शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

औरंगाबादच्या छावणी परिसरातील गॅस्ट्रोचा उद्रेक गाजला विधानसभेमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 13:16 IST

छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रेकाचा मुद्दा बुधवारी थेट विधानसभेत गाजला. या प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल, असे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषित केले. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून दोषींना अभय देणा-यांना चौकशी पूर्ण करून कारवाई करावी लागणार आहे. 

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांची चौकशीची घोषणा दोषींना अभय देणा-यांना आता करावी लागणार कारवाईचौकशीचा अहवाल अद्याप सादरच नाही

औरंगाबाद : छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रेकाचा मुद्दा बुधवारी थेट विधानसभेत गाजला. या प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल, असे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषित केले. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून दोषींना अभय देणा-यांना चौकशी पूर्ण करून कारवाई करावी लागणार आहे.  

छावणी परिसरात ११ नोव्हेंबर रोजी २५० पेक्षा अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. छावणी सामान्य रुग्णालयात तब्बल १२ दिवस गॅस्ट्रोच्या रुग्णांचा ओघ सुरू होता. रुग्णांची संख्या अवघ्या काही दिवसांत सहा हजारांवर पोहोचली. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना जलजन्य आजाराने विळखा घातल्याने आरोग्य विभागाच्या पायाखालची जमीनच सरकली. गॅस्ट्रोच्या उद्रेकाची राज्यभरात गंभीर नोंद घेण्यात आली. 

छावणीत एक लाईन लष्करी भागासाठी, तर दुसरी लाईन नागरी वसाहतींसाठी आहे. एका नाल्यातून जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीला कोणतीही उंची देण्यात आली नव्हती. दोन दिवस ही लाईन बंद होती. याचदरम्यान लिकेजमधून दूषित पाणी आत गेले आणि छावणी भागातील शेकडो नागरिकांना ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो झाल्याचे समोर आले. याप्रकरणी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

पाच सदस्यांच्या या समितीकडून चौकशी केली जात आहे. कोणाचा हलगर्जीपणा झाला, गॅस्ट्रोच्या उद्रेकाला कोण जबाबदार आहे, त्याचा शोध घेतला जात आहे; परंतु समिती स्थापन होऊन पंधरा दिवस उलटले, तरीही चौकशी सुरूच आहे. या ना त्या कारणाने चौकशी लांबत असल्याने दोषींवर कारवाईच होत नाही. जाणीवपूर्वक चौकशी पूर्ण करण्याक डे दुर्लक्ष करून दोषींना अभय देण्यात येत असल्याचा आरोप होतो; परंतु हा विषय विधानसभेत पोहोचल्याने आता कुठे चौकशी पूर्ण होऊन दोषींवर कारवाई होईल, असे दिसते.

लवकरच चौकशी पूर्णचौकशी समितीची एक बैठक झाली आहे. काही जण गैरहजर राहत असल्याने चौकशी लांबली; परंतु आता आठवडाभरात चौकशी पूर्ण केली जाईल. पाणीपुरवठा, अभियंता, स्वच्छता विभागाची चौकशी करून हलगर्जीपणा दिसून आला, तर कारवाई केली केली जाईल. संबंधित जलवाहिनीची उंची वाढविण्यात आली आहे.- संजय गारोल, उपाध्यक्ष, छावणी परिषद

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादchavaniछावणी