शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

औरंगाबाद जिल्ह्यातील पाणी शुद्धीकरण साधणे निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:52 IST

जिल्ह्यातील ४२५ गावांमध्ये बसविण्यात आलेली निर्जंतुकीकरण (क्लोरिनेशन युनिट) उपकरणे निकृष्ट असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सभापती विलास भुमरे यांनी केला

ठळक मुद्देआरोप : पुरवठादाराचा निधी रोखण्याची जि.प. सभापतींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील ४२५ गावांमध्ये बसविण्यात आलेली निर्जंतुकीकरण (क्लोरिनेशन युनिट) उपकरणे निकृष्ट असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सभापती विलास भुमरे यांनी केला असून, संबंधित पुरवठादारांची ३० टक्के रक्कम अदा न करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्यापाणीपुरवठा विभागाने ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने हातपंपांवर क्लोरिनेशन युनिट बसविण्याचा प्रस्ताव सादर केला होता. पूर्वी हातपंपांच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी क्लोरिन टाकले जायचे. परिणामी, क्लोरिनमुळे रासायनिक क्रिया होऊन हातपंपांचे पाईप खराब व्हायचे. ते टाळण्यासाठी निर्जंतुकीकरणाचे आधुनिक उपकरण हातपंपाला बसविल्यास क्लोरिनच्या गोळ्या पाण्यामध्ये आपोआप जातात व ग्रामीण नागरिकांना शुद्ध पाणी मिळते. यामुळे जुलाब, डायरिया, कावीळ आदी साथजन्य रोगांपासूनही बचाव होतो.तथापि, पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या या प्रस्तावाला मान्यता दिली. यासाठी जिल्हा नियोजन समितीने दीड कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. मात्र, पाणीपुरवठा विभागाने ही उपकरणे खरेदी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या; पण प्रतिसादच मिळत नव्हता. तब्बल ९ वेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या.शेवटी अंदाजपत्रकीय खर्चापेक्षा कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. ७ हजार ९९९ रुपये प्रति उपकरण या दराने ४२५ गावांत १८६५ पंपांवर ही उपकरणे बसविण्यात आली. पाणीपुरवठा विभागाने सदरील पुरवठादाराची ३० टक्के रक्कम देखभाल दुरुस्तीसाठी राखून ठेवली आहे.सर्वच ठिकाणी दर्जेदार उपकरणेयासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी ही उपकरणे हातपंपांना लावण्यात आलेली आहेत. सर्वच ठिकाणी ही उपकरणे सुरळीत व चांगल्या प्रकारे सुरू आहेत.या उपकरणांमुळे ग्रामीण भागात पाण्याद्वारे उद्भवणाऱ्या साथरोगाला आळा बसणार आहे. याशिवाय नागरिकांना शुद्ध पाणीही मिळत आहे. संबंधित पुरवठादारासोबत जि.प. पाणीपुरवठा विभागाने करार केलेला आहे की, या उपकरणांची नियमित देखभाल दुरुस्ती पुरवठादाराने करावी. ती न केल्यास संबंधित पुरवठादाराची ३० टक्के रक्कम वर्षभरासाठी राखून ठेवलेली आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद