शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान; आकडेवारी प्रशासनाच्या दप्तरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:53 PM

औरंगाबाद : केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात केल्यानंतर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला ...

ठळक मुद्देमाहितीची जमवाजमव: तांत्रिक अडचणींमुळे उशीर होत असल्याचा दावा

औरंगाबाद : केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात केल्यानंतर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता टाकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला याबाबतची माहिती अजून तरी प्रशासनाच्या दप्तरीच अडकली आहे. महसूल, कृषी तसेच बँकेतील अधिकाऱ्यांच्या ताळमेळात सदरील योजनेची माहिती सोमवारपर्यंत समोर आलेली नव्हती.विभागात आजवर १४ लाख ९६ हजार पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती योजनेच्या अनुषंगाने आॅनलाईन अपलोड केली आहे. त्यातील किती शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे मिळाले, याबाबत कोणतीही माहिती महसूल प्रशासनाला नाही. तसेच गाव, तालुका, जिल्हास्तरावर बँकांमध्ये किती शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले याबाबत मात्र कोणतीही माहिती बँकांकडे उपलब्ध नाही.ज्या शेतकºयांचे आधार कार्डवर जे नाव आहे, तेच नाव बँक खात्यावर असावे. यासह इतर अचूक माहिती गावपातळीवरून भरून घेण्यात येत आहे. त्यातील माहिती चुकीची भरली किंवा आधार कार्ड व बँक खात्यावरील नावांमध्ये फरक आढळला, तर त्या शेतकºयांना निधी मिळण्याबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संबंधित माहिती अपलोड करण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.१७ लाख कुटुंबे पात्र२५ फेब्रुवारीपर्यंत विभागातील १७ लाख ३९ हजार ४७४ कुटुंबे पात्र ठरली आहेत. यातील काही कुटुंबांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. योजनेनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांना या योजनेतून प्रतिकुटुंबास दरवर्षी सहा हजार रुपये तीन टप्प्यांत देण्यात येणार आहेत. अल्पभूधारकांना ही योजना लागू राहणार आहे. ज्या शेतकºयांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्या शेतकरी कुटुंबांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी