शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

'सरकार बदलले, निर्णय फिरला'; वर्कऑर्डरपर्यंत पोहोचलेली ग्रामविकासाची कोट्यवधींची कामे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 17:19 IST

Billions of rural development works reached to work order canceled in Aurangabad District रद्द कामे गंगापूर, फुलंब्री, वैजापूर, सिल्लोड, औरंगाबाद तालुक्यातील कामे आहेत.

ठळक मुद्देमागील सरकारचा निर्णय धोरणात्मकरीत्या बदललामंजूर केलेली बहुतांश कामे वर्कआॅर्डरपर्यंत पोहोचलेली आहेत

औरंगाबाद : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ते व इतर विकासकामांची मागील सरकारने केलेली तरतूद या सरकारने रद्द केली आहे. यात जिल्ह्यातील सुमारे ५० कोटींहून अधिक रुपयांची कामे असल्याची माहिती पुढे आली आहे. सभागृह बांधणे, गावांतर्गत सिमेंट रस्ते करणे, पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचा यामध्ये समावेश होता. 

मंजूर केलेली बहुतांश कामे वर्कआॅर्डरपर्यंत पोहोचलेली आहेत, तर काही कामांच्या निविदा होऊन ७० टक्के कामेही पूर्ण झाली आहेत. आता महाविकास आघाडी सरकारने जुन्या सरकारच्या काळातील कामांचा अध्यादेश रद्द करीत नव्याने कामांची तरतूद केल्यामुळे जुन्या कामांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  गंगापूर, फुलंब्री, वैजापूर, सिल्लोड, औरंगाबाद तालुक्यातील कामे आहेत. ही कामे बांधकाम, ग्रामविकास विभागांतर्गत होणार होती. मागील सरकारच्या कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यात २५:१५ चे अध्यादेश निघाले होते. आता नवीन कामे सरकारने दिलेली आहेत. 

न्यायालयात जाण्याची तयारी ग्रामविकासच्या हेडअंतर्गत २५:१५ ची कामे होती. ही कामे देण्यासाठी मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांना विशेष अधिकार असतात. मागील सरकारच्या काळात ही कामे मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी मंजूर केली होती. याबाबत न्यायालयात जाणार आहे, असे आ. प्रशांत बंब यांनी सांगितले.

२५ ते ३० टक्के कामांच्या निविदा शिल्लक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुरेश देशपांडे यांनी सांगितले, २५:१५ अंतर्गत जी कामे होती, त्यात सभागृह बांधणे, नालीबांध करणे, सिमेंट रोड, पेव्हर ब्लॉक बसविण्याची कामे होती. काही कामांच्या निविदा झालेल्या आहेत. २५ ते ३० टक्के निविदा मध्यंतरीच्या एका आदेशामुळे राहिल्या आहेत.  

नवीन सरकारमुळे धोरणात्मक निर्णय राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, गेल्या सरकारच्या काळातील वर्कआॅर्डर न झालेली कामे रद्द करण्याचा धोरणात्मक निर्णय झाला. त्यानुसार नवीन ११०० कोटी रुपयांची कामे वाटली. मागील सरकारने सर्व लोकप्रतिनिधींना समान निधी दिला नव्हता. या सरकारने विरोधी आमदारांसह सर्वांना समान निधीचे वाटप २५:१५ मध्ये केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfundsनिधीRural Developmentग्रामीण विकासAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद