शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

गुड न्यूज! छत्रपती संभाजीनगरहून विमानाने सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी परत येता येणार

By संतोष हिरेमठ | Published: June 14, 2023 2:21 PM

मुंबईसाठी जुलैपासून छत्रपती संभाजीनगरहून सायंकाळी ‘टेकऑफ’

छत्रपती संभाजीनगर : तब्बल ९७ दिवसांनंतर अखेर १ जुलैपासून इंडिगोकडून पुन्हा एकदा सायंकाळच्या वेळेत मुंबई-छत्रपती संभाजीनगर-मुंबई विमानसेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या ३ महिन्यांपासून पर्यटक, उद्योजक आणि प्रवाशांची मुंबई विमान प्रवासासाठी होणारी गैरसोय संपणार आहे. सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी पुन्हा शहरात परतणे शक्य होणार आहे.

इंडिगोने २६ मार्चपासून सायंकाळी उड्डाण घेणारे मुंबईचे विमान अचानक बंद केले. त्यामुळे प्रवाशांना विमानाने मुंबईहून शहरात येण्यासाठी आणि शहरातून मुंबई गाठण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत होता. शहरातील विमानसेवेच्या अवस्थेविषयी ’लोकमत’ने ‘विमानसेवा जमिनीवर’ ही वृत्तमालिका प्रकाशित करून विमानसेवेसाठी पाठपुरावा केला तेव्हा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड आणि खा. इम्तियाज जलिल यांनी मुंबईसाठी सायंकाळचे विमान पुन्हा सुरू होईल, असे सांगितले होते.

आजघडीला मुंबईसाठी एअर इंडिया आणि इंडिगोकडून सकाळच्या वेळेतच विमानसेवा आहे. त्यामुळे सकाळीच विमानतळावर जावे लागते. परंतु आता १ जुलैपासून सकाळच्या वेळेतील दोन विमानांबरोबर सायंकाळीही मुंबईसाठी विमान उपलब्ध राहणार आहे.

मुंबईच्या सायंकाळच्या विमानाचे वेळापत्रक- मुंबईहून सायं. ६.१० वाजता उड्डाण आणि सायं.७.२० वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन.- छत्रपती संभाजीनगरहून रात्री ७.५० वाजता उड्डाण आणि रात्री ९ वाजता मुंबईत पोहोचणार.

सर्वांच्या प्रयत्नांमुळे यशसर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मुंबईची सायंकाळची विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे. हा सगळ्यांचाच विजय आहे. अहमदाबाद आणि उदयपूर विमानसेवा सुरू होण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन

आता ८ विमानांची ये-जामुंबईसाठी सायंकाळच्या विमानाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. मुंबईचे सायंकाळचे विमान सुरू झाल्यानंतर दिवसभरात ८ विमानांची ये-जा म्हणजे १६ उड्डाणे होतील.- शरद येवले, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ