मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील विहिरीला निधीची कोरड
By Admin | Updated: April 25, 2016 23:33 IST2016-04-25T23:18:29+5:302016-04-25T23:33:47+5:30
गोविंद इंगळे , निलंगा सप्टेंबर २०१५़़़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिलाच दुष्काळी दौरा निलंगा तालुक्यात़़़ या दौऱ्यात सिंचन विहिरीचे उद्घाटन करण्यासाठी रातोरात तोंडी मंजुरी देवून

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील विहिरीला निधीची कोरड
गोविंद इंगळे , निलंगा
सप्टेंबर २०१५़़़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिलाच दुष्काळी दौरा निलंगा तालुक्यात़़़ या दौऱ्यात सिंचन विहिरीचे उद्घाटन करण्यासाठी रातोरात तोंडी मंजुरी देवून निटूरच्या एका महिला शेतकऱ्याच्या शेतात मार्कआऊट पडले़ अचानक झालेल्या या लाभाने हुरळून गेलेल्या त्या शेतकऱ्याने पदरमोड करुन ५ लाख खर्च केले़ विहीर पूर्ण झालीही़ पण, अद्याप एक छदामही तिच्या पदरी पडला नाही, असा आरोप महिला शेतकऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना केला़
निलंगा तालुक्यातील निटूर येथील लक्ष्मीबाई बंडाप्पा हासबे या शेतकरी महिलेचे निटूर रस्त्यालगतच शेत आहे़ या रस्त्यावरुनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सप्टेबर २०१५ मध्ये पहिला दुष्काळी दौरा निघाला होता़ त्यांच्या दौऱ्याच्या मार्गावर प्रशासनाने एका दिवसात वातावरणाचा नूर पालटून टाकला़ ठिकठिकाणी शेततळी, सिंचन विहिरींचे मार्कआऊट टाकून दिले़ त्यातीलच एक लक्ष्मीबाई हासबे़ त्यांच्या शेतातही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी असेच रातोरात मार्कआऊट टाकून दिले़ लक्ष्मीबार्इंना सिंचन विहिरीची तोंडीच मंजुरी देवून हे काम उरकण्यात आले़ कदाचित् मुख्यमंत्री तयार झाले तर त्यांच्याच हस्ते या विहिरीचे उद्घाटन करण्याचा प्रशासनाचा बेत़ ध्यानीमनी नसताना अन् वर्षानुवर्षे कागदांची पुंगळी घेवून प्रशासनाचे उंबरे झिजविले तरी मंजुरी मिळत नसताना आपल्या शेतात थेट विहिरीचे मार्कआऊट पडल्याने लक्ष्मीबाई हुरळून गेल्या़ दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आले तसे गेलेही़
या विहिरीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होवू शकले नाही़ मात्र, लक्ष्मीबार्इंनी मंजुरी मिळाल्याचे गृहीत धरुन पदरमोड करीत या विहिरीवर आतापर्यंत ५ लाख रुपये खर्च केले़
५१ फूट खोलीची विहीर पूर्णत्वास नेलीही़ त्यास चांगले पाणी लागले़ हा आनंद असला तरी मुख्यमंत्र्यांनी पाठ करताच प्रशासनातील अधिकारी लक्ष्मीबाईंच्या विहिरीस विसरुनच गेले़ आज सात महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असला तरी लक्ष्मीबार्इंच्या हाती एक रुपयाही या प्रशासनाने टेकवला नाही़ अनुदानासाठी पंचायत समितीला हेलपाटे मारुन चप्पल झिजली़ पण, अधिकाऱ्यांना पाझर फुटला नाही़ पैश्याचे नाव घेतले की, केवळ कौतुकाची थाप देवून टोलवाटोलवी केली जात असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया लक्ष्मीबाई हासबे यांनी दिली़
\त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या मार्गावर प्रशासनाने एका दिवसात वातावरणाचा नूर पालटून टाकला़ ठिकठिकाणी शेततळी, सिंचन विहिरींचे मार्कआऊट टाकून दिले़ त्यातीलच एक लक्ष्मीबाई हासबे़ त्यांच्या शेतातही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी असेच रातोरात मार्कआऊट टाकून दिले़ लक्ष्मीबार्इंना सिंचन विहिरीची तोंडीच मंजुरी देवून हे काम उरकण्यात आले़ कदाचित् मुख्यमंत्री तयार झाले तर त्यांच्याच हस्ते या विहिरीचे उद्घाटन करण्याचा प्रशासनाचा बेत़ मात्र उद्घाटन होऊ शकले नव्हते.