सरकारी कार्यालये बनली ‘मैदान-ए-जंग़़़’
By Admin | Updated: July 16, 2014 01:25 IST2014-07-16T00:18:49+5:302014-07-16T01:25:26+5:30
लातूर : मंगळवार हा एका अर्थाने जिल्ह्यासाठी आंदोलनवारच ठरला़ जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका आंदोलनकर्त्यांनी गजबजली होती़

सरकारी कार्यालये बनली ‘मैदान-ए-जंग़़़’
लातूर : मंगळवार हा एका अर्थाने जिल्ह्यासाठी आंदोलनवारच ठरला़ जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका आंदोलनकर्त्यांनी गजबजली होती़ धनगर समाजाने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लातुरात मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही काळ ठिय्या दिला़ तर लिंगायत समाजाने आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाभरातील तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले़ त्यातच लातूरच्या मनपा कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी लेखणी बंद आंदोलन केले़ औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर पालिकांतील कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे़ दरम्यान, लातुरातील शिवसेनेने नागरी समस्यांसंदर्भात आयुक्तांना घेराव घातला़
महानगरपालिका ठप्प
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले़ त्यामुळे पालिकेतील कामे दिवसभर ठप्प झाली होती़
राज्यातील नगरपालिका व ड वर्ग महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत़ त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देताना लातूर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले़
मनपात वेळेवर वेतन मिळत नाही़ गेल्या ६-७ महिन्यांपासून त्यांचे वेतन थकले आहे़ त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे़
परिणामी कर्मचारी सावकारी पाशात जखडले जात असल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे़ शासनाने मनपा स्थापनेपासून पुढील ५ वर्षांपर्यंत सहाय्यक अनुदान मंजूर करावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे़ दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनास शिवसेनेने पाठिंबा दर्शविला़
हक्कासाठी धनगर समाज एकवटला
धनगर समाज अनुसूचित जमातीत समाविष्ट असून राज्य सरकारने त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, ही प्रमुख मागणी घेऊन मंगळवारी धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़
धनगर समाज अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर नमूद आहे, त्याची राज्य सरकारने अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने वेगवेगळी आंदोलने करण्यात आली़ परंतु, प्रत्येकवेळी शासनाने केवळ आश्वासनच दिले़ त्याची पूर्तता कधी केली नाही़
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही शब्द पाळला नाही़ त्यामुळे हे शासन धनगर समाज विरोधी आहे का, असा सवाल आंदोलनप्रसंगी उपस्थित करण्यात आला़
आता मात्र मागण्यांच्या मंजुरीशिवाय माघार न घेण्याचा निर्धार करण्यात आला़ आंदोलनात धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, महिला संघटना, कर्मचारी धनगर संघटना, विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी, अॅड़निवृत्तीराव करडे, संभाजीराव बैैकरे, नागनाथ गाडेकर, बालाजी बैैकरे, प्रा़दिलीप चौधरी, अॅड़जीवन करडे, प्रा़अशोक अभंगे, रामराव रोडे, छायाताई देवकते, अॅड़दिगंबर साके, बालाजी वाघमारे, अॅड़मनोज लांडगे, दयानंद सुरवसे, अशोक भंडे, सुजीत वाघे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते़
मुंबई येथील धरणे आदोंलनात आघाडी सरकारने आरक्षणाबाबत दिलेला शब्द पाळला नसल्याने समाजबांधवाच्या भावना तीव्र झाल्याची प्रतिक्रिया आंदोलनस्थळी उमटल्या़
‘त्या’ बदलीचा निषेध
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात धनगर समाजाने लिंगायत समाजास ओबीसीच्या सवलती लागू कराव्यात, अशीही मागणी मांडली आहे़ शिवाय, वरिष्ठ अधिकारी सुभाष माने यांची बदली जातीच्या आकसातूनच करण्यात आल्याचा आरोप करुन आंदोलनकर्त्यांनी निषेधही नोंदविला़
लिंगायत समाजाचे ‘अल्टीमेटम’
लिंगायतसह सर्व पोटजातींना त्यांच्या प्रवर्गानुसार लिंगायत नावासह आरक्षण देण्याबाबत आघाडी सरकारने दिलेला शब्द न पाळल्याने मंगळवारी राज्यभरातील तहसील कार्यालयासमोर समाज बांधवांनी धरणे आंदोलन केले़ आठवडाभरात मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरात जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला़
लिंगायत संघर्ष समिती लातूरच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयासमोर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मुर्गाप्पा खुमसे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आदोंलन करण्यात आले़ लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा मिळावा, राज्य शासनाने लिंगायत धर्म मान्यतेची केंद्र सरकारकडे शिफारस करावी, लातूरच्या विमानतळास जगद्ज्योती श्री महात्मा बसवेश्र्वर नाव द्यावे, मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्र्वरांचे स्मारक निर्माण करावे, मन्मथ स्वामी कपिलधार क्षेत्राचा विकास करावा आदी मागण्यांचा समावेश आहे़ श्री महात्मा बसवेश्वरांसह अन्य महापुरूषांच्या प्रतिमेस श्रीशिवानंद शिवाचार्य महाराज, तमलूरकर यांनी पुष्पहार अर्पण केले़ आंदोलनास काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसेसह विविध पक्ष व संघटनांनी पाठिंंबा दर्शविला़ तहसीलदार महेश शेवाळे यांनी निवेदन स्वीकारले़
यावेळी महापौर स्मिता खानापूरे, ललिताताई पांढरे, बाबासाहेब कोरे, विजयकुमार शेटे, शिवराज खुब्बा, राजेश विभूते, इराण्णा पावले, उमाकांत पंचाक्षरी, सतीश खेकडे, रामलिंगअप्पा ठेसे, पुष्कराज खुब्बा, सागर मांडे आदी समाजबांधव उपस्थित होत़े़