शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘जीबीएस’चा रुग्ण होऊ शकतो १५ दिवसांत बरा; आरोग्य यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:47 IST

घाटी रुग्णालयात उपचाराच्या दृष्टीने आवश्यक सुविधा असल्याचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर : पुण्यासह राज्यभरात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे रुग्ण आढळत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु हा आजार नवीन नसून, पूर्वीपासून रुग्ण आढळत आहेत. वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यास सौम्य प्रकारातील रुग्ण १५ ते ३० दिवसांत बरे होऊ शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

जीबीएस हा एक दुर्मीळ, परंतु गंभीर आजार असून, शरीरातील प्रतिकारशक्ती स्वतःच्या मज्जातंतूंवर हल्ला करते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि काही वेळा श्वास घेण्यासही अडचण निर्माण होते. जिल्ह्याला ‘जीबीएस’चा फारसा धोका नाही. तरीही आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. घाटी रुग्णालयात उपचाराच्या दृष्टीने आवश्यक सुविधा असल्याचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

जीबीएस कुठून आला?हा आजार शरीराच्या प्रतिकारशक्तीतील बिघाडामुळे होतो. यामध्ये रोगप्रतिकारक यंत्रणा परकीय जंतूंपासून संरक्षण करण्याऐवजी स्वतःच्या मज्जातंतूंवर हल्ला करते. हा आजार पूर्वीपासून आहे.

लक्षणे काय?गिळण्यास आणि बोलण्यास त्रास होणे, श्वास घेण्यास अडचण येणे, हात आणि पायात अशक्तपणा येणे, सतत अतिसार, स्नायू नियंत्रित करण्यास त्रास होणे, मुंग्या येणे, हालचाली मंदावणे, संतुलन बिघडणे इ. जीबीएसची लक्षणे आहेत.

मज्जातंतूवर दुष्परिणाम करतोजीबीएसमुळे मज्जातंतू (नर्व्ह) मोठ्या प्रमाणावर प्रभावित होतात. मेंदूपासून शरीरभर पसरलेल्या मज्जातंतूंवर हल्ला झाल्यास संवेदनशीलता कमी होते. स्नायूंची क्रिया मंदावते आणि व्यक्ती हालचाल करण्यास असमर्थ ठरते. काही रुग्णांना दीर्घकालीन स्नायू दुर्बलता जाणवते. गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांच्या श्वासोच्छवासावरही परिणाम होतो. श्वास नियंत्रित करणाऱ्या स्नायूंवर परिणाम झाल्यास व्हेंटिलेटर लागते.

‘जीबीएस’ पासून वाचण्यासाठी काय कराल?कोणत्याही संसर्गानंतर शरीरातील बदलांकडे लक्ष द्यावे. त्याकडे दुर्लक्ष नको. पाणी उकळून प्यावे. बाहेरचे पाणी, उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळावे. कच्चे अन्नपदार्थ खाणे टाळावे. हात स्वच्छ धुवा आणि संसर्गापासून बचाव करावा. अशक्तपणा, मुंग्या येणे, हालचाली मंदावणे यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरित न्यूरॉलॉजिस्टचा सल्ला घ्या.

लक्षणांकडे दुर्लक्ष नकोजीबीएसचे रुग्ण वर्षभर आढळतात. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. वेळेवर निदान झाले तर ९० टक्के लवकर बरे होतात. काही रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडते. काही लक्षणे जाणवल्यास वेळीच उपचार घ्यावा. दुर्लक्ष करू नये.- डाॅ. पांडुरंग वट्टमवार, न्यूरॉलॉजिस्ट

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य