शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
3
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
4
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
5
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
6
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
7
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
8
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
9
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
10
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
11
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
12
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
13
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
14
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
15
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
16
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
17
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
18
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
19
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
20
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील पाणी शुद्धीकरण साधणे निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:52 IST

जिल्ह्यातील ४२५ गावांमध्ये बसविण्यात आलेली निर्जंतुकीकरण (क्लोरिनेशन युनिट) उपकरणे निकृष्ट असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सभापती विलास भुमरे यांनी केला

ठळक मुद्देआरोप : पुरवठादाराचा निधी रोखण्याची जि.प. सभापतींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील ४२५ गावांमध्ये बसविण्यात आलेली निर्जंतुकीकरण (क्लोरिनेशन युनिट) उपकरणे निकृष्ट असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सभापती विलास भुमरे यांनी केला असून, संबंधित पुरवठादारांची ३० टक्के रक्कम अदा न करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्यापाणीपुरवठा विभागाने ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने हातपंपांवर क्लोरिनेशन युनिट बसविण्याचा प्रस्ताव सादर केला होता. पूर्वी हातपंपांच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी क्लोरिन टाकले जायचे. परिणामी, क्लोरिनमुळे रासायनिक क्रिया होऊन हातपंपांचे पाईप खराब व्हायचे. ते टाळण्यासाठी निर्जंतुकीकरणाचे आधुनिक उपकरण हातपंपाला बसविल्यास क्लोरिनच्या गोळ्या पाण्यामध्ये आपोआप जातात व ग्रामीण नागरिकांना शुद्ध पाणी मिळते. यामुळे जुलाब, डायरिया, कावीळ आदी साथजन्य रोगांपासूनही बचाव होतो.तथापि, पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या या प्रस्तावाला मान्यता दिली. यासाठी जिल्हा नियोजन समितीने दीड कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. मात्र, पाणीपुरवठा विभागाने ही उपकरणे खरेदी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या; पण प्रतिसादच मिळत नव्हता. तब्बल ९ वेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या.शेवटी अंदाजपत्रकीय खर्चापेक्षा कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. ७ हजार ९९९ रुपये प्रति उपकरण या दराने ४२५ गावांत १८६५ पंपांवर ही उपकरणे बसविण्यात आली. पाणीपुरवठा विभागाने सदरील पुरवठादाराची ३० टक्के रक्कम देखभाल दुरुस्तीसाठी राखून ठेवली आहे.सर्वच ठिकाणी दर्जेदार उपकरणेयासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी ही उपकरणे हातपंपांना लावण्यात आलेली आहेत. सर्वच ठिकाणी ही उपकरणे सुरळीत व चांगल्या प्रकारे सुरू आहेत.या उपकरणांमुळे ग्रामीण भागात पाण्याद्वारे उद्भवणाऱ्या साथरोगाला आळा बसणार आहे. याशिवाय नागरिकांना शुद्ध पाणीही मिळत आहे. संबंधित पुरवठादारासोबत जि.प. पाणीपुरवठा विभागाने करार केलेला आहे की, या उपकरणांची नियमित देखभाल दुरुस्ती पुरवठादाराने करावी. ती न केल्यास संबंधित पुरवठादाराची ३० टक्के रक्कम वर्षभरासाठी राखून ठेवलेली आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद