शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सिंचन भवनात शिरून आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

By बापू सोळुंके | Updated: November 17, 2023 16:26 IST

काही आंदोलक अचानक पळतच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या केबिनच्या दिशेने निघाले .

छत्रपती संभाजीनगर: अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत मराठवाड्याच्या हक्काचे 8.6 टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी रोखून धरले. या विरोधात मराठवाडापाणी हक्क परिषदेच्यावतीने शुक्रवारी सिंचन भवनसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी अचानक आंदोलक आक्रमक होत सिंचन भवनमध्ये घुसले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलकांना रोखणाऱ्या पोलिसांसोबत रेटारेटी करण्याचा प्रयत्न केला .मात्र पोलिसांनी झटापट करीत त्यांना रोखले .

मराठवाड्यात कमी पाऊस पडल्यामुळे येथील लहान मोठी धरणे तळ गाठत आहे . सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात आज केवळ 42 टक्के जलसाठा उरला आहे समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार मराठवाड्याला अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून 8.6 टीएमसी पाणी सोडण्यात निर्णय महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी 30 ऑक्टोबर रोजी घेतला.या निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये ,यासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील raजकीय पुढार्‍यांनी जोरदार आंदोलन सुरू केले.शिवाय त्यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्या. या याचिकांची सुनावणी 21 नोव्हेंबर आणि पाच डिसेंबर रोजी होत आहे .

या दोन्ही याचिकांमध्ये उच्च न्यायालयाने पाणी सोडण्यास मनाई आदेश दिले नाही. यामुळे तातडीने पाणी सोडणे अपेक्षित असताना पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास शासनाने रेड सिग्नल दिला .परिणामी मराठवाड्यातील पाणी प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध जनतेच्या भावना तीव्र होत आहे. शुक्रवारी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी मराठवाडा पाणी हक्क परिषदेच्या वतीने शुक्रवारी दुपारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर निदर्शने करण्यात आली .पाणी आमच्या हक्काचं , नाही कुणाच्या बापाचे, देत कसे नाहीत ,घेतल्याशिवाय राहणार नाही, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी रोखणाऱ्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे करायचे काय,? खाली मुंडके वर पाय, मराठवाड्याला पाणी मिळालेच पाहिजे , या घोषणा देत आंदोलन तासभर सुरू होते. 

यावेळी यातील काही आंदोलक अचानक पळतच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या केबिनच्या दिशेने निघाले .त्यांच्या पाठोपाठ अन्य आंदोलन ही आले ,यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखून आंदोलकांना पायऱ्यावरच रोखले. यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांसोबत झटापट करीत वरचा मजला गाठला तेथे मराठवाड्याला पाणी मिळालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आधी घोषणा देत अशा घोषणा देत होते. आंदोलकांनी सिंचन भवन दणाणून सोडला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना तेथेच रोखून धरले आणि काही वेळानंतर महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमणवार हे आंदोलकाकडे आले आणि त्यांनी त्यांच्या मागण्याची निवेदन घेतले आंदोलकाच्या भावना शासनाला कळविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या आंदोलनात जलतज्ञ डॉ. शंकर नागरे, डॉ. भगवानराव कापसे,नरहरी शिवपुरे, माजी मंत्री अनिल पटेल, उपअभियंता जयसिंह हिरे, संजय वाकचौरे ,विजय काकडे ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष द्वारकादास पाथरीकर यांच्यासह काही उद्योजक आणि व्यापारी महासंघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद