शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत भाजपच्या विजयासाठी खा. जलीलांना उभे करावे लागेल; दानवेंनी सांगितला फॉर्मुला

By विकास राऊत | Updated: August 22, 2023 13:19 IST

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप व एमआयएमच्या छुप्या मैत्रीवर शिक्कामोर्तब केले.

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे खा. इम्तियाज जलील व आमची वेगळी दोस्ती आहे. भाजपकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड असो किंवा इतर कुणीही आमचा उमेदवार असो. त्याला निवडून आणण्यासाठी आम्हाला खा. जलील यांना उभे करावेच लागते, असे विधान करून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप व एमआयएमच्या छुप्या मैत्रीवर शिक्कामोर्तब केले.ते सोमवारी दिशा समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. डॉ. कराड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली त्यात वावगे काय आहे, उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करावीच लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत. भाजप उमेदवारीसाठी समिती आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आहे. उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार असल्याचे दानवे म्हणाले, राज्यात भाजपचे नुकसान होईल, असे बोलले जात आहे. या पोकळ बातम्या असल्याचे ते म्हणाले. मागणी व पुरवठ्यावर मालाच्या किमती कमी-जास्त होतात. त्याचा केंद्र सरकार अंदाज घेत असते. कांद्याबाबतच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असले तरी कधी न कधी ते होत असते. याचा अर्थ मी शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, असे नाही. ग्राहक व शेतकऱ्यांचे हित पाहिले पाहिजे, असे दानवे म्हणाले.

दानवेंच्या विधानावर खा. जलील म्हणाले,दानवे यांना पत्रकारांनी विचारले की, खा. जलील हे पुन्हा निवडून येतील, त्यावर दानवे आधी जलीलच म्हणाले आम्ही पुन्हा येऊ. पुढे दानवे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत खा. जलील आम्हाला लागतील.

ते सगळे आमच्या ताटात जेवून गेलेले खरकटे...सहकारमंत्री दिलीप वळसे म्हणाले, खा. शरद पवारांच्या जिवावर राज्यात सरकार आलेले नाही. यावर बोलताना दानवे म्हणाले, मी अनेक वेळा सांगितले आहे, मायावती, जयललिता, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जीने स्वबळावर सरकार आणले. कोणत्याही प्रादेशिक पक्षाचे राज्यात स्वबळावर सरकार आलेले नाही. हे खरे आहे तसेच सहकार मंत्री वळसे जे बोलले ते देखील खरेच आहे. कुणाला तरी सोबत घेतल्याविना राज्यात सरकारच येत नाही. असे असताना आम्हाला सगळे जातीवादी ठरवतात. मायावती मुख्यमंत्री असताना भाजपचा उपमुख्यमंत्री होता. नितीशकुमार एनडीएमध्ये रेल्वेमंत्री होते. ओमर अब्दुल्ला, ममता बॅनर्जी अटल सरकारमध्ये होतेच ना. १९८५ मध्ये शरद पवार भाजप एकत्र निवडणूक लढले. हे सगळे आमच्या ताटात जेवून गेलेले खरकटे आहेत.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा