शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

औरंगाबादच्या छावणी परिसरातील गॅस्ट्रोचा उद्रेक गाजला विधानसभेमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 13:16 IST

छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रेकाचा मुद्दा बुधवारी थेट विधानसभेत गाजला. या प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल, असे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषित केले. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून दोषींना अभय देणा-यांना चौकशी पूर्ण करून कारवाई करावी लागणार आहे. 

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांची चौकशीची घोषणा दोषींना अभय देणा-यांना आता करावी लागणार कारवाईचौकशीचा अहवाल अद्याप सादरच नाही

औरंगाबाद : छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रेकाचा मुद्दा बुधवारी थेट विधानसभेत गाजला. या प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल, असे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषित केले. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून दोषींना अभय देणा-यांना चौकशी पूर्ण करून कारवाई करावी लागणार आहे.  

छावणी परिसरात ११ नोव्हेंबर रोजी २५० पेक्षा अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. छावणी सामान्य रुग्णालयात तब्बल १२ दिवस गॅस्ट्रोच्या रुग्णांचा ओघ सुरू होता. रुग्णांची संख्या अवघ्या काही दिवसांत सहा हजारांवर पोहोचली. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना जलजन्य आजाराने विळखा घातल्याने आरोग्य विभागाच्या पायाखालची जमीनच सरकली. गॅस्ट्रोच्या उद्रेकाची राज्यभरात गंभीर नोंद घेण्यात आली. 

छावणीत एक लाईन लष्करी भागासाठी, तर दुसरी लाईन नागरी वसाहतींसाठी आहे. एका नाल्यातून जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीला कोणतीही उंची देण्यात आली नव्हती. दोन दिवस ही लाईन बंद होती. याचदरम्यान लिकेजमधून दूषित पाणी आत गेले आणि छावणी भागातील शेकडो नागरिकांना ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो झाल्याचे समोर आले. याप्रकरणी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

पाच सदस्यांच्या या समितीकडून चौकशी केली जात आहे. कोणाचा हलगर्जीपणा झाला, गॅस्ट्रोच्या उद्रेकाला कोण जबाबदार आहे, त्याचा शोध घेतला जात आहे; परंतु समिती स्थापन होऊन पंधरा दिवस उलटले, तरीही चौकशी सुरूच आहे. या ना त्या कारणाने चौकशी लांबत असल्याने दोषींवर कारवाईच होत नाही. जाणीवपूर्वक चौकशी पूर्ण करण्याक डे दुर्लक्ष करून दोषींना अभय देण्यात येत असल्याचा आरोप होतो; परंतु हा विषय विधानसभेत पोहोचल्याने आता कुठे चौकशी पूर्ण होऊन दोषींवर कारवाई होईल, असे दिसते.

लवकरच चौकशी पूर्णचौकशी समितीची एक बैठक झाली आहे. काही जण गैरहजर राहत असल्याने चौकशी लांबली; परंतु आता आठवडाभरात चौकशी पूर्ण केली जाईल. पाणीपुरवठा, अभियंता, स्वच्छता विभागाची चौकशी करून हलगर्जीपणा दिसून आला, तर कारवाई केली केली जाईल. संबंधित जलवाहिनीची उंची वाढविण्यात आली आहे.- संजय गारोल, उपाध्यक्ष, छावणी परिषद

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादchavaniछावणी