शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प ५० टक्केही भरले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 18:05 IST

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देचार जिल्ह्यात सुरु आहेत ६२१ टँकर १२ लाख ५२ हजार नागरिकांना टँकरने पाणी 

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्पांत यंदाच्या पावसाळ्यात ५० टक्केही पाणीसाठा झालेला नाही. ७ आॅक्टोबर रोजी पावसाळा संपण्याची तारीख आहे. परतीचा पाऊस अजूनही मराठवाड्यातील काही भागांत बरसत असला तरी बीड, लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांत ६२१ टँकरने १२ लाख ५२ हजार नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. 

मराठवाड्यात पावसाची वार्षिक सरासरी ७७९ मि.मी. इतकी आहे. ५८८.१५ मि.मी. इतका पाऊस आजवर झाला आहे. ७५.५० टक्के पाऊस विभागात झाला आहे. २५ टक्के पावसाची आजवर तूट आहे. विभागातील एकूण सर्व ८७२ प्रकल्पांत ८१९३.९२ दशलक्ष घनमीटर एवढी पाणी साठवण क्षमता आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत ३६९३.२० दलघमी पाणी प्रकल्पांत आहे. ४५.०८ टक्के  इतके ते पाणी आहे. चार जिल्ह्यांतील टँकरचा आकडा पाहता येणाऱ्या उन्हाळ्यात त्या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. 

बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४१३ टँकर सुरू आहेत. लातूरमध्ये ३७, तर उस्मानाबादमध्ये १३७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबादमध्ये ३४ टँकर सुरू आहेत. १३२६ विहिरी अजूनही अधिग्रहित आहेत. आॅक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात टँकर सुरू ठेवण्याची परिस्थिती विभागात निर्माण झालेली आहे. खरीप हंगाम जवळपास संपल्यात जमा आहे. 

मराठवाड्यातील विविध प्रकल्पांतील साठा

प्रकल्प     संख्या    एकूण क्षमता    सद्य:स्थितीत साठा     टक्केवारी     मोठे प्रकल्प    ११    ५१४३ दलघमी     २८७३ दलघमी     ५५.८६ %मध्यम प्रकल्प    ७५    ९४०.३४    २१५.६९५    २२.९४ %लघु प्रकल्प    ७४९    १७१२.८७    ३६४.५६    २१.२८%गोदावरी बंधारे    १३    ३२४.७७४    २३७.२९०    ७३.६१ %तेरणा व बंधारे     २४    ७२.२३०    २.६५३    ३.६७६ %एकूण     ८७२    ८१९३.९२    ३६९३.२०    ४५.०८ %  

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसdroughtदुष्काळagricultureशेती