शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव दुचाकीने घरासमोर पाणी भरणाऱ्या मुलीला ५० फूट फरपटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 17:38 IST

दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार

ठळक मुद्देपाणी भरताना झाला अपघात

वाळूज महानगर : भरधाव दुचाकीस्वाराने महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जोराची धडक देऊन ५० फूट फरपटत नेल्याची भीषण घटना रांजणगाव येथील गांधीनगरात मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. 

आमिषा सुरेंद्र गुप्ता (१६, रा. गांधीनगर दत्तनगर, रांजणगाव), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. रात्री पाणी भरत असताना भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने आमिषाला जोराची धडक देत फरपटत नेले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीला सोडून दुचाकीस्वार (एमएच-२० ईटी-३३४४) घटनास्थळावरून पळून गेला. नातेवाईक व नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने आमिषाला शासकीय दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. 

गांधीनगरात तिच्या घरासमोरच भरधाव वाहनाने धडक देऊन विद्यार्थिनीला जखमी केल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली आणि तेथे मोठा जमाव जमला. नागरिकांनी तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याची घाई केली. इकडे दुचाकीस्वार आरोपी तेथून पसार झाला. गुप्ता कुटुंब हे गांधीनगरात भाड्याच्या खोलीत राहते. मुलीचे वडील गावाकडे गेले असून, घराचे बांधकाम सुरू असल्याने भाऊ कामाकडे गेला होता. घरी आई आणि आमिषा होती. नळाला पाणी आल्याने ती प्लास्टिकच्या बकेटने पाणी भरत होती. त्याचवेळी ही गंभीर घटना घडली. दुचाकीस्वाराचा शोध वाळूज एमआयडीसी पोलीस घेत आहेत.

औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात ती ११ वी (विज्ञान) वर्गात  शिक्षण घेत होती. अभ्यासात हुशार असलेल्या विद्यार्थिनीवर असा काळाने घाला घातल्याने गांधीनगर व दत्तनगरात शोककळा पसरली होती. अपघातप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून, सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. याप्रकरणी पोहेकॉ. चंद्रभान गवांदे अधिक तपास करीत आहेत. 

गतिरोधक तोडल्याने दुचाकीस्वार सुसाटसिमेंटचा गुळगुळीत रस्ता असल्याने चालक सुसाट वाहने पळविताना दिसतात.मध्यंतरी ग्रामपंचायतीला सांगून गतिरोधक टाकले होते; परंतु अनेकांनी ते आपल्या सोयीसाठी काढून टाकल्याचे दिसत आहे.निवासी वसाहतीच्या रस्त्यावरून दुचाकीस्वार अति वेगात जातात. येथे पुन्हा गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 

हातातील बकेटच्या ठिकऱ्याभरधाव दुचाकीस्वाराच्या जोरदार धडकेने तिच्या हातातील प्लास्टिक बकेटच्या ठिकऱ्या उडाल्या. मुलीला किमान ५० फुटांपेक्षा जास्त अंतरावर फरपटत नेल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. घटनास्थळावरील चित्र पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. 

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू