शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

‘जीबीएस’चा रुग्ण होऊ शकतो १५ दिवसांत बरा; आरोग्य यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:47 IST

घाटी रुग्णालयात उपचाराच्या दृष्टीने आवश्यक सुविधा असल्याचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर : पुण्यासह राज्यभरात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे रुग्ण आढळत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु हा आजार नवीन नसून, पूर्वीपासून रुग्ण आढळत आहेत. वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यास सौम्य प्रकारातील रुग्ण १५ ते ३० दिवसांत बरे होऊ शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

जीबीएस हा एक दुर्मीळ, परंतु गंभीर आजार असून, शरीरातील प्रतिकारशक्ती स्वतःच्या मज्जातंतूंवर हल्ला करते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि काही वेळा श्वास घेण्यासही अडचण निर्माण होते. जिल्ह्याला ‘जीबीएस’चा फारसा धोका नाही. तरीही आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. घाटी रुग्णालयात उपचाराच्या दृष्टीने आवश्यक सुविधा असल्याचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

जीबीएस कुठून आला?हा आजार शरीराच्या प्रतिकारशक्तीतील बिघाडामुळे होतो. यामध्ये रोगप्रतिकारक यंत्रणा परकीय जंतूंपासून संरक्षण करण्याऐवजी स्वतःच्या मज्जातंतूंवर हल्ला करते. हा आजार पूर्वीपासून आहे.

लक्षणे काय?गिळण्यास आणि बोलण्यास त्रास होणे, श्वास घेण्यास अडचण येणे, हात आणि पायात अशक्तपणा येणे, सतत अतिसार, स्नायू नियंत्रित करण्यास त्रास होणे, मुंग्या येणे, हालचाली मंदावणे, संतुलन बिघडणे इ. जीबीएसची लक्षणे आहेत.

मज्जातंतूवर दुष्परिणाम करतोजीबीएसमुळे मज्जातंतू (नर्व्ह) मोठ्या प्रमाणावर प्रभावित होतात. मेंदूपासून शरीरभर पसरलेल्या मज्जातंतूंवर हल्ला झाल्यास संवेदनशीलता कमी होते. स्नायूंची क्रिया मंदावते आणि व्यक्ती हालचाल करण्यास असमर्थ ठरते. काही रुग्णांना दीर्घकालीन स्नायू दुर्बलता जाणवते. गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांच्या श्वासोच्छवासावरही परिणाम होतो. श्वास नियंत्रित करणाऱ्या स्नायूंवर परिणाम झाल्यास व्हेंटिलेटर लागते.

‘जीबीएस’ पासून वाचण्यासाठी काय कराल?कोणत्याही संसर्गानंतर शरीरातील बदलांकडे लक्ष द्यावे. त्याकडे दुर्लक्ष नको. पाणी उकळून प्यावे. बाहेरचे पाणी, उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळावे. कच्चे अन्नपदार्थ खाणे टाळावे. हात स्वच्छ धुवा आणि संसर्गापासून बचाव करावा. अशक्तपणा, मुंग्या येणे, हालचाली मंदावणे यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरित न्यूरॉलॉजिस्टचा सल्ला घ्या.

लक्षणांकडे दुर्लक्ष नकोजीबीएसचे रुग्ण वर्षभर आढळतात. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. वेळेवर निदान झाले तर ९० टक्के लवकर बरे होतात. काही रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडते. काही लक्षणे जाणवल्यास वेळीच उपचार घ्यावा. दुर्लक्ष करू नये.- डाॅ. पांडुरंग वट्टमवार, न्यूरॉलॉजिस्ट

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य