लातुरात बाप-लेकीवर झाले एकाच चितेवर अंत्यसंस्कार
By Admin | Updated: May 23, 2016 23:48 IST2016-05-23T23:38:24+5:302016-05-23T23:48:40+5:30
लातूर/ रेणापूर : उन्हाळ्याची सुट्टी असल्याने आळंदीच्या दर्शनासाठी गेलेल्या सिंधगाव येथील पंडगे व नागिमे कुटुंबावर सोमवारी काळाने घाला

लातुरात बाप-लेकीवर झाले एकाच चितेवर अंत्यसंस्कार
लातूर/ रेणापूर : उन्हाळ्याची सुट्टी असल्याने आळंदीच्या दर्शनासाठी गेलेल्या सिंधगाव येथील पंडगे व नागिमे कुटुंबावर सोमवारी काळाने घाला घातला़ औसा तालुक्यातील आलमला पाटीनजीक पंडगे यांच्या कारला अपघात झाला आणि बाप-लेकीसह मेहुणीचा मृत्यू झाला़ या बाप- लेकीवर लातुरातील मारवाडी स्मशानभूमीत सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़ या घटनेमुळे पंडगे व नागिमे कुटुंब दु:खसागरात बुडाले आहेत़
रेणापूर तालुक्यातील सिंधगाव येथील राजेश पंडगे (४०) हे लातूर तालुक्यातील ममदापूर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असून ते लातुरात राहतात़ त्यांना आई- वडिलांसह पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे़ त्यांचे साडू व्यंकट नागिमे हे चाकूर तालुक्यातील महाळंग्रा येथे राहतात़ सध्या उन्हाळ्याची सुट्टी आणि स्वत:ची कार असल्याने कुटुंबासह आळंदी, पंढरपूरचे दर्शन करुन येऊ असे राजेश पंडगे यांनी पत्नी सरिता पंडगे यांना सांगितले़ तेव्हा आपल्याबरोबरच बहीण, भावजी व त्यांच्या मुलांनाही घेऊन जाऊ, असे सरिता पंडगे म्हणाल्या़ देवदर्शनसंदर्भातील माहिती बहीण मिरा नागिमे यांना सांगितली़ त्यांनीही त्यास होकार दिला़
त्यामुळे राजेश पंडगे यांच्यासह पत्नी सरिता पंडगे, मुलगा प्रणव पंडगे, मुलगी समृध्दी पंडगे, मेहुणी मिरा व्यंकट नागिमे, राहुल व्यंकट नागिमे आणि तळणी येथील अनुसया उगिले सात जण शुक्रवारी लातूर येथून स्वत:च्या कार (एमएच २४, एएफ ४२३८) मधून आळंदीला निघाले़ तेथील दर्शन घेऊन पंढरपूरचे दर्शन घेतले़
सोमवारी पहाटे त्यांची कार औसा- लातूर रस्त्यावरील आलमला पाटीजवळ पोहोचली असता ट्रॅव्हल्स (एमएच १० एडब्ल्यू ५९७५) शी अपघात झाला़ यात राजेश पंडगे, मुलगी समृध्दी पंडगे आणि मेहुणी मिरा पंडगे यांचा जागीच मृत्यू झाला़
राजेश पंडगे आणि मुलगी समृध्दी पंडगे या बाप- लेकीवर सोमवारी दुपारी लातुरातील मारवाडी स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, या घटनेमुळे सिंधगाववर शोककळा पसरली आहे़
बाबा, ताईने आक्रोश़़़
राजेश पंडगे आणि समृध्दी पंडगे यांच्यावर अंत्यसंस्कार करताना मुलगा प्रणव पंडगे याने बाबा, ताई मला सोडून गेले़ जवळ आईही नाही, असे म्हणत आक्रोश करीत होता़ प्रणवचे आजी- आजोबा आपले दु:ख बाजूला ठेवून त्याला सावरण्याचा प्रयत्न करीत होते़