शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

G20 Summit: १२१ मोकाट जनावरे, ४० श्वानांचा मनपाकडून ‘बंदोबस्त’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 15:59 IST

मकबरा परिसरातील पाच वराह थेट यमसदनी

छत्रपती संभाजीनगर : जी-२० परिषदेच्या निमित्ताने विदेशी पाहुण्यांसमोर मोकाट जनावरे, श्वान, वराह दिसू नयेत, म्हणून मनपाच्या पशुसंवर्धन विभागाने विशेष बंदोबस्त केला. मोकाट जनावरांना दंड लावून मालकाला देण्यात आले. ४० पेक्षा अधिक श्वानांना तीन दिवस मनपाचा पाहुणचार मिळणार आहे. बीबी का मकबरा परिसरातील पाच वराह थेट यमसदनी पाठविण्यात आले.

जी-२० परिषदेच्या निमित्ताने तब्बल १०० कोटी रुपये खर्च करून शहर सजविण्यात आले. रस्त्याच्या कडेला आकर्षक फुलांची झाडे लावण्यात आली. ही झाडे बकऱ्या, मोकाट जनावरे रात्री खात असल्याचे निदर्शनास येऊ लागले. महापालिकेचा उद्यान विभाग दररोज नवीन झाडे लावून त्रस्त झाला. शेवटी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात १२१ जनावरे कोंडवाड्यात टाकण्यात आली. १ एप्रिलपासून आतापर्यंत ६९९ मोठी जनावरे, २२२ लहान अशी एकूण ९२१ जनावरे पकडण्यात आली.

त्यांच्याकडून तीन लाख ६२ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यापुढे संबंधित मालकांची जनावरे मनपाला सापडल्यास थेट फौजदारी कारवाईची सूचनाही देण्यात आली. रविवारी शहरातील मुख्य रस्त्यांवरील तब्बल ४० पेक्षा अधिक श्वानही ताब्यात घेण्यात आले. त्यांची नसबंदी करून १ मार्चला सोडून देण्यात येणार असल्याचे उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले.

मकबरा, मुकुंदवाडी, चिकलठाणा विमानतळ भागात सर्वात जास्त वराह असल्याची माहिती मिळाली. जी-२० परिषदेच्या निमित्ताने एकही वराह बाहेर दिसता कामा नये, यादृष्टीने शहरातील सर्व वराह मालकांना संबधित पोलिस ठाण्यात बाेलावून कायद्याच्या चौकटीत समज देण्यात आली. क्रांतीचौक, सातारा, बेगमपुरा पोलिस ठाण्यात वराहमालकांवर सात गुन्हेसुद्धा नोंदविण्यात आल्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शाहेद शेख यांनी सांगितले. कायद्याच्या आदेशानुसार पाच वराह मारण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका