शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

शासनाकडे १९ लाखांची थकबाकी

By admin | Updated: March 13, 2016 14:51 IST

परभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अधिग्रहित केलेल्या विहीर आणि बोअरच्या मोबदल्याची १९ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे थकली

परभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अधिग्रहित केलेल्या विहीर आणि बोअरच्या मोबदल्याची १९ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे थकली असून दुष्काळाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता उदासीनतेच्या झळाही सहन कराव्या लागत आहेत.जिल्ह्यात पाऊस मुबलक प्रमाणात झाला नसल्याने तीन वर्षांपासून ग्रामस्थ दुष्काळाचा सामना करीत आहेत. यावर्षी तर ही परिस्थिती अधिकच बिकट झाली असून परिसरातील जलसाठे आटले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. त्यातच ज्या विहिरी आणि हातपंपांना पाणी आहे, ते पाण्याचे स्त्रोत प्रशासनाकडून अधिग्रहित करणे आणि हे पाणी परिसरातील ग्रामस्थांसाठी उपलब्ध करुन दिले जाते. निर्माण झालेली टंचाईस्थिती लक्षात घेऊन या भागातील ग्रामस्थांनी देखील पुढाकार घेतला. परभणी तालुक्यातील २१ विहिरी आणि ५४ बोअर अधिग्रहणास परवानगी दिली. पाण्याचे हे स्त्रोत नोव्हेंबर महिन्यापासून ग्रामस्थांसाठी खुले करुन दिले आहेत. विहीर अधिग्रहण केल्यानंतर या विहिरीचे व बोअरच्या पाण्याचा मोबदला संबंधित मालकाला प्रशासनाच्या वतीने दिला जातो. मात्र परभणी जिल्हा प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यापासून विहीर आणि बोअरचे देयके थकवली आहेत. काही ठिकाणी तर आॅगस्ट महिन्यांपासूनची देयके ग्रामस्थांना मिळाली नाहीत. दुष्काळाचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना मदत करण्याऐवजी प्रशासनाकडेच ग्रामस्थांची थकबाकी वाढत चालली आहे. सद्य:स्थितीला केवळ परभणी तालुक्यातील १९ लाख ४४ हजार १०० रुपयांची थकबाकी प्रशासनाकडे झाली आहे. ३८ गावांमधील लाभधारक शेतकऱ्यांना वेळेच्या वेळी अधिग्रहणाची रक्कम वितरित झाली नसल्याने ही थकबाकी वाढली आहे. सद्य:स्थिती लक्षात घेता प्रशासनाने लाभधारकांची थकबाकी तत्काळ अदा करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)मराठवाड्यातील दुष्काळ निवारण्यासाठी सरकार विविध घोषणा करीत आहे़ परंतु हा प्रकार केवळ कागदी घोडे नाचविण्याचा ठरत आहे़ परभणी जिल्हा भीषण टंचाईने होरपळत आहे़ काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या भरोस्यावर बागायती पिके घेतली़ परंतु, निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेऊन ही पिके मोडून शेतकऱ्यांनी ग्रामस्थांना पाणी देण्याचे मोठे काम केले आहे़ अशा विहीर आणि बोअर मालकांचा मावेजा थकवून शासन जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे़ -अंजली बाबर, पं़स़ सदस्या