शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला शेतक-यांची जात अन् धर्म दाखवून देणार- शंकरअण्णा धोंडगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 20:17 IST

औरंगाबाद : राज्य सरकारने शेतक-यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. मात्र नुसत्या चर्चांमध्येच गुंतवून ठेवत शेतकरी आंदोलनामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : राज्य सरकारने शेतक-यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. मात्र नुसत्या चर्चांमध्येच गुंतवून ठेवत शेतकरी आंदोलनामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला. आता सरकारशी ना चर्चा ना वाटाघाटी. सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणीची कृती करावी अन्यथा सरकाला शेतक-यांची जात अन् धर्म काय असतो हे दाखवून देणार असल्याचा इशारा शेतकरी आंदोलनाचे निमंत्रक शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

राज्य सरकारने शेतक-यांनी केलेल्या आंदोलनानंतर सुकाणू समितीशी चर्चा करताना विविध मागण्या मंजूर केल्या होत्या. या मान्य केलेल्या मागण्यांना मोठा कालवधी उलटला, तरी त्याची अंमलबजावणी केली नाही. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ आक्टोबर रोजी नाशिक येथे राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधी अधिवेशन घेतले होते. या अधिवेशनात किसान मंचतर्फे जनजागृतीसाठी तब्बल २०० सभा घेण्याचे ठरवले. यानुसार जनजागृती केली. मात्र सरकारने शेतक-यांच्या मागण्याविषयी कोणतीही भूमिका घेतली नाही. उलट वेळकाढूपणा करत तोंडाला पाने पुसली असल्याचे शंकरअण्णा धोंडगे यांनी सांगितले. यासाठी आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी औरंगाबादेत राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीला राज्यभरातुन विविध संघटानांचे २६ जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. याचवेळी २५० पेक्षा अधिक तालुकास्तरावरील पदाधिकारीही बैठकीला आले होते. या बैठकीत काही महत्वाचे ठराव घेतले असल्याची माहिती धोंडगे यांनी दिली. यावेळी शेतमजुर प्रतिनिधी आमदार जयदेव गायकवाड,माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेभुर्डे, किशार माथनकर, शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शंकर गोडसे, मानवेंद्र काचोळे, शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, भारत कृषक समाजाचे अविनाश पाठक, स्वाभिमानी संघटनेचे गजानन अहमादाबादकर, माजी आमदार वसंत बोंडे, शिवराज तोंडचिरकर, खेमराज कौर, दत्ता पवार, शिवाजी बनकर, अशोक धारफळकर, मनोज तायडे, बाळासाहेब चºहाटे, विनायक पाटील,सोपान पाटील, मारुती जाधव, मनोहर चंद्रीकापुरे, राजु राऊत, बळवंत देशमुख, विठ्ठलराव , दिलीप धोंडगे, तात्या कृपाळ, सुभाष उभाड, राजेंद्र पवार, गोरख पाटील आदी उपस्थित होते.

राज्यभरात ७ डिसेंबरपासून जेलभरोराज्यभरात ७ नोव्हेंबरपासून ७ डिसेंबरपर्यंत १० लाखांपेक्षा अधिक शेतकरी जिल्हाधिका-यांना इच्छापत्र देणार आहेत. शासनाच्या धोरणाविरोधात सविनय कायदेभंगाच्या सनदशिर व शांततेच्या मार्गाने तुरुंगात जाण्याची इच्छा असल्याचे या इच्छापत्रात म्हटले आहे. यानंतर ७ डिसेंबरपासून राज्यभरात जेलभरो आंदोलन केले जाईल. या आंदोलनातुन शेतक-यांची खरी ताकद  सरकारला दाखवून देण्यात येईल. या आंदोलनात कोणत्याही पक्षाचा झेेंडा असणार नाही. जो शेतकरी असेल त्याने आंदोलनात सहभागी व्हावे. सरकारने मागण्या मंजूर केल्यास ज्याला ज्या पक्षात काम करायचे आहे. त्यासाठी तो शेतकरी मोकळा असेल, असेही धोंडगे यांनी स्पष्ट केले.

काय आहेत मागण्या

शेतकरी संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीत शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, उत्पादन खर्चानुसार कायदेशी हमीभाव, शेतकरी शेतमजुरांना कायद्याने आर्थिक व सामाजिक संरक्षण दिले जावे, पेरणी ते काढणीपर्यंतची कामे मनरेगा अंतर्गत केली जावी, शेतीसाठी केंद्र व राज्य स्तरावर स्वतंत्र अर्थसंकल्प हवा, शेतकरी विरोधा कायदे रद्द करावे, शेतीसाठी इतर व्यावसायांसारखे मल्यांकणाप्रमाणे कर्ज धोरण असावे, सरकारने मागील तीन वर्षात घोषित केलेले विविध अनुदानाची रक्कम बॅक खात्यात जमा करावी आणि शेती पंपाचा विज पूरवठा न तोडता दिलेल्या वचनाप्रमाणे संपूर्ण विज बिल माफ करावे.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद