शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

फ्लॅश बॅक : देशभरात पडझड होत असताना औरंगाबादकर काँग्रेसच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:39 IST

लोकसभेची चौथी निवडणूक : इंदिरा गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बी.डी. देशमुखांना पुन्हा संधी

- शांतीलाल गायकवाड 

औरंगाबाद : नेहरू, शास्त्री युगाचा अस्त, नेतृत्वावरून माजलेल्या बेदिलीने देशातील अनेक राज्यांत काँग्रेसला १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसला; परंतु औरंगाबादसह महाराष्ट्राने काँग्रेसची उभारी वाढविली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भाऊराव दगडूराव देशमुख विक्रमी ८३ हजार ४६४ एवढ्या मताधिक्याने विजयी झाले. करिश्माई नेहरू युगातही काँग्रेसला एवढा मोठा विजय मिळाला नव्हता. 

‘हिंदी-चिनी भाई-भाई’च्या घोषणा देशात घुमत असतानाच १९६२ मध्ये चीनने भारतावर अतिक्रमण केले व त्यात भारताला अपमानजनक पराभव पत्करावा लागला. त्यानंतर अल्पावधीतच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. लालबहाद्दूर शास्त्री यांच्या हाती देशाची सूत्रे आली; परंतु पुढे जेमतेम १९ महिन्यांनंतर त्यांचेही निधन झाले. त्यानंतर १९६६ मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी पहिल्या महिला इंदिरा गांधी आल्या. काँग्रेसने १९६७ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची चौथी निवडणूक लढली. 

औरंगाबादेतून काँग्रेसने पुन्हा एकदा भाऊराव देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यांचे प्रतिस्पर्धी होते भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे श्रीनिवास गणेश सरदेसाई (एस.जी. सरदेसाई), भारतीय जनसंघाचे बी. गंगाधर आणि अपक्ष एम.एस.पी.एफ. मोहंमद. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ४ लाख ८१ हजार ५०५ मतदार होते. त्यापैकी २ लाख ७० हजार १३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १७ हजार ४४ मते अवैध ठरली. झालेल्या एकूण मतदानाच्या ५५.८२ टक्के; अर्थात १ लाख ३५ हजार ८६५ मते मिळवीत बी.डी. देशमुख दुसऱ्यांदा औरंगाबादचे खासदार झाले. देशमुख यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सरदेसाई यांना २१.५३ टक्के म्हणजेच ५२ हजार ४०१ मते मिळाली. जनसंघाचे बी. गंगाधर यांना ३७ हजार ८८३, तर अपक्ष मोहंमद यांना १७ हजार २६६ मते मिळाली. 

मराठवाडा, महाराष्ट्राची साथया निवडणुकीत दिल्ली, गुजरात, मद्रास, ओरिसा, प. बंगाल, राजस्थान, केरळ या सात राज्यांतून काँग्रेसने बहुमत गमावले होते; परंतु या पडझडीच्या काळातही मराठवाडा व महाराष्ट्र काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. महाराष्ट्रातील ४५ पैकी ३७ जागा काँग्रेसने जिंकल्या. मराठवाड्यातील बीडचा अपवाद वगळता सर्व सहा जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या. या निवडणुकीत काँग्रेसकडे चौथ्यांदा देशाची सत्ता आली; परंतु काँग्रेसच्या मताचा टक्का ४१ टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता. गेल्या निवडणुकीत ३६१ जागा पटकावणारी काँग्रेस या निवडणुकीत जेमतेम २८३ जागेवर विजयी झाली व इंदिरा गांधी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ झाल्या.

एस.जी. सरदेसाई यांचा अल्प परिचय १९०७ मध्ये महाराष्ट्रात जन्मलेले सरदेसाई यांचे १९९६ मध्ये देहावसान झाले. ते साम्यवादी विचारवंत, कार्यकर्ते होते. १९६५ मध्ये चिनी आक्रमनानंतर देशात भारतीय कम्युनिस्ट पक्षात चीनवादी व राष्ट्रवादी, अशी उभी फूट पडून मार्क्सवादी गटाची स्थापना झाली. त्यात सरदेसाई हे राष्ट्रवादी कम्युनिस्टांच्या बाजूने उभे राहिले. तत्पूर्वी, एकसंघ सीपीआयच्या सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटीचे ते सदस्य होते. महाराष्ट्रातून ते राज्यसभेवरही गेले होते. त्यांचे ‘प्रोगेस अ‍ॅण्ड कन्झर्व्हेशन इन एसियंट इंडिया’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Aurangabadऔरंगाबाद