शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सिंचन भवनात शिरून आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

By बापू सोळुंके | Updated: November 17, 2023 16:26 IST

काही आंदोलक अचानक पळतच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या केबिनच्या दिशेने निघाले .

छत्रपती संभाजीनगर: अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत मराठवाड्याच्या हक्काचे 8.6 टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी रोखून धरले. या विरोधात मराठवाडापाणी हक्क परिषदेच्यावतीने शुक्रवारी सिंचन भवनसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी अचानक आंदोलक आक्रमक होत सिंचन भवनमध्ये घुसले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलकांना रोखणाऱ्या पोलिसांसोबत रेटारेटी करण्याचा प्रयत्न केला .मात्र पोलिसांनी झटापट करीत त्यांना रोखले .

मराठवाड्यात कमी पाऊस पडल्यामुळे येथील लहान मोठी धरणे तळ गाठत आहे . सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात आज केवळ 42 टक्के जलसाठा उरला आहे समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार मराठवाड्याला अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून 8.6 टीएमसी पाणी सोडण्यात निर्णय महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी 30 ऑक्टोबर रोजी घेतला.या निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये ,यासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील raजकीय पुढार्‍यांनी जोरदार आंदोलन सुरू केले.शिवाय त्यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्या. या याचिकांची सुनावणी 21 नोव्हेंबर आणि पाच डिसेंबर रोजी होत आहे .

या दोन्ही याचिकांमध्ये उच्च न्यायालयाने पाणी सोडण्यास मनाई आदेश दिले नाही. यामुळे तातडीने पाणी सोडणे अपेक्षित असताना पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास शासनाने रेड सिग्नल दिला .परिणामी मराठवाड्यातील पाणी प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध जनतेच्या भावना तीव्र होत आहे. शुक्रवारी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी मराठवाडा पाणी हक्क परिषदेच्या वतीने शुक्रवारी दुपारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर निदर्शने करण्यात आली .पाणी आमच्या हक्काचं , नाही कुणाच्या बापाचे, देत कसे नाहीत ,घेतल्याशिवाय राहणार नाही, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी रोखणाऱ्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे करायचे काय,? खाली मुंडके वर पाय, मराठवाड्याला पाणी मिळालेच पाहिजे , या घोषणा देत आंदोलन तासभर सुरू होते. 

यावेळी यातील काही आंदोलक अचानक पळतच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या केबिनच्या दिशेने निघाले .त्यांच्या पाठोपाठ अन्य आंदोलन ही आले ,यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखून आंदोलकांना पायऱ्यावरच रोखले. यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांसोबत झटापट करीत वरचा मजला गाठला तेथे मराठवाड्याला पाणी मिळालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आधी घोषणा देत अशा घोषणा देत होते. आंदोलकांनी सिंचन भवन दणाणून सोडला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना तेथेच रोखून धरले आणि काही वेळानंतर महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमणवार हे आंदोलकाकडे आले आणि त्यांनी त्यांच्या मागण्याची निवेदन घेतले आंदोलकाच्या भावना शासनाला कळविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या आंदोलनात जलतज्ञ डॉ. शंकर नागरे, डॉ. भगवानराव कापसे,नरहरी शिवपुरे, माजी मंत्री अनिल पटेल, उपअभियंता जयसिंह हिरे, संजय वाकचौरे ,विजय काकडे ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष द्वारकादास पाथरीकर यांच्यासह काही उद्योजक आणि व्यापारी महासंघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद