार्गावर आहे; परंतु याचे वनविभाग व सामाजिक वनविभागाला काही एक सोयरसुतक नाही.वाढत्या शहरीकरणामुळे लाकूडतोड वाढलीएमआयडीसी शेंद्रा क्षेत्र विकसित होत असल्याने काही कंपनीसाठी व हॉटेलसाठी लाकडाची मागणी वाढत चालली आहे. याचा फायदा या क्षेत्रात असलेल्या लाकूडतोड मंडळींनी घेतला. सर्रासपणे बाभूळ, लिंब, जांभूळ व आंबा या झाडांची तोड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सॉ मिलसाठी मोठे लाकूड तर इतरांसाठी जळतण म्हणून लाकडाला चांगला भाव आला आहे. त्यासाठी त्रास नको म्हणून या मंडळींनी वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाला हप्ते चालू करून ट्रक व टेम्पोद्वारे सर्रासपणे लाकडाची वाहतूक सुरु केली, तसेच शेकडो टन लाकडाची साठवणूक सुरु केली आहे.