शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

वाहता नाला झाला नदीसारखा आरस्पानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 01:16 IST

इंदूर झाले चकाचक; औरंगाबाद का नाही : इंदूर शहरातील ३२ लाख नागरिकांच्या दररोजच्या वापरातील जवळपास ३०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम महापालिका करते. शहरातील एकाही नाल्यातून घाण-दुर्गंधीयुक्त पाणी वाहत नाही. नाल्यातील पाणी नदीसारखे आरस्पानी असते.

ठळक मुद्देजागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा इंदूर शहरात उपलब्ध करून देण्याचा विडाच महापालिकेने उचलला आहे. क्लिअर किरणोत्सर्गाचा वापर करून मानवी विष्ठेपासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

मुजीब देवणीकरऔरंगाबाद : इंदूर शहरातील ३२ लाख नागरिकांच्या दररोजच्या वापरातील जवळपास ३०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम महापालिका करते. शहरातील एकाही नाल्यातून घाण-दुर्गंधीयुक्त पाणी वाहत नाही. नाल्यातील पाणी नदीसारखे आरस्पानी असते. न्यूक्लिअर किरणोत्सर्गाचा वापर करून मानवी विष्ठेपासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा इंदूर शहरात उपलब्ध करून देण्याचा विडाच महापालिकेने उचलला आहे. शहर बससेवा, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, पथदिवे, गुळगुळीत रस्ते, पदपथ, उद्याने, प्राणिसंग्रहालय, ठिकठिकाणी बागा, जागा मिळेल तेथे वृक्षारोपण, मानवी केसांपासून केमिकल खतनिर्मिती, अशा कितीतरी आघाड्यांवर महापालिका काम करीत आहे. ही कामे महापालिका कशी करीत असेल, असाही क्षणभर प्रश्न पडतो. या कामासाठी खूप पैसा लागतो असेही नाही. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर मार्ग आपोआप तयार होतात, हे इंदूर शहराने दाखवून दिले.

( इंदूरमध्ये शहर स्वच्छतेवर दरवर्षी १५२ कोटी खर्च )

शहरातील कबीरखेडी येथे तब्बल ३०० एमएलडी दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. हे पाणी शहरातील उद्याने हिरवीगार करण्यासाठी वापरण्यात येते. २० कोटी रुपये खर्च करून भाभा अणु संशोधन केंद्राच्या मदतीने मानवी विष्ठेपासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. अहमदाबादनंतर हे देशातील दुसरे केंद्र ठरणार आहे.

दर्जेदार पाणीपुरवठाइंदूर शहरात पाण्यासाठी नर्मदा नदीवर अवलंबून राहावे लागते. तब्बल ९० किलोमीटर अंतरावरून पाणी शहरात आणण्यात येते. शहरातील उंच टेकडीवर हे पाणी नेण्यात येते. तेथून कोणतेही पंपिंग न करता थेट पाणी टाक्यांमध्ये चढविण्यात येते. शहराचे दोन भाग केले असून, प्रत्येक भागाला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. या अद्भुत पद्धतीने पाणीपुरवठ्यातील विजेचा खर्च कमी झाला आहे. औरंगाबादेतील नहर-ए-अंबरीसाठी ही सायफन पद्धत वापरली आहे.

३५० सुलभ शौचालयेइंदूर शहरातील प्रत्येक रस्त्यावर ‘पेशाब घर’ म्हणजेच शौचालये दिसतात. खाजगी संस्थांच्या माध्यमातून ‘पे अँड युज’ शौचालये उभारण्यात आली आहेत. नागरिक, महिला याचा वापर करतात. महापालिका दररोज स्वच्छता करते. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये महापालिकेने दर्जेदार सोयी-सुविधा देऊन नागरिकांच्या मनात घर केले. आता सार्वजनिक ठिकाणी कोणी कचरा टाकला तर नागरिकच त्याला रोखतात. रस्त्यावर थुंकणाऱ्यांनाही नागरिकच धडा शिकवितात.

२०० बसथांबेशहर बससेवेसाठी मनपाने प्रमुख रस्त्यांवर  आकर्षक बसथांबे तयार केले . यामध्ये बस किती वाजता येईल, याच्या वेळा डिजिटल बोर्डावर दर्शविण्यात आल्या आहेत. बस येण्यास किती वेळ आहे, हेसुद्धा प्रवाशाला पाहायला मिळते. बसथांब्यांची बांधणी अ‍ॅक्रलिक बोर्डात केली आहे. हे अ‍ॅक्रलिक बोर्ड कोणी चोरून नेत नाही, हे विशेष. महापालिकेने लावलेली प्रत्येक वस्तू ही या शहराची आहे. याचा वापर आपल्याला करावा लागतो ही जपानी नागरिकांप्रमाणे भावना प्रत्येकाच्या मनात कोरण्यात आली .

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानwater pollutionजल प्रदूषणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका