शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

स्वत:चं सैन्य शाबूत ठेवण्यासाठीच फडणवीसांची सरकार पडणार, अशी आवई - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 18:24 IST

प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

ठळक मुद्देफडणवीसांनी कराव्यात नुसत्या घोषणाआमचे आघाडी  सरकार मात्र भक्कम

औरंगाबाद : देवेंद्र फडणवीस हे दर तीन महिन्यांनी सरकार पडणार, अशी आवई उठवून स्वत:चं सैन्य मजबूत करीत असतात. आता एक वर्ष संपलेलं आहे. पुढील चार वर्षंही हे सरकार भक्कमपणानं काम   करणार, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे दिली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आकाशवाणी चौक येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले. आता एकनाथ खडसे आले. नजीकच्या काळात भाजपचे आणखी बरेचसे लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले दिसतील, असे सांगून पाटील यांनी, पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीतही भाजपमध्ये आलबेल नाही, याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. नॅशनल लॉ स्कूलचा प्रश्न असो, मराठवाड्याच्या वाट्याला येणाऱ्या वैद्यकीय प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ असो किंवा जुन्या पेन्शनचा प्रश्न असो, सतीश चव्हाण हे सातत्याने आवाज उठवत आलेले आहेत, अशा शब्दांत सतीश चव्हाण यांची पाटील यांनी प्रशंसा केली.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात जबरदस्त काम करीत आहे. मात्र, काही मंडळी गैरसमज निर्माण करण्यासाठी बडबड करीत असतात. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना कामाला लागली आहे. तसा तर सतीश चव्हाण यांचा विजय झालेला आहे, असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला. 

मंचावर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, रोहयोमंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार अंबादास दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, अनिल पटेल, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आदींची उपस्थिती होती. प्रारंभी, जयंत पाटील यांनी महामानवांच्या प्रतिमांचे पूजन केले. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलाश पाटील यांनी आभार मानले. ढोल-ताशांच्या गजरात आकाशवाणी  परिसर सकाळपासूनच दणाणून गेला होता. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

गाफील राहून  चालणार नाही...शिक्षक आ. विक्रम काळे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी आपणच निवडून येणार या भ्रमात राहू नका, गाफील राहून चालणार नाही, असे मत नोंदवले‌. त्यांनी सांगितले, पूर्वी पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपची मक्तेदारी होती. ती मोडून काढण्याचे काम मी आणि सतीश चव्हाण यांनी केले आहे. शिक्षक मतदारसंघात तीन वेळा निवडून आलो. आता सतीश चव्हाण विजयी झाले, तर त्यांची हॅट्‌ट्रिक होईल.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेस