शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी नापास झालो; पुढच्या वर्षी नक्कीच पास होऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 20:07 IST

 पुढच्या वर्षी पहिल्या दहामध्ये येऊ

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणात रँक घसरलारस्त्यांवर कचरा नाही; पण प्रक्रिया शून्य

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणात औरंगाबाद शहराचा क्रमांक १२८ वरून २२० वर आला. यावर्षी महापालिका नापास झाली असली तरी पुढच्या वर्षी पास होऊ, असा दुर्दम्य आत्मविश्वास महापालिका सत्ताधाऱ्यांनी गुरुवारी व्यक्त केला. १२८ वरून थेट २२० व्या क्रमांकावर शहर जाण्यास कोणते घटक कारणीभूत आहेत, याची कारणमीमांसा करण्याबाबत मात्र सत्ताधारी, प्रशासनाने कोणताही निर्णय अजून तरी घेतलेला नाही. 

१६ फेबु्रवारी २०१८ ते आजवर कचराकोंडीचा आढावा घेतल्यास पालिकेतील राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेतील बेबनाव याला जबाबदार असल्याचे दिसते. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीनेदेखील कचराकोंडीकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसते. ९ मार्च २०१८ रोजी नगरविकास प्रधान सचिवांनी कचराकोंडी फोडण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केला. कचरा निर्मूलनात यशस्वी काम करणाऱ्या नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना येथे नियुक्त केले. वर्षभरात पालिका प्रशासनाने ज्या गतीने काम करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात अनेक अडथळे आले. परिणामी शहराचा रँक घसरला आहे. 

या सगळ्या पिछाडीबाबत बोलताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, शहराची कचराकोंडी सोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केल्याने प्रक्रिया प्रकल्प उभारले जात आहेत. येत्या तीन महिन्यांत कचऱ्यावर प्रक्रिया सुरू होईल. यावर्षी क्रमांक मागे आला असला तरी नागरिकांनी नाराज होऊ नये. कचरा संकलन व वाहतुकीचे काम सुरू झाले आहे. वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी मिळालेला ७.५० कोटींचा निधी पडून आहे. त्यामध्ये मनपाला गुण मिळाले नाही. स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांनी चांगले मत नोंदविले आहे. प्रत्यक्षात पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नसून रस्त्यावर कुठेही कचरा दिसून येत नाही. नागरिकांना सोबत घेऊन पुढच्या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात पहिल्या दहामध्ये औरंगाबाद शहर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

रँक घसरताच आढावा आणि दावे...१५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे मशीन मार्चअखेरपर्यंत बसवून एप्रिलपासून त्यावर प्रक्रिया सुरू केली जाईल, असा दावा महापौरांनी केला. प्रशासनाने प्रक्रिया केंद्राच्या कामाचा आढावा घेतला. मनपाने चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव आणि कांचनवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी शेड उभारण्याचे काम सुरू आहे. एप्रिल महिन्यात कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कचरा साचून राहणार नाही. सुक्या कचऱ्याचे बेलिंग केले जात असल्याने कचरा कंपन्या घेऊन जात असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली. कांचनवाडी येथे कचऱ्यापासून येत्या तीन महिन्यांत गॅसनिर्मिती केली जाणार आहे. सध्या तेथील कचऱ्यावर बायोकल्चर प्रक्रिया करण्यात येत आहे. हर्सूल येथे ओपन टेक्नॉलॉजीद्वारे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी गुरुवारी निविदा उघडण्यात आली. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न