शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

शासनाची मदतीची घोषणा फसवी, शेतकऱ्यांच्या हातात दमडीही नाही; पुन्हा कर्ज घेण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:59 IST

खुलताबादेतील २७ हजार शेतकऱ्यांना दमडीही नाही

- दिलीप मिसाळगल्लेबोगाव (ता. खुलताबाद) : तालुक्यात १ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पंचनामे पूर्ण होऊनही, बुधवारपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसानभरपाईचा एक रुपयाही जमा झालेला नाही. त्यामुळे हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, राज्य शासनाची दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा फसवी ठरल्याचे शेतकरी सांगत आहेत.

तालुका प्रशासनाने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार तालुक्यातील ७३ गावांमधील २७ हजार ८७२ शेतकऱ्यांच्या ३१ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी तहसील प्रशासनाने शासनाकडे २९ कोटी १५ लाख रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. राज्य शासनाने दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम थेट जमा करण्याची घोषणा केली होती; परंतु एक रुपयाही शासनाने अद्याप तालुक्याला दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

मदत मिळालीच पाहिजेपंचनामे झालेत; पण काहीच निष्पन्न नाही. पिकांचं नुकसान झालं, मदत मिळालीच पाहिजे. अधिकारी आले, फोटो काढले; पण त्यानंतर काहीच हालचाल नाही. शेतकरी फसत आहेत.- राहुल चंद्रटिके, शेतकरी, गल्लेबोरगाव

तीन दिवसांत मदतआताच शासनाचा जीआर प्राप्त झाला आहे. आम्ही दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणार आहोत. येत्या दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.- स्वरूप कंकाळ, तहसीलदार

आता पुन्हा कर्ज काढण्याची वेळनुकसान होऊन महिना उलटला तरी मदत मिळाली नाही. शासनाने केलेली घोषणा फसवी ठरली आहे. हातात पैसे नसल्यामुळे आमची दिवाळी अंधारात गेली, आता पुढील शेतीच्या कामांसाठी कर्ज काढण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.

English
हिंदी सारांश
Web Title : False promise of government aid leaves farmers in debt.

Web Summary : Farmers in Khultabad face financial hardship after unfulfilled government aid promises for crop damage. Despite assessments, no funds have been received, forcing them to borrow again for farming.
टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर