शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

गोदावरी नदी पैठणमध्ये दूषित

By admin | Published: July 04, 2017 5:15 AM

आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना गोदावरीच्या दूषित झालेल्या पाण्यात यंदा पवित्र स्नान करावे लागणार आहे. जायकवाडी

संजय जाधव/लोकमत न्यूज नेटवर्कपैठण (जि. औरंगाबाद) : आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना गोदावरीच्या दूषित झालेल्या पाण्यात यंदा पवित्र स्नान करावे लागणार आहे. जायकवाडी धरणावर असलेला जलविद्युत प्रकल्प महिनाभरापासून तांत्रिक अडचणीने बंद पडल्याने गोदावरी पात्रात महिनाभरापासून पाणी साचले असून, त्यात सांडपाणी येत आहे. गोदापात्रातील पाण्यावर हिरवट व दुर्गंधीयुक्त असा तवंग दाटला आहे. या पाण्यात स्नान केल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने हे पाणी खाली सोडून द्यावे व वारकऱ्यांसाठी शुद्ध पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे. जायकवाडी धरणावर असलेला जलविद्युत प्रकल्प ४ जूनपासून बंद पडला आहे. त्यामुळे धरणातून गोदावरीत व पुन्हा धरणात पाणी लिफ्ट करण्याची प्रक्रिया थांबली आहे. सांडपाण्याचे दहा नाले गोदावरीच्या पात्रात येतात. दहा नाल्यांचा गोदावरी संगमपैठणमधील सांडपाणी वाहून आणणारे १० नाले दररोज लाखो लीटर घाण पाणी आणून सोडत आहेत. सोबतच रोज दशक्रिया विधीची हजारो किलो रक्षा पात्रात विसर्जित करण्यात येते. दूषित पाण्यात स्नान केलेल्या भाविकांना अंगास खाज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे, अंगार होणे अशा विविध त्वचा आजारास सामोरे जावे लागते. जायकवाडी धरणावरील विद्युत प्रकल्पाची दुरुस्ती सुरू असून त्यासाठी आठ दिवस लागतील, असे जलविद्युत प्रकल्पाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्याधर लोणीकर यांनी सांगितले. गोदावरीच्या पात्रात पैठण शहराचे सांडपाणी नाल्याद्वारे मोठ्या प्रमाणात येऊन मिसळते. त्यामुळे पाण्याचे युट्रॉफिकेशन (शेवाळीकरण) वाढले, अशी माहिती धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी या वेळी दिली.