शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पोलिसांची आगळीवेगळी कारवाई; अपघाताच्या गुन्ह्यात फिर्यादी अन् आरोपी एकच कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 12:20 IST

प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार अपघातात एक उच्चपदस्थ अधिकारी होता.

छत्रपती संभाजीनगर : सोमवारी सायंकाळी बीबी-का-मकबऱ्यासमोर चारचाकी व दुचाकीचा अपघात झाला. यात जखमींनी अचानक तक्रारीस नकार दिला. त्यानंतर, एका हाॅटेल चालकाने ठाण्यात हजर होऊन अपघात केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना, तक्रारदाराच्या तक्रारीवरून तक्रारदारालाच आरोपी करत, एक आगळा वेगळा गुन्हा बेगमपुरा पोलिसांनी दाखल केला.

सोमवारी दुपारी मकबरा परिसरात एम एच १५ - एच एम - ९९५२ या कार चालकाने दोघांना उडविले. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार यात एक उच्चपदस्थ अधिकारी होता. हनुमान टेकडी परिसरात एका सोसायटीत कार सोडून तो पसार झाला. जखमी रात्री ठाण्यातही गेले. मात्र, अचानक काही कॉल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. याच दरम्यान पडेगावमधील रायबा हॉटेलचे चालक समीर श्रीकृष्ण अंबारखाने हे ठाण्यात दाखल झाले. हा अपघात माझ्याकडून झाल्याची कबुली देत, अपघातानंतर मी घाबरल्याने निघून गेलो, असा जबाब दिला. त्यानुसार, पोलिसांनी अंबारखाने यांच्यावर गुन्हा दाखल केला.

या संदर्भात एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला विचारणा केली असता, हा गुन्हाच योग्य प्रकारे दाखल केला नसल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. एखाद्या घटनेत आरोपी स्वत: ठाण्यात हजर होत असेल, तर उपस्थित पोलिस अंमलदार, डीओने त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे स्वत: फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करणे अपेक्षित असते, शिवाय डायरी नोंदमध्ये तसे नमूद केले, तरी न्यायालयात तेही एफआयआरच्याच समान मान्य केले जाते. त्यामुळे एफआयआरमध्ये फिर्यादी व आरोपी एक होऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

कबुलीजबाब सिद्ध होणार नाहीतपासात सिद्ध झाल्यानंतर तक्रारदाराला आरोपी करता येते. मात्र, त्यासाठी तपास, चौकशी आवश्यक असते. एफआयआर दाखल करतानाच, तक्रारदारालाच आरोपी करणे योग्य नाही. कायद्याच्या दृष्टीने ते टिकणारही नाही. भारतीय पुरावा कायदा कलम २५ नुसार पोलिस अधिकाऱ्याला दिलेला कबुलीजबाब कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीविरुद्ध सिद्ध करता येणार नाही.- ॲड.प्रशांत नागरगोजे, कायदे अभ्यासक.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस