शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची चुरस वाढली; मातब्बरांकडून वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी शर्थीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 13:56 IST

Gram Panchayat elections : वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या रांजणगाव, जोगेश्वरी, आंबेलोहळ, वाळूज, नारायणपूर, वळदगाव, पंढरपूर, तिसगाव, पाटोदा आदी ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे

ठळक मुद्देया अर्थसंपन्न ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष व गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. या परिसरातील ग्रामपंचायतींना औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर मिळत असतो.

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या ठरणार आहेत. या निवडणुकीत वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी धनदांडग्या मातब्बर उमेदवारांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू करून त्यांना विविध प्रकारचे प्रलोभने दाखविली जात असल्याचे चित्र उद्योगनगरीत पहावयास मिळत आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या रांजणगाव, जोगेश्वरी, आंबेलोहळ, वाळूज, नारायणपूर, वळदगाव, पंढरपूर, तिसगाव, पाटोदा आदी ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. या अर्थसंपन्न ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष व गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. या परिसरातील ग्रामपंचायतींना औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर मिळत असतो. याच बरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती व शासनाकडून विकासकामासाठी ग्रामपंचायतींना मोठा निधी मिळत असल्याने या ग्रामपंचायती अर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळखल्या जातात.

उद्योगनगरीतील ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून डावपेच आखण्याचे काम वेगात सुरू आहे. या निवडणुकीत सरपंच व सदस्यपदी वर्णी लागावी, यासाठी गावपातळीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करीत नामांकन अर्जही दाखल केले आहे. वाळूज, रांजणगाव, जोगेश्वरी, पंढरपूर या ठिकाणी मातब्बर व धनदांडग्या उमेदवारांनी स्वत:बरोबर कुटुंबातील सदस्यांचे अर्ज भरल्याने या मातब्बरांचे समर्थक व सर्वसामान्य नागरिकांत मात्र नाराजीचा सूर उमटत आहे. या मातब्बर उमेदवारांकडून घराणेशाहीला प्राधान्य दिले जात असल्याने त्यांचे समर्थक नाराज असल्याचे चित्र या परिसरात पहावयास मिळत आहे.

वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्न३० डिसेंबरला नामांकन अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर बहुतांश उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहे. आपल्याला वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी, यासाठी मातब्बर धनदांडग्या उमेदवारांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. धनदांडग्या उमेदवारांकडून वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांची मनधरणी सुरू केली असून, त्यांना विविध प्रकारची प्रलोभनही दिली जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ४ जानेवारीला नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी मातब्बर उमेदवारांचा खिसा चांगलाच रिकामा होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक