शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शहरात उच्छाद मांडणारी चंदन चोरांची टोळी गजाआड; १५ गुन्हे केल्याची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 19:43 IST

गतवर्षी २०२० साली औरंगाबाद शहरातील सुभेदारी विश्रामगृह,जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान, श्रेयनगर, उस्मानपुरा, वाळूज एमआयडीसी आदी १६ ठिकाणी आणि यावर्षी चार ठिकाणी चंदन चोरीच्या घटना घडल्या होत्या.

ठळक मुद्दे २१ किलो चंदनासह २ लाखांचा ऐवज हस्तगतचंदनचोर नागरिकांना न जुमानता ते त्यांच्यासमोर झाड तोडून नेत.

औरंगाबाद : दोन वर्षांपासून शहरातील वेगवेगळ्या भागातील चंदनाची झाडे तोडून नेणाऱ्या चंदन तस्करांच्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री सावंगी केंब्रिज चौक रस्त्यावर बेड्या घातल्या. या टोळीकडून २१ किलो चंदनाचे लाकूड, दोन मोटारसायकली, मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे १ लाख ९४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गौसखान महेमूद खान (६०,रा. फाजलवाडी, ता.फुलंब्री),अनिस खान अयुब खान (२१, रा. आडगाव माहुली), नय्युम अयुब पठाण(२६, रा. फाजलवाडी), नसेव्ब खान अली खान (२४, रा. आडगांव) आणि सलीम मोहम्मद खान (२६, रा.फाजलवाडी )अशी अटकेतील चंदनतस्करांची नावे आहेत.

गतवर्षी २०२० साली औरंगाबाद शहरातील सुभेदारी विश्रामगृह,जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान, श्रेयनगर, उस्मानपुरा, वाळूज एमआयडीसी आदी १६ ठिकाणी आणि यावर्षी चार ठिकाणी चंदन चोरीच्या घटना घडल्या होत्या. चंदनचोर नागरिकांना न जुमानता ते त्यांच्यासमोर झाड तोडून नेत. हे तस्कर सशस्त्र असतात. यामुळे नागरिक त्यांचा सामना करण्यास धजावत नसत. शिवाय रात्री पोलिसांची गस्त तुरळक असते. ही बाब हेरून चंदनतस्करांनी दोन वर्षांपासून उच्छाद मांडला होता. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त यांनी चंदनचोरांना पकडण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले. 

सहायक आयुक्त रवींद्र साळोखे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमोल देशमुख हे या टोळीच्या मागावर होते. रात्री ही टोळी चोरीचे चंदन विक्री करण्यासाठी सावंगी ते केंब्रिज चौक रस्त्याने जाणार असल्याची गुप्त माहिती, खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली. पोलीस उपनिरीक्षक देशमुख, कर्मचारी नंदकुमार भंडारे, किरण गावंडे, संजयसिंह राजपूत, दीपक देशमुख, ओमप्रकाश बनकर, नितीन देशमुख,धर्मराज गायकवाड, बबन इप्पर, अविनाश थोरे आणि महिला कॉन्स्टेबल मोहिनी चिंचोळकर यांच्या पथकाने मध्यरात्रीनंतर सावंगी बायपासवरील नारेगाव चौफुलीवर सापळा रचला. यावेळी दोन मोटारसायकलवरून जाणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अडवले असता पोलिसांना हुलकावणी देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना पकडले. यावेळी त्यांच्याजवळील गोणपाटात २१ किलो चंदनाचे तीन तुकडे आढळून आले.

शहरातील १५ गुन्ह्यांची कबुलीगुन्हे शाखेने मुसक्या आवळल्यावर या टोळीला पोलीस आयुक्तालयात नेले. तेथे त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी शहरातील जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान, वाळूज एमआयडीसी, छावणी कार्यालय परिसर, क्राईस्ट चर्च छावणी, चिकलठाणा एसटी कार्यशाळा, श्रेयनगर, उस्मानपुरा,कडा कार्यालय परिसर,समर्थनगर,पुष्पनगरी, सिडको एन ३, सुवर्णपेढी समोर, मुकुंदवाडी गाव, विद्युत कॉलनी, नाथ व्हॅली शाळेमागील कॉलनीत, हडको एन ११,आयडिया कॉल सेंटर, महावीर चौक परिसर,फुलंब्री , कन्नड आणि जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे चंदन चोरी केल्याची कबूल केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस