शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

GOI Scholarship: विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या, आता हजेरी असेल तरच मिळेल शिष्यवृत्ती!

By विजय सरवदे | Updated: August 18, 2023 19:12 IST

केंद्र शासनाच्या सुधारित सूचना लागू; शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास महाविद्यालय जबाबदार

छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी भारत सरकारची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. यासोबतच महाविद्यालयांनाही या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची रक्कम दिली जाते. मात्र, चालू शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी हजेरीची अट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ महाविद्यालयात प्रवेश घेऊन वर्षभर गायब राहणाऱ्या विद्यार्थ्यास शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागणार आहे.

केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना- मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेबाबत केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये सन २०२३-२४ पासून हजेरीची अट लागू केली आहे. एक अभ्यासक्रम, एक शिष्यवृत्ती हे धोरण देखील यंदापासून अवलंबिण्यात येत आहे.- आधार संलग्नीकृत बँकेत विद्यार्थ्याचे खाते असावे.- विशेष म्हणजे, एक किंवा दोन्ही पालक निरक्षर असलेल्या कुटुंबांतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र राहील.- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी हा राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त शाळा, स्थानिक स्वराज संस्थांच्या मान्यताप्राप्त शाळांमधून दहावी उत्तीर्ण झालेला असावा, या सुधारित मार्गदर्शक सूचना आहेत.

शिष्यवृत्तीचा लाभ कोणाला मिळणारयंदापासून किमान ७५ टक्के उपस्थिती असणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. ऑनलाइन अथवा दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता लागू राहणार नाही.

विद्यार्थ्यांना हजेरीची सक्तीयापुढे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या लाभार्थ्यांसाठी किमान ७५ टक्के हजेरी अनिवार्य असणार आहे.

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास महाविद्यालय जबाबदारविद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठविण्याची जबाबदारी महाविद्यालयांची आहे. त्रुटी अभावी महाविद्यालयांच्या लॉगीनवर असलेले प्रलंबित अर्ज संबंधित लाभार्थ्यांकडून आवश्यक ती कागदपत्रे हस्तगत करून समाजकल्याण विभागाकडे विहित कालावधीत सादर करण्याची जबाबदारीही महाविद्यालयांची आहे. शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास त्यासंदर्भात महाविद्यालयासच जबाबदार धरले जाणार आहे.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीAurangabadऔरंगाबादSC STअनुसूचित जाती जमातीEducationशिक्षण