शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅश बॅक : देशभरात पडझड होत असताना औरंगाबादकर काँग्रेसच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:39 IST

लोकसभेची चौथी निवडणूक : इंदिरा गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बी.डी. देशमुखांना पुन्हा संधी

- शांतीलाल गायकवाड 

औरंगाबाद : नेहरू, शास्त्री युगाचा अस्त, नेतृत्वावरून माजलेल्या बेदिलीने देशातील अनेक राज्यांत काँग्रेसला १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसला; परंतु औरंगाबादसह महाराष्ट्राने काँग्रेसची उभारी वाढविली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भाऊराव दगडूराव देशमुख विक्रमी ८३ हजार ४६४ एवढ्या मताधिक्याने विजयी झाले. करिश्माई नेहरू युगातही काँग्रेसला एवढा मोठा विजय मिळाला नव्हता. 

‘हिंदी-चिनी भाई-भाई’च्या घोषणा देशात घुमत असतानाच १९६२ मध्ये चीनने भारतावर अतिक्रमण केले व त्यात भारताला अपमानजनक पराभव पत्करावा लागला. त्यानंतर अल्पावधीतच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. लालबहाद्दूर शास्त्री यांच्या हाती देशाची सूत्रे आली; परंतु पुढे जेमतेम १९ महिन्यांनंतर त्यांचेही निधन झाले. त्यानंतर १९६६ मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी पहिल्या महिला इंदिरा गांधी आल्या. काँग्रेसने १९६७ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची चौथी निवडणूक लढली. 

औरंगाबादेतून काँग्रेसने पुन्हा एकदा भाऊराव देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यांचे प्रतिस्पर्धी होते भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे श्रीनिवास गणेश सरदेसाई (एस.जी. सरदेसाई), भारतीय जनसंघाचे बी. गंगाधर आणि अपक्ष एम.एस.पी.एफ. मोहंमद. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ४ लाख ८१ हजार ५०५ मतदार होते. त्यापैकी २ लाख ७० हजार १३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १७ हजार ४४ मते अवैध ठरली. झालेल्या एकूण मतदानाच्या ५५.८२ टक्के; अर्थात १ लाख ३५ हजार ८६५ मते मिळवीत बी.डी. देशमुख दुसऱ्यांदा औरंगाबादचे खासदार झाले. देशमुख यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सरदेसाई यांना २१.५३ टक्के म्हणजेच ५२ हजार ४०१ मते मिळाली. जनसंघाचे बी. गंगाधर यांना ३७ हजार ८८३, तर अपक्ष मोहंमद यांना १७ हजार २६६ मते मिळाली. 

मराठवाडा, महाराष्ट्राची साथया निवडणुकीत दिल्ली, गुजरात, मद्रास, ओरिसा, प. बंगाल, राजस्थान, केरळ या सात राज्यांतून काँग्रेसने बहुमत गमावले होते; परंतु या पडझडीच्या काळातही मराठवाडा व महाराष्ट्र काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. महाराष्ट्रातील ४५ पैकी ३७ जागा काँग्रेसने जिंकल्या. मराठवाड्यातील बीडचा अपवाद वगळता सर्व सहा जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या. या निवडणुकीत काँग्रेसकडे चौथ्यांदा देशाची सत्ता आली; परंतु काँग्रेसच्या मताचा टक्का ४१ टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता. गेल्या निवडणुकीत ३६१ जागा पटकावणारी काँग्रेस या निवडणुकीत जेमतेम २८३ जागेवर विजयी झाली व इंदिरा गांधी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ झाल्या.

एस.जी. सरदेसाई यांचा अल्प परिचय १९०७ मध्ये महाराष्ट्रात जन्मलेले सरदेसाई यांचे १९९६ मध्ये देहावसान झाले. ते साम्यवादी विचारवंत, कार्यकर्ते होते. १९६५ मध्ये चिनी आक्रमनानंतर देशात भारतीय कम्युनिस्ट पक्षात चीनवादी व राष्ट्रवादी, अशी उभी फूट पडून मार्क्सवादी गटाची स्थापना झाली. त्यात सरदेसाई हे राष्ट्रवादी कम्युनिस्टांच्या बाजूने उभे राहिले. तत्पूर्वी, एकसंघ सीपीआयच्या सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटीचे ते सदस्य होते. महाराष्ट्रातून ते राज्यसभेवरही गेले होते. त्यांचे ‘प्रोगेस अ‍ॅण्ड कन्झर्व्हेशन इन एसियंट इंडिया’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Aurangabadऔरंगाबाद