शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची आगळीवेगळी कारवाई; अपघाताच्या गुन्ह्यात फिर्यादी अन् आरोपी एकच कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 12:20 IST

प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार अपघातात एक उच्चपदस्थ अधिकारी होता.

छत्रपती संभाजीनगर : सोमवारी सायंकाळी बीबी-का-मकबऱ्यासमोर चारचाकी व दुचाकीचा अपघात झाला. यात जखमींनी अचानक तक्रारीस नकार दिला. त्यानंतर, एका हाॅटेल चालकाने ठाण्यात हजर होऊन अपघात केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना, तक्रारदाराच्या तक्रारीवरून तक्रारदारालाच आरोपी करत, एक आगळा वेगळा गुन्हा बेगमपुरा पोलिसांनी दाखल केला.

सोमवारी दुपारी मकबरा परिसरात एम एच १५ - एच एम - ९९५२ या कार चालकाने दोघांना उडविले. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार यात एक उच्चपदस्थ अधिकारी होता. हनुमान टेकडी परिसरात एका सोसायटीत कार सोडून तो पसार झाला. जखमी रात्री ठाण्यातही गेले. मात्र, अचानक काही कॉल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. याच दरम्यान पडेगावमधील रायबा हॉटेलचे चालक समीर श्रीकृष्ण अंबारखाने हे ठाण्यात दाखल झाले. हा अपघात माझ्याकडून झाल्याची कबुली देत, अपघातानंतर मी घाबरल्याने निघून गेलो, असा जबाब दिला. त्यानुसार, पोलिसांनी अंबारखाने यांच्यावर गुन्हा दाखल केला.

या संदर्भात एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला विचारणा केली असता, हा गुन्हाच योग्य प्रकारे दाखल केला नसल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. एखाद्या घटनेत आरोपी स्वत: ठाण्यात हजर होत असेल, तर उपस्थित पोलिस अंमलदार, डीओने त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे स्वत: फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करणे अपेक्षित असते, शिवाय डायरी नोंदमध्ये तसे नमूद केले, तरी न्यायालयात तेही एफआयआरच्याच समान मान्य केले जाते. त्यामुळे एफआयआरमध्ये फिर्यादी व आरोपी एक होऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

कबुलीजबाब सिद्ध होणार नाहीतपासात सिद्ध झाल्यानंतर तक्रारदाराला आरोपी करता येते. मात्र, त्यासाठी तपास, चौकशी आवश्यक असते. एफआयआर दाखल करतानाच, तक्रारदारालाच आरोपी करणे योग्य नाही. कायद्याच्या दृष्टीने ते टिकणारही नाही. भारतीय पुरावा कायदा कलम २५ नुसार पोलिस अधिकाऱ्याला दिलेला कबुलीजबाब कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीविरुद्ध सिद्ध करता येणार नाही.- ॲड.प्रशांत नागरगोजे, कायदे अभ्यासक.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस