शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
3
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
5
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
6
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
7
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
8
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
9
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
10
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
11
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
12
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
13
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
14
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
15
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
16
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
17
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
18
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
19
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
20
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

यावर्षी नापास झालो; पुढच्या वर्षी नक्कीच पास होऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 20:07 IST

 पुढच्या वर्षी पहिल्या दहामध्ये येऊ

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणात रँक घसरलारस्त्यांवर कचरा नाही; पण प्रक्रिया शून्य

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणात औरंगाबाद शहराचा क्रमांक १२८ वरून २२० वर आला. यावर्षी महापालिका नापास झाली असली तरी पुढच्या वर्षी पास होऊ, असा दुर्दम्य आत्मविश्वास महापालिका सत्ताधाऱ्यांनी गुरुवारी व्यक्त केला. १२८ वरून थेट २२० व्या क्रमांकावर शहर जाण्यास कोणते घटक कारणीभूत आहेत, याची कारणमीमांसा करण्याबाबत मात्र सत्ताधारी, प्रशासनाने कोणताही निर्णय अजून तरी घेतलेला नाही. 

१६ फेबु्रवारी २०१८ ते आजवर कचराकोंडीचा आढावा घेतल्यास पालिकेतील राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेतील बेबनाव याला जबाबदार असल्याचे दिसते. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीनेदेखील कचराकोंडीकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसते. ९ मार्च २०१८ रोजी नगरविकास प्रधान सचिवांनी कचराकोंडी फोडण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केला. कचरा निर्मूलनात यशस्वी काम करणाऱ्या नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना येथे नियुक्त केले. वर्षभरात पालिका प्रशासनाने ज्या गतीने काम करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात अनेक अडथळे आले. परिणामी शहराचा रँक घसरला आहे. 

या सगळ्या पिछाडीबाबत बोलताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, शहराची कचराकोंडी सोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केल्याने प्रक्रिया प्रकल्प उभारले जात आहेत. येत्या तीन महिन्यांत कचऱ्यावर प्रक्रिया सुरू होईल. यावर्षी क्रमांक मागे आला असला तरी नागरिकांनी नाराज होऊ नये. कचरा संकलन व वाहतुकीचे काम सुरू झाले आहे. वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी मिळालेला ७.५० कोटींचा निधी पडून आहे. त्यामध्ये मनपाला गुण मिळाले नाही. स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांनी चांगले मत नोंदविले आहे. प्रत्यक्षात पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नसून रस्त्यावर कुठेही कचरा दिसून येत नाही. नागरिकांना सोबत घेऊन पुढच्या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात पहिल्या दहामध्ये औरंगाबाद शहर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

रँक घसरताच आढावा आणि दावे...१५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे मशीन मार्चअखेरपर्यंत बसवून एप्रिलपासून त्यावर प्रक्रिया सुरू केली जाईल, असा दावा महापौरांनी केला. प्रशासनाने प्रक्रिया केंद्राच्या कामाचा आढावा घेतला. मनपाने चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव आणि कांचनवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी शेड उभारण्याचे काम सुरू आहे. एप्रिल महिन्यात कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कचरा साचून राहणार नाही. सुक्या कचऱ्याचे बेलिंग केले जात असल्याने कचरा कंपन्या घेऊन जात असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली. कांचनवाडी येथे कचऱ्यापासून येत्या तीन महिन्यांत गॅसनिर्मिती केली जाणार आहे. सध्या तेथील कचऱ्यावर बायोकल्चर प्रक्रिया करण्यात येत आहे. हर्सूल येथे ओपन टेक्नॉलॉजीद्वारे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी गुरुवारी निविदा उघडण्यात आली. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न