शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

औरंगाबादच्या छावणी परिसरातील गॅस्ट्रोचा उद्रेक गाजला विधानसभेमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 13:16 IST

छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रेकाचा मुद्दा बुधवारी थेट विधानसभेत गाजला. या प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल, असे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषित केले. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून दोषींना अभय देणा-यांना चौकशी पूर्ण करून कारवाई करावी लागणार आहे. 

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांची चौकशीची घोषणा दोषींना अभय देणा-यांना आता करावी लागणार कारवाईचौकशीचा अहवाल अद्याप सादरच नाही

औरंगाबाद : छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रेकाचा मुद्दा बुधवारी थेट विधानसभेत गाजला. या प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल, असे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषित केले. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून दोषींना अभय देणा-यांना चौकशी पूर्ण करून कारवाई करावी लागणार आहे.  

छावणी परिसरात ११ नोव्हेंबर रोजी २५० पेक्षा अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. छावणी सामान्य रुग्णालयात तब्बल १२ दिवस गॅस्ट्रोच्या रुग्णांचा ओघ सुरू होता. रुग्णांची संख्या अवघ्या काही दिवसांत सहा हजारांवर पोहोचली. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना जलजन्य आजाराने विळखा घातल्याने आरोग्य विभागाच्या पायाखालची जमीनच सरकली. गॅस्ट्रोच्या उद्रेकाची राज्यभरात गंभीर नोंद घेण्यात आली. 

छावणीत एक लाईन लष्करी भागासाठी, तर दुसरी लाईन नागरी वसाहतींसाठी आहे. एका नाल्यातून जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीला कोणतीही उंची देण्यात आली नव्हती. दोन दिवस ही लाईन बंद होती. याचदरम्यान लिकेजमधून दूषित पाणी आत गेले आणि छावणी भागातील शेकडो नागरिकांना ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो झाल्याचे समोर आले. याप्रकरणी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

पाच सदस्यांच्या या समितीकडून चौकशी केली जात आहे. कोणाचा हलगर्जीपणा झाला, गॅस्ट्रोच्या उद्रेकाला कोण जबाबदार आहे, त्याचा शोध घेतला जात आहे; परंतु समिती स्थापन होऊन पंधरा दिवस उलटले, तरीही चौकशी सुरूच आहे. या ना त्या कारणाने चौकशी लांबत असल्याने दोषींवर कारवाईच होत नाही. जाणीवपूर्वक चौकशी पूर्ण करण्याक डे दुर्लक्ष करून दोषींना अभय देण्यात येत असल्याचा आरोप होतो; परंतु हा विषय विधानसभेत पोहोचल्याने आता कुठे चौकशी पूर्ण होऊन दोषींवर कारवाई होईल, असे दिसते.

लवकरच चौकशी पूर्णचौकशी समितीची एक बैठक झाली आहे. काही जण गैरहजर राहत असल्याने चौकशी लांबली; परंतु आता आठवडाभरात चौकशी पूर्ण केली जाईल. पाणीपुरवठा, अभियंता, स्वच्छता विभागाची चौकशी करून हलगर्जीपणा दिसून आला, तर कारवाई केली केली जाईल. संबंधित जलवाहिनीची उंची वाढविण्यात आली आहे.- संजय गारोल, उपाध्यक्ष, छावणी परिषद

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादchavaniछावणी