शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

नोकरीबाह्य तरुणांचे सर्वेक्षण शासनाने करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:40 IST

: सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या नाहीत. उद्योगासाठी त्यांच्याकडे भांडवल नाही. परिणामी, ग्रामीण महाराष्ट्राची पीछेहाट सुरूआहे. शासनाने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या धर्तीवर राज्य शासनाने नोकरीबाह्य तरुणांचे सर्वेक्षण करावे. नोकºया नाहीत असे न सांगता त्या निर्माण कराव्यात, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी दिला.

ठळक मुद्देबोराडे : पुरुषोत्तम भापकर यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन

औरंगाबाद : सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या नाहीत. उद्योगासाठी त्यांच्याकडे भांडवल नाही. परिणामी, ग्रामीण महाराष्ट्राची पीछेहाट सुरूआहे. शासनाने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या धर्तीवर राज्य शासनाने नोकरीबाह्य तरुणांचे सर्वेक्षण करावे. नोकºया नाहीत असे न सांगता त्या निर्माण कराव्यात, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी दिला.विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर लिखित ‘भाऊ-दादी: साथी नव्या युगाचे’, ‘शैक्षणिक षटकार’, ‘माझा शालेय परिपाठ: भाग एक’, ‘शासकीय योजनांचा खजिना: कॉलेज-नॉलेज-व्हिलेज’ या पाच पुस्तकांचे प्रकाशन सोमवारी बोराडे यांच्या हस्ते झाले. मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे व्यासपीठावर राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. बी. ए. चोपडे, प्रकुलगुरूअशोक तेजनकर, माजी विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांची उपस्थिती होती.यावेळी बोराडे म्हणाले की, डॉ. भापकर मनपाचे आयुक्त असताना त्यांनी सर्व्हे करून शाळाबाह्य मुले शोधून काढली होती. मात्र, आज राज्यामध्ये नोकरीबाह्य मुलांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राध्यापक होण्यासाठी एम.ए, सेट,नेटसारख्या सर्व पात्रता पूर्ण केल्या असतानाही नोकरी का मिळत नाही हा प्रश्न आहे. यावर शासनाने विचार करून त्यादृष्टीने पावले उचलावी, असेही त्यांनी मत व्यक्त केले. भापकर यांनी पाच पुस्तकांच्या माध्यमातून अनमोल ठेवा दिला आहे. ती पुस्तके नव्या पिढीला प्रेरणादायी ठरतील, असा उल्लेखही त्यांनी केला. ग्रंथ ही संपत्ती असून या विचारांची संपत्ती कुणीही चोरू शकत नाही, असे मत प्रास्ताविकात बाबा भांड यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप भास्कर मुंडे यांनी केला. उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती.चौकटजे अनुभवतो तेच लिहितोलेखनामागची भूमिका विशद करताना डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले की, मी जे रोज अनुभवतो तेच लेखनात उतरवले आहे. ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यातून सामर्थ्य मिळत असते. त्या यंत्रणेला सोबत घेऊन काम करता येते. देशाला मजबूत करण्यासाठी मुलांना मजबूत केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबाद