शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
3
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
4
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल

वन विभाग व इको बटालियनने १,०८० हेक्टरवरील ओसाड माळरानावर फुलवले नंदनवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:14 IST

जागतिक पर्यावरण दिन:या हरित उपक्रमामुळे डोंगरांवरील वनसंपदा पुन्हा बहरू लागली आहे.

 

छत्रपती संभाजीनगर: "झाडे लावा, झाडे जगवा", "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" अशा घोषवाक्यांमधून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. मात्र, अनेकदा केवळ औपचारिकतेपुरतेच हे उपक्रम मर्यादित राहतात. याला अपवाद ठरली आहे ‘इको बटालियन’. निवृत्त लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक जबाबदार संघटना, जिने गेल्या सात वर्षांत झाडे लावण्याचे केवळ नारे न देता, प्रत्यक्ष कृतीद्वारे डोंगर-दऱ्यांत, माळरानावर हिरवळ फुलवली आहे.

इको बटालियनने वन विभागाच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगरमधील ओसाड माळरानावर तब्बल १,०८० हेक्टर क्षेत्रावर १७ लाख २ हजार ८५५ वृक्षांची लागवड केली असून, त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे. शेंद्र बन, सिरसमाळ, कोलठाण, कुबेर गेवराई अशा अनेक भागांमध्ये ही हिरवळ फुलवली आहे. या हरित उपक्रमामुळे डोंगरांवरील वनसंपदा पुन्हा बहरू लागली आहे. अतिक्रमण आणि झाडतोडीला आळा बसला असून, आज त्या भागात हरण, काळवीट, नीलगाय, मोर, बिबट्या यांसारख्या वन्यप्राण्यांचा मुक्त वावर वाढत आहे. त्यामुळे या भागातील पर्यावरणीय समतोल पुन्हा प्रस्थापित होत आहे.

यंदा जटवाडा, रहाळपट्टी तांड्यात लावणार १ लाख वृक्षयावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इको बटालियनने एक लाख नव्या वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरातील जटवाडा व रहाळपट्टी तांडा येथील ९० हेक्टर परिसरात वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या उपक्रमात इको बटालियनचे अधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासन सहभागी होणार आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी दिली.

प्लॅस्टिक प्रदूषण थांबवण्याचा प्रयत्नवनसंवर्धनासाठी समर्पित प्रयत्नांमुळे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले गेले असून, इतरांसाठी हे एक प्रेरणादायक उदाहरण ठरू शकते. यासह अनेक प्रस्तावित प्रकल्प या कंपनीला वनविभागाने सोपवले आहे. त्याचा फायदा वृक्षारोपण आणि संगोपनासाठी उपयुक्त ठरणार आहे. एक झाड एका व्यक्तीने लावलेच पाहिजे, असा नारा दिला आहे. पर्यावरणाची थीम प्लॅस्टिक निर्मूलन आहे. प्लॅस्टिकने जमीन नापीक होत आहे. शासनानेही विरोधी अभियान राबविलेले आहे. परंतु, आज प्रत्येक जण प्लॅस्टिक वापर करताना दिसत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरforest departmentवनविभाग