शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नोकरीबाह्य तरुणांचे सर्वेक्षण शासनाने करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:40 IST

: सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या नाहीत. उद्योगासाठी त्यांच्याकडे भांडवल नाही. परिणामी, ग्रामीण महाराष्ट्राची पीछेहाट सुरूआहे. शासनाने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या धर्तीवर राज्य शासनाने नोकरीबाह्य तरुणांचे सर्वेक्षण करावे. नोकºया नाहीत असे न सांगता त्या निर्माण कराव्यात, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी दिला.

ठळक मुद्देबोराडे : पुरुषोत्तम भापकर यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन

औरंगाबाद : सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या नाहीत. उद्योगासाठी त्यांच्याकडे भांडवल नाही. परिणामी, ग्रामीण महाराष्ट्राची पीछेहाट सुरूआहे. शासनाने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या धर्तीवर राज्य शासनाने नोकरीबाह्य तरुणांचे सर्वेक्षण करावे. नोकºया नाहीत असे न सांगता त्या निर्माण कराव्यात, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी दिला.विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर लिखित ‘भाऊ-दादी: साथी नव्या युगाचे’, ‘शैक्षणिक षटकार’, ‘माझा शालेय परिपाठ: भाग एक’, ‘शासकीय योजनांचा खजिना: कॉलेज-नॉलेज-व्हिलेज’ या पाच पुस्तकांचे प्रकाशन सोमवारी बोराडे यांच्या हस्ते झाले. मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे व्यासपीठावर राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. बी. ए. चोपडे, प्रकुलगुरूअशोक तेजनकर, माजी विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांची उपस्थिती होती.यावेळी बोराडे म्हणाले की, डॉ. भापकर मनपाचे आयुक्त असताना त्यांनी सर्व्हे करून शाळाबाह्य मुले शोधून काढली होती. मात्र, आज राज्यामध्ये नोकरीबाह्य मुलांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राध्यापक होण्यासाठी एम.ए, सेट,नेटसारख्या सर्व पात्रता पूर्ण केल्या असतानाही नोकरी का मिळत नाही हा प्रश्न आहे. यावर शासनाने विचार करून त्यादृष्टीने पावले उचलावी, असेही त्यांनी मत व्यक्त केले. भापकर यांनी पाच पुस्तकांच्या माध्यमातून अनमोल ठेवा दिला आहे. ती पुस्तके नव्या पिढीला प्रेरणादायी ठरतील, असा उल्लेखही त्यांनी केला. ग्रंथ ही संपत्ती असून या विचारांची संपत्ती कुणीही चोरू शकत नाही, असे मत प्रास्ताविकात बाबा भांड यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप भास्कर मुंडे यांनी केला. उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती.चौकटजे अनुभवतो तेच लिहितोलेखनामागची भूमिका विशद करताना डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले की, मी जे रोज अनुभवतो तेच लेखनात उतरवले आहे. ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यातून सामर्थ्य मिळत असते. त्या यंत्रणेला सोबत घेऊन काम करता येते. देशाला मजबूत करण्यासाठी मुलांना मजबूत केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबाद