शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चं सैन्य शाबूत ठेवण्यासाठीच फडणवीसांची सरकार पडणार, अशी आवई - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 18:24 IST

प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

ठळक मुद्देफडणवीसांनी कराव्यात नुसत्या घोषणाआमचे आघाडी  सरकार मात्र भक्कम

औरंगाबाद : देवेंद्र फडणवीस हे दर तीन महिन्यांनी सरकार पडणार, अशी आवई उठवून स्वत:चं सैन्य मजबूत करीत असतात. आता एक वर्ष संपलेलं आहे. पुढील चार वर्षंही हे सरकार भक्कमपणानं काम   करणार, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे दिली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आकाशवाणी चौक येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले. आता एकनाथ खडसे आले. नजीकच्या काळात भाजपचे आणखी बरेचसे लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले दिसतील, असे सांगून पाटील यांनी, पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीतही भाजपमध्ये आलबेल नाही, याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. नॅशनल लॉ स्कूलचा प्रश्न असो, मराठवाड्याच्या वाट्याला येणाऱ्या वैद्यकीय प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ असो किंवा जुन्या पेन्शनचा प्रश्न असो, सतीश चव्हाण हे सातत्याने आवाज उठवत आलेले आहेत, अशा शब्दांत सतीश चव्हाण यांची पाटील यांनी प्रशंसा केली.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात जबरदस्त काम करीत आहे. मात्र, काही मंडळी गैरसमज निर्माण करण्यासाठी बडबड करीत असतात. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना कामाला लागली आहे. तसा तर सतीश चव्हाण यांचा विजय झालेला आहे, असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला. 

मंचावर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, रोहयोमंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार अंबादास दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, अनिल पटेल, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आदींची उपस्थिती होती. प्रारंभी, जयंत पाटील यांनी महामानवांच्या प्रतिमांचे पूजन केले. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलाश पाटील यांनी आभार मानले. ढोल-ताशांच्या गजरात आकाशवाणी  परिसर सकाळपासूनच दणाणून गेला होता. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

गाफील राहून  चालणार नाही...शिक्षक आ. विक्रम काळे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी आपणच निवडून येणार या भ्रमात राहू नका, गाफील राहून चालणार नाही, असे मत नोंदवले‌. त्यांनी सांगितले, पूर्वी पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपची मक्तेदारी होती. ती मोडून काढण्याचे काम मी आणि सतीश चव्हाण यांनी केले आहे. शिक्षक मतदारसंघात तीन वेळा निवडून आलो. आता सतीश चव्हाण विजयी झाले, तर त्यांची हॅट्‌ट्रिक होईल.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेस