शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दाभोळकर हत्याकांडातील संशयित शरद कळसकरच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 15:20 IST

या घटनेमागे कोण आहे व ग्रामपंचायत जाळण्याने कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. 

ठळक मुद्देपग्रामपंचायत कार्यालयाला अज्ञात समाजकंटकांनी आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास आग लावली. या आगीत संपूर्ण जुने, नवीन अभिलेखे, संगणक, महत्वाची कागदपत्रे व काही नगदी पैसे जळून खाक झाले

औरंगाबाद : दौलताबादपासून जवळच ऐतिहासिक दौलताबाद किल्याच्या पाठीमागे असलेल्या रामपुरी -केसापुरी ग्रुपग्रामपंचायत कार्यालयाला अज्ञात समाजकंटकांनी आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास आग लावली. या आगीत संपूर्ण जुने, नवीन अभिलेखे, संगणक, महत्वाची कागदपत्रे व काही नगदी पैसे जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दाभोळकर हत्याकांडातील संशयित आरोपी शरद कळसकर याचे हे गाव आहे. या घटनेमागे कोण आहे व ग्रामपंचायत जाळण्याने कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. 

साधारण दोन हजार लोकसंख्येचे हे गाव असून दोन वर्षांपूर्वीच या ग्रामपंचायत कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास गावातील काही शेतकरी शेतात पाणी भरण्यासाठी जात असताना त्यांनी ग्रामपंचायत जळत असल्याचे पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती सरपंच शांताराम वाहुळ, ग्रामपंचायत सदस्य रामनाथ सुराशे, ज्ञानेश्वर पवार यांना दिली. त्यांनी तात्काळ ही माहिती दौलताबाद पोलीस ठाण्याला दिली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक सराफ, उपनिरीक्षक दिनेश सुर्यवंशी, विस्तार अधिकारी एम.सी. राठोड, उपविस्तार अधिकारी शिवाजी सोळुंकी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडने यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे मोहन मुंगसे, हरिभाऊ घुगे, राजेंद्र निकाळजे, प्रशांत गायकवाड, दिनेश मुंगसे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत सर्व अभिलेखे व संगणक जळून खाक झाले होते.

ग्रामसेवक व्ही.पी. क्षीरसागर यांनी सांगितले की, या घटनेमध्ये अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले. आगीत गावातील कराच्या रकमेसह महत्त्वाचे दस्तावेज, कागदपत्र, पूर्णअभिलेखे, संगणक, अभिलेखाचे कपाटे, फर्निचर साहित्य, जलशुद्धीकरणचे रिकामे जार जळून खाक झाले. या समाजकंटकांनी खुर्च्यांची मोडतोड करत सरपंच, उपसरपंच यांच्या नामफलकावर फुल्या मारल्या आहेत. संगणकाची जाळपोळ केल्याने गावातील जन्म, मृत्यू, नमुना आठ, महत्त्वाच्या नोंदी, जुना अभिलेख नष्ट झाला.

घटना नियोजित; विष टाकून कुत्रेही मारलेग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार परिसरातील दोन ते तीन दिवसांपासून सहा ते सात कुत्रे विष टाकून मारण्यात आले. रात्रीसुद्धा दोन कुत्रे मारण्यात आल्याने गूढ वाढले आहे. ही घटना नियोजित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी व पोलीस तळ ठोकून आहेत. आग लावणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCrime Newsगुन्हेगारीfireआगgram panchayatग्राम पंचायत