सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

By Admin | Updated: December 19, 2014 00:59 IST2014-12-19T00:10:45+5:302014-12-19T00:59:36+5:30

प्रश्न : महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त का आहेत? उत्तर : डॉ. आर. एस. देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रातला शेतकरी हा पूर्णत: सरकारवरच अवलंबून आहे.

Government intervention boosted farmer suicides | सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

प्रश्न : महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त का आहेत?
उत्तर : डॉ. आर. एस. देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रातला शेतकरी हा पूर्णत: सरकारवरच अवलंबून आहे. सरकारच आमचे सर्व काही करू शकेल, अशी मानसिकता येथील शेतकऱ्यांची झालेली आहे. जेव्हा परावलंबी माणूस हतबल होतो, तेव्हा त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. दुसरीकडे शेतीचा पोत कमी झालेला आहे. जमिनीची प्रतिकारशक्ती खालावलेली आहे. सिंचनक्षमता वाईट आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने सिंचनावर सर्वाधिक खर्च केलेला आहे. तरीसुद्धा मागील १०-११ वर्षांत अवघ्या १ टक्का एवढीच सिंचनात वाढ होऊ शकली, हे दुर्दैव.
प्रश्न : आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना अपेक्षित आहे?
उत्तर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर त्यांनी स्वत:चा मार्ग स्वत:च निवडण्याची मानसिकता केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी छोटे-छोटे गट स्थापन केले पाहिजे. त्यात सरकारचा होणारा हस्तक्षेप झुगारला पाहिजे. शेतमालाच्या किमतीची ‘बार्गेनिंग’ करण्याची ताकद वाढविली पाहिजे. पीक पद्धती बदलली पाहिजे. सरकारवर अवलंबून राहण्याची मानसिकता आता बदलली पाहिजे.
प्रश्न : शेतकरी हा सतत भरडला जातो ?
उत्तर : तो सर्वात जास्त भरडला जातो बाजारात. माल विकण्यासाठी जेव्हा शेतकरी बाजारात जातो. तेव्हा मालाच्या किमतीची ‘बार्गेनिंग’करण्यामध्ये शेतकरी कमी पडतो. शेतकऱ्याला मालाचा भाव ठरवता येत नाही. दुसरेच भाव ठरवतात. जणू काही शेतकरी हा भाव ठरवून घेण्यासाठीच असतो, अशी भावना बाजारातल्या दलालांची आणि अडत्यावाल्यांची झालेली आहे. जो पर्यंत शेतकरी हा आपल्या मालाचा भाव ठरवणार नाही, तोपर्यंत तो सक्षम होणारच नाही.
प्रश्न : शेतीचे चुकलेले अर्थकारण आणि सरकारच्या धोरणाबद्दल आपण काय म्हणाल?
उत्तर : महाराष्ट्रात शेतीचे अर्थकारण कोलमडलेले आहे. या राज्यात एखादे कृषी धोरण अमलात आणले असे वाटत नाही. अमुक एक पीकपद्धती वापरली पाहिजे, बाजार पद्धत विकसित केली पाहिजे, असे कुठेच दिसत नाही. शेजारचे राज्य असलेल्या कर्नाटकात आतापर्यंत ४ कृषी धोरणे अमलात आलेली आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रात एकही धोरण अमलात आणले, असे मी ऐकलेले नाही.
या राज्यात कृषी खात्याला गौण समजले जाते. पूर्वी ज्या राज्यात हरित क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख यांना ओळखले जायचे. त्यांनी स्वत: मागून कृषी मंत्रालय घेतले होते. आता ते बळजबरीने कोणाच्या तरी गळ्यात टाकले जाते.

Web Title: Government intervention boosted farmer suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.