शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळकर हत्याकांडातील संशयित शरद कळसकरच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 15:20 IST

या घटनेमागे कोण आहे व ग्रामपंचायत जाळण्याने कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. 

ठळक मुद्देपग्रामपंचायत कार्यालयाला अज्ञात समाजकंटकांनी आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास आग लावली. या आगीत संपूर्ण जुने, नवीन अभिलेखे, संगणक, महत्वाची कागदपत्रे व काही नगदी पैसे जळून खाक झाले

औरंगाबाद : दौलताबादपासून जवळच ऐतिहासिक दौलताबाद किल्याच्या पाठीमागे असलेल्या रामपुरी -केसापुरी ग्रुपग्रामपंचायत कार्यालयाला अज्ञात समाजकंटकांनी आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास आग लावली. या आगीत संपूर्ण जुने, नवीन अभिलेखे, संगणक, महत्वाची कागदपत्रे व काही नगदी पैसे जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दाभोळकर हत्याकांडातील संशयित आरोपी शरद कळसकर याचे हे गाव आहे. या घटनेमागे कोण आहे व ग्रामपंचायत जाळण्याने कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. 

साधारण दोन हजार लोकसंख्येचे हे गाव असून दोन वर्षांपूर्वीच या ग्रामपंचायत कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास गावातील काही शेतकरी शेतात पाणी भरण्यासाठी जात असताना त्यांनी ग्रामपंचायत जळत असल्याचे पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती सरपंच शांताराम वाहुळ, ग्रामपंचायत सदस्य रामनाथ सुराशे, ज्ञानेश्वर पवार यांना दिली. त्यांनी तात्काळ ही माहिती दौलताबाद पोलीस ठाण्याला दिली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक सराफ, उपनिरीक्षक दिनेश सुर्यवंशी, विस्तार अधिकारी एम.सी. राठोड, उपविस्तार अधिकारी शिवाजी सोळुंकी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडने यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे मोहन मुंगसे, हरिभाऊ घुगे, राजेंद्र निकाळजे, प्रशांत गायकवाड, दिनेश मुंगसे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत सर्व अभिलेखे व संगणक जळून खाक झाले होते.

ग्रामसेवक व्ही.पी. क्षीरसागर यांनी सांगितले की, या घटनेमध्ये अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले. आगीत गावातील कराच्या रकमेसह महत्त्वाचे दस्तावेज, कागदपत्र, पूर्णअभिलेखे, संगणक, अभिलेखाचे कपाटे, फर्निचर साहित्य, जलशुद्धीकरणचे रिकामे जार जळून खाक झाले. या समाजकंटकांनी खुर्च्यांची मोडतोड करत सरपंच, उपसरपंच यांच्या नामफलकावर फुल्या मारल्या आहेत. संगणकाची जाळपोळ केल्याने गावातील जन्म, मृत्यू, नमुना आठ, महत्त्वाच्या नोंदी, जुना अभिलेख नष्ट झाला.

घटना नियोजित; विष टाकून कुत्रेही मारलेग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार परिसरातील दोन ते तीन दिवसांपासून सहा ते सात कुत्रे विष टाकून मारण्यात आले. रात्रीसुद्धा दोन कुत्रे मारण्यात आल्याने गूढ वाढले आहे. ही घटना नियोजित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी व पोलीस तळ ठोकून आहेत. आग लावणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCrime Newsगुन्हेगारीfireआगgram panchayatग्राम पंचायत