शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

मराठा आरक्षणासाठी  मराठवाड्यातील सात जिल्ह्यातून निवेदनांचा ‘महापूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 5:07 PM

औरंगाबाद वगळता उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये तब्बल २ लाख ३६ हजार ४७९ निवेदने प्राप्त झाल्याची माहिती आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी दिली.

ठळक मुद्देराज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर जिल्हावार जनसुनावणी घेतली.यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी निवेदनांचा पाऊस पाडला आहे.

- राम शिनगारे 

औरंगाबाद : राज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर जिल्हावार जनसुनावणी घेतली. यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी निवेदनांचा पाऊस पाडला आहे. औरंगाबाद वगळता उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये तब्बल २ लाख ३६ हजार ४७९ निवेदने प्राप्त झाल्याची माहिती आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी दिली.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात योग्य शिफारशी करण्याची विनंती राज्य मागासवर्ग आयोगाला केली आहे. यासाठी राज्य सरकारने आयोगाकडे उच्च न्यायालयात दाखल केलेले शपथपत्रासह सर्व अहवाल अभ्यासासाठी दिले. मात्र, आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण ठरविण्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे आणि रोहिदास जाधव यांच्या नेतृत्वात मराठवाड्यात सर्वेक्षण करण्यात आले. 

या सर्वेक्षणानंतर आयोगातर्फे जिल्हास्तरावर खुली जनसुनावणी घेण्यात आली. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येच अध्यक्ष न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड उपस्थित होते, तर उर्वरित ठिकाणी डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. राजेश करपे आणि रोहिदास जाधव यांनीच संस्था, संघटना, पक्ष, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून निवेदने स्वीकारली. यात पहिल्या टप्प्यात लातूर व उस्मानाबाद येथे जनसुनावणी घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात अनेक लोकांपर्यंत माहिती पोहोचली नसल्यामुळे आयोगाने दुसºया टप्प्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड आणि जालना येथे योग्य ती काळजी घेत जनसुनावणीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली. यामुळे नागरिकांनी पुराव्यांसह आयोगाकडे लाखावर निवेदने दिली. या निवेदनांचे आयोग वर्गीकरण करणार आहे. या वर्गीकरणानंतर याविषयीचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येईल, असे डॉ. करपे यांनी सांगितले.

१६ मार्चला औरंगाबादेत जनसुनावणीमराठवाड्यातील सात जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेतल्यानंतर विभागस्तरावरील जनसुनावणी शुक्रवारी (दि.१६) सुभेदारी विश्रामगृह येथे सकाळी ११ ते ४ या वेळेत आयोजित केली आहे. या जनसुनावणीला अध्यक्ष न्यायमूर्ती गायकवाड, तज्ज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे यांच्यासह आयोगाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना आणि नागरिकांना लेखी निवेदने सादर करीत यात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. राजेश करपे यांनी केले.

जिल्हा              निवेदनेलातूर               ४९०उस्मानाबाद     ९८९नांदेड               ९०,०००हिंगोली            ३९,०००परभणी            ४७,०००बीड                  ३१,०००जालना             २८,०००एकूण               २,३६,४७९

टॅग्स :reservationआरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाState Governmentराज्य सरकार