शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठीच्या योजनेस स्थगिती; शासनाच्या दुटप्पी धोरणाने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 2:04 PM

शासनाने ४ नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार या योजनेची अंमलबजावणी थांबवली आहे.

ठळक मुद्देमागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान देणारी योजना थांबवलीआदिवासी शेतकऱ्यांसाठी याच पद्धतीची योजना सुरू

औरंगाबाद : मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना विहिरीसाठी ३ लाख रुपये अनुदान देण्यात येते. या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला शासनाने स्थगिती दिली आहे, तर दुसरीकडे आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना मात्र पूर्ववत सुरू ठेवली आहे. शासनाच्या या पक्षपाती धोरणाबद्दल समाजात नाराजीचा सूर उमटला आहे.

शेतीचे उत्पन्न वाढवायचे असेल, तर पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. यामुळे शेतात विहीर असल्यास शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा मार्ग सुकर होतो; पण मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने अनेक शेतकऱ्यांना विहीर खोदणे शक्य नाही. अशाच गरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने विशेष घटक योजनेच्या माध्यमातून शेतात विहीर खोदकाम, त्यानंतर बांधकाम, वीज कनेक्शन, विद्युत पंप संच, ठिबक- तुषार सिंचनासाठी तीन लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य केले जाते. याशिवाय शेततळे, विहिरीमधील बोअरसाठीसुद्धा या योजनेतून अर्थसाहाय्य केले जाते. गेल्यावर्षी या योजनेसाठी जिल्हा परिषदेला १४ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. 

या योजनेसाठी दरवर्षी साधारणपणे ऑगस्टपासून मागासवर्गीय शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविले जातात. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची सोडत पद्धतीने निवड केली जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ४ नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार या योजनेची अंमलबजावणी थांबवली आहे. त्यानुसार कृषी आयुक्तालयाने २३ नोव्हेंबरच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जि.प.च्या कृषी विकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात या योजनेची अंमलबजावणी तूर्तास स्थगित करण्याचे कळविले आहे. दुसरीकडे, बिरसा मुंडा ही आदिवासी शेतकऱ्यांसाठी विहीर खोदण्यासाठी अनुदान योजना मात्र, सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

शासनाने हा निर्णय मागे घ्यावाजि.प. कृषी समितीचे सभापती एल.जी. गायकवाड म्हणाले की, शासनाने हा पक्षपाती निर्णय तात्काळ मागे घ्यावा. एकीकडे महाआघाडीचे सरकार शेतकऱ्यांबाब सहानुभूतीची भाषा करते, तर दुसरीकडे मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान देणारी योजना थांबवते. आदिवासी  शेतकऱ्यांसाठी याच पद्धतीची योजना सुरू ठेवते. हा दुटप्पीपणा कशासाठी. निर्णय मागे न घेण्यासाठी आम्ही शासन तसेच कृषी आयुक्तालयाकडे पाठपुरावा करू.  

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीfundsनिधीState Governmentराज्य सरकार