शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

वन विभाग व इको बटालियनने १,०८० हेक्टरवरील ओसाड माळरानावर फुलवले नंदनवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:14 IST

जागतिक पर्यावरण दिन:या हरित उपक्रमामुळे डोंगरांवरील वनसंपदा पुन्हा बहरू लागली आहे.

 

छत्रपती संभाजीनगर: "झाडे लावा, झाडे जगवा", "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" अशा घोषवाक्यांमधून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. मात्र, अनेकदा केवळ औपचारिकतेपुरतेच हे उपक्रम मर्यादित राहतात. याला अपवाद ठरली आहे ‘इको बटालियन’. निवृत्त लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक जबाबदार संघटना, जिने गेल्या सात वर्षांत झाडे लावण्याचे केवळ नारे न देता, प्रत्यक्ष कृतीद्वारे डोंगर-दऱ्यांत, माळरानावर हिरवळ फुलवली आहे.

इको बटालियनने वन विभागाच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगरमधील ओसाड माळरानावर तब्बल १,०८० हेक्टर क्षेत्रावर १७ लाख २ हजार ८५५ वृक्षांची लागवड केली असून, त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे. शेंद्र बन, सिरसमाळ, कोलठाण, कुबेर गेवराई अशा अनेक भागांमध्ये ही हिरवळ फुलवली आहे. या हरित उपक्रमामुळे डोंगरांवरील वनसंपदा पुन्हा बहरू लागली आहे. अतिक्रमण आणि झाडतोडीला आळा बसला असून, आज त्या भागात हरण, काळवीट, नीलगाय, मोर, बिबट्या यांसारख्या वन्यप्राण्यांचा मुक्त वावर वाढत आहे. त्यामुळे या भागातील पर्यावरणीय समतोल पुन्हा प्रस्थापित होत आहे.

यंदा जटवाडा, रहाळपट्टी तांड्यात लावणार १ लाख वृक्षयावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इको बटालियनने एक लाख नव्या वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरातील जटवाडा व रहाळपट्टी तांडा येथील ९० हेक्टर परिसरात वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या उपक्रमात इको बटालियनचे अधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासन सहभागी होणार आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी दिली.

प्लॅस्टिक प्रदूषण थांबवण्याचा प्रयत्नवनसंवर्धनासाठी समर्पित प्रयत्नांमुळे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले गेले असून, इतरांसाठी हे एक प्रेरणादायक उदाहरण ठरू शकते. यासह अनेक प्रस्तावित प्रकल्प या कंपनीला वनविभागाने सोपवले आहे. त्याचा फायदा वृक्षारोपण आणि संगोपनासाठी उपयुक्त ठरणार आहे. एक झाड एका व्यक्तीने लावलेच पाहिजे, असा नारा दिला आहे. पर्यावरणाची थीम प्लॅस्टिक निर्मूलन आहे. प्लॅस्टिकने जमीन नापीक होत आहे. शासनानेही विरोधी अभियान राबविलेले आहे. परंतु, आज प्रत्येक जण प्लॅस्टिक वापर करताना दिसत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरforest departmentवनविभाग