शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये

By admin | Published: October 11, 2016 12:24 AM

कळंब : कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षणासह विविध मागण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे़ यातून राज्यात आजवर २४ ठिकाणी झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चात लाखोंच्या संख्येने समाज सहभागी झाला आहे़

कळंब : कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षणासह विविध मागण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे़ यातून राज्यात आजवर २४ ठिकाणी झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चात लाखोंच्या संख्येने समाज सहभागी झाला आहे़ मात्र, राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत उदासिन व वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याची टिका करीत, शासनाने समाजाचा अंत पाहू नये अन्यथा, समाजाला संघर्षाचा मार्ग पत्कराला लागेल, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आ़ नितेश राणे यांनी दिला़स्वाभिमान संघटनेच्या वतीनेआयोजित ‘मराठा आरक्षण एल्गार’ मेळाव्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज तर नगराध्यक्ष मिराताई चोंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण टेकाळे, विनोद गपाट, मराठवाडा संपर्क मनोज गरड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड, माधव गंभीरे, भागवतराव धस, अतुल कवडे, प्रकाश भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती़आ.राणे म्हणाले, राज्यात आजवर २४ मुकमोर्चे निघाले आहेत. लाखोच्या संख्येने समाज रस्त्यावर उतरूनही सरकारचे डोके ठिकाणावर आलेले नाही. या विक्रमी मोर्चाची काही जण ‘मुका मोर्चा’ म्हणून टिंगल करत आहे. यावरूनच हे सरकार व सरकारमध्ये सहभागी असलेले लोक मराठा समाजाच्या प्रश्नाविषयी व आरक्षणाविषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. समाजात सहशीनशीलता आहे, या सहनशिलतेचा शासनाने अंत पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला़ मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी आघाडी सरकारने नारायण राणे समिती नेमली होती. यासमितीने राज्यातील अठरा लाख लोकांचे प्रत्यक्ष सर्व्हेक्षण केले. त्यानुसार मराठा समाजाची आर्थिक, शैक्षणिक व नौकरी आदी संदर्भातील स्थिती जाणून घेऊन मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर सध्याच्या सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. परिणामी समाजाला आरक्षणापासून दूर रहावे लागले. नारायण राणे समितीचा अहवाल वस्तूनिष्ट असताना, बापट समितीच्या अहवालाचा गवगवा केला जात आहे. याविषयावर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी शासन कमी पडत असून, या अंसतोषातूनच लोक रस्त्यावर उतरत असल्याचे ते म्हणाले. यावेळी हभप प्रकाश बोधले महाराज, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यास मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़ मेळाव्यासाठी ‘स्वाभिमान’चे जिल्हाध्यक्ष किरण टेकाळे, प्रकाश भोसले, विकास यादव, नाना खराडे आदींनी परिश्रम घेतले़