शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

महिलांना पहिल्या अपत्यानंतर पाच हजार; आता दुसरी मुलगी झाल्यास मिळणार सहा हजार

By विजय सरवदे | Updated: July 7, 2023 19:55 IST

माता- नवजात बालकांसाठी योजना ठरतेय संजीवनी

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरी व ग्रामीण भागात मातृ वंदना योजनेचे काम उत्कृष्टपणे राबविण्यात आल्यामुळे जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात ७० हजार ८०९ महिलांना, तर नगरपालिका क्षेत्रात ६ हजार ६१९ आणि महापालिका कार्यक्षेत्रात ४२ हजार ३१७ महिलांना आर्थिक लाभ देण्यात आला आहे.

आता या योजनेच्या नियमावलीत सुधारणा करण्यात आली असून पूर्वी तीन टप्यात ५ हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जात होते. आता दोन टप्प्यांत महिलांना हा लाभ दिला जाणार आहे, तर दुसरे अपत्य मुलगी असेल, तर महिलेला एकाच टप्प्यात ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. गर्भवती महिला व मातांचे व त्यांच्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने मातृ वंदना योजना सन २०१७ पासून सुरू करण्यात आली.

काय आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना?प्रसूतीच्या अगोदर व प्रसूतीनंतर पहिल्या बाळाकरिता मातेला विश्रांती मिळावी आणि बुडीत मजुरीचा लाभ व्हावा, या उद्देशाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना १ जानेवारी २०१७ पासून सुरू करण्यात आली.

मोबाईलवर भरा ऑनलाईन अर्जमहिला व बाल विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर लाभार्थी महिलांना आपल्या मोबाईलवरुन ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पहिला हप्ता ३ हजार रुपये पहिल्या अपत्यावेळी आरोग्य केंद्रात गरोदरपणाची नोंदणी व प्रसूतीपूर्व एक तपासणी केल्यास पहिला हप्ता ३ हजार रुपयांचा दिला जातो.

दुसरा हप्ता दोन हजारांचाबाळाचे प्राथमिक लसीकरण चक्र पूर्ण झाल्यानंतर २ हजारांचा दुसरा हप्ता दिला जातो.

दुसऱ्या अपत्यानंतर सहा हजारदुसरे बाळ जन्मल्यानंतर व ते अपत्य मुलगीच असल्यानंतर एकाच टप्प्यात ६ हजारांचा लाभ दिला जातो.

निकष काय?या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र राहाणार नाहीत. महिलांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे. बीपीएल शिधापत्रिकाधारक, मनरेगा कार्ड जॉबधारक महिला, अनु. जाती, जमातीच्या महिला व दिव्यांग महिला असाव्यात.

जिल्ह्यात १ लाख लाभार्थीयोजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात १ लाख १९ हजार ७४५ महिलांना आर्थिक लाभ देण्यात आला.

या योजनेसाठी आता सुधारित निकष आलेले आहेत. त्यामुळे नवीन नियमावलीनुसार जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.- डॉ. अभय धानोरकर, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :FamilyपरिवारAurangabadऔरंगाबाद