शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

लोकसभेत भाजपच्या विजयासाठी खा. जलीलांना उभे करावे लागेल; दानवेंनी सांगितला फॉर्मुला

By विकास राऊत | Updated: August 22, 2023 13:19 IST

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप व एमआयएमच्या छुप्या मैत्रीवर शिक्कामोर्तब केले.

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे खा. इम्तियाज जलील व आमची वेगळी दोस्ती आहे. भाजपकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड असो किंवा इतर कुणीही आमचा उमेदवार असो. त्याला निवडून आणण्यासाठी आम्हाला खा. जलील यांना उभे करावेच लागते, असे विधान करून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप व एमआयएमच्या छुप्या मैत्रीवर शिक्कामोर्तब केले.ते सोमवारी दिशा समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. डॉ. कराड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली त्यात वावगे काय आहे, उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करावीच लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत. भाजप उमेदवारीसाठी समिती आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आहे. उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार असल्याचे दानवे म्हणाले, राज्यात भाजपचे नुकसान होईल, असे बोलले जात आहे. या पोकळ बातम्या असल्याचे ते म्हणाले. मागणी व पुरवठ्यावर मालाच्या किमती कमी-जास्त होतात. त्याचा केंद्र सरकार अंदाज घेत असते. कांद्याबाबतच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असले तरी कधी न कधी ते होत असते. याचा अर्थ मी शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, असे नाही. ग्राहक व शेतकऱ्यांचे हित पाहिले पाहिजे, असे दानवे म्हणाले.

दानवेंच्या विधानावर खा. जलील म्हणाले,दानवे यांना पत्रकारांनी विचारले की, खा. जलील हे पुन्हा निवडून येतील, त्यावर दानवे आधी जलीलच म्हणाले आम्ही पुन्हा येऊ. पुढे दानवे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत खा. जलील आम्हाला लागतील.

ते सगळे आमच्या ताटात जेवून गेलेले खरकटे...सहकारमंत्री दिलीप वळसे म्हणाले, खा. शरद पवारांच्या जिवावर राज्यात सरकार आलेले नाही. यावर बोलताना दानवे म्हणाले, मी अनेक वेळा सांगितले आहे, मायावती, जयललिता, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जीने स्वबळावर सरकार आणले. कोणत्याही प्रादेशिक पक्षाचे राज्यात स्वबळावर सरकार आलेले नाही. हे खरे आहे तसेच सहकार मंत्री वळसे जे बोलले ते देखील खरेच आहे. कुणाला तरी सोबत घेतल्याविना राज्यात सरकारच येत नाही. असे असताना आम्हाला सगळे जातीवादी ठरवतात. मायावती मुख्यमंत्री असताना भाजपचा उपमुख्यमंत्री होता. नितीशकुमार एनडीएमध्ये रेल्वेमंत्री होते. ओमर अब्दुल्ला, ममता बॅनर्जी अटल सरकारमध्ये होतेच ना. १९८५ मध्ये शरद पवार भाजप एकत्र निवडणूक लढले. हे सगळे आमच्या ताटात जेवून गेलेले खरकटे आहेत.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा